शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

खासगी विमा कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:02 IST

वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून

ठळक मुद्देखासदार संभाजीराजे छत्रपती यांची संसदेत मागणी

कोल्हापूर : संकटग्रस्त शेतकऱ्यांविषयी जराही सहानुभूती नसलेल्या खासगी विमा कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी संसदेत केली.

संसदेत बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महापूर आणि परतीच्या पावसाने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केलेले आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. प्राथमिक अंदाजानुसार ५४ लाख हेक्टर सुपीक जमिनीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. २०१६ मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना अमलात आणली. शेतकरी हिताकरिता अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे. दुर्दैवाने या योजनेत खासगी विमा कंपन्यांनी प्रवेश केला. त्यांनी शेतकºयांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचे वचन दिले. सरकारी विमा कंपन्यांना विमा अदा करताना अकारण उशीर लागतो, हे एक कारण समोर केले गेले.

गेल्या तीन महिन्यांत शेतकºयांना कसल्याही प्रकारचा लाभ पोहोचविला गेला नाही. रब्बी हंगामातील पीकविम्यासाठी पाच वेळेस निविदा मागवूनही एकही कंपनी पुढे आली नाही. याचे कारण हेच आहे, की यावेळी शेतकºयांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. वस्तुत: निसर्गाच्या कोपामुळे नुकसान झाले आहे आणि विमा हा द्यावाच लागणार. कंपनी नुकसानीत जाऊ शकते असे त्यांना वाटत असावे.

वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून गेलेल्या शेतक-यांवर उपासमारीची वेळ यायच्या आत मदत पोहोचवावी.

रब्बीच्या पेरणीकरिता शेतकºयांच्या हातात काहीच नाही, याची दखल घ्यावी असे निदर्शनास आणून खासगी विमा कंपन्यांच्या लुटीविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी संसदेत आवाज उठविला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती