शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विमा कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:02 IST

वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून

ठळक मुद्देखासदार संभाजीराजे छत्रपती यांची संसदेत मागणी

कोल्हापूर : संकटग्रस्त शेतकऱ्यांविषयी जराही सहानुभूती नसलेल्या खासगी विमा कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी संसदेत केली.

संसदेत बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केलेले आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. प्राथमिक अंदाजानुसार ५४ लाख हेक्टर सुपीक जमिनीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. २०१६ मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना अमलात आणली. शेतकरी हिताकरिता अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे. दुर्दैवाने या योजनेत खासगी विमा कंपन्यांनी प्रवेश केला. त्यांनी शेतकºयांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचे वचन दिले. सरकारी विमा कंपन्यांना विमा अदा करताना अकारण उशीर लागतो, हे एक कारण समोर केले गेले.

गेल्या तीन महिन्यांत शेतकºयांना कसल्याही प्रकारचा लाभ पोहोचविला गेला नाही. रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी पाच वेळेस निविदा मागवूनही एकही कंपनी पुढे आली नाही. याचे कारण हेच आहे, की यावेळी शेतकºयांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. वस्तुत: निसर्गाच्या कोपामुळे नुकसान झाले आहे आणि विमा हा द्यावाच लागणार. कंपनी नुकसानीत जाऊ शकते असे त्यांना वाटत असावे.

वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून गेलेल्या शेतक-यांवर उपासमारीची वेळ यायच्या आत मदत पोहोचवावी.

रब्बीच्या पेरणीकरिता शेतकºयांच्या हातात काहीच नाही, याची दखल घ्यावी असे निदर्शनास आणून खासगी विमा कंपन्यांच्या लुटीविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी संसदेत आवाज उठविला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती