शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

खासगी विमा कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:02 IST

वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून

ठळक मुद्देखासदार संभाजीराजे छत्रपती यांची संसदेत मागणी

कोल्हापूर : संकटग्रस्त शेतकऱ्यांविषयी जराही सहानुभूती नसलेल्या खासगी विमा कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी संसदेत केली.

संसदेत बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केलेले आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. प्राथमिक अंदाजानुसार ५४ लाख हेक्टर सुपीक जमिनीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. २०१६ मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना अमलात आणली. शेतकरी हिताकरिता अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे. दुर्दैवाने या योजनेत खासगी विमा कंपन्यांनी प्रवेश केला. त्यांनी शेतकºयांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचे वचन दिले. सरकारी विमा कंपन्यांना विमा अदा करताना अकारण उशीर लागतो, हे एक कारण समोर केले गेले.

गेल्या तीन महिन्यांत शेतकºयांना कसल्याही प्रकारचा लाभ पोहोचविला गेला नाही. रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी पाच वेळेस निविदा मागवूनही एकही कंपनी पुढे आली नाही. याचे कारण हेच आहे, की यावेळी शेतकºयांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. वस्तुत: निसर्गाच्या कोपामुळे नुकसान झाले आहे आणि विमा हा द्यावाच लागणार. कंपनी नुकसानीत जाऊ शकते असे त्यांना वाटत असावे.

वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून गेलेल्या शेतक-यांवर उपासमारीची वेळ यायच्या आत मदत पोहोचवावी.

रब्बीच्या पेरणीकरिता शेतकºयांच्या हातात काहीच नाही, याची दखल घ्यावी असे निदर्शनास आणून खासगी विमा कंपन्यांच्या लुटीविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी संसदेत आवाज उठविला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती