शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Kolhapur: लखन खाडे यांना खनिकर्म कार्यालयात रुजू करून घेण्यासाठी मंत्रालयातून दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 14:13 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : लखन खाडे यांना जिल्हा खनिकर्म कार्यालयात रुजू करून घेण्यासाठी मंत्रालय पातळीवरून दबाव आणला जात आहे. ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : लखन खाडे यांना जिल्हा खनिकर्म कार्यालयात रुजू करून घेण्यासाठी मंत्रालय पातळीवरून दबाव आणला जात आहे. एका महसूल सहायकांसाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा हा दबाव हा संशोधनाचा विषय झाला आहे. त्यासाठी त्यांनी काही अर्थपूर्ण घडामोडी केल्याची माहिती आहे.खाडे यांची सहा महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यासन क्रमांक सात येथे नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांनी जिल्हा खनिकर्म कार्यालयात बदली करून घेण्यासाठी हालचाली चालू केल्या. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बदली अत्यंत तत्परतेने त्या कार्यालयात केलीदेखील. मात्र, तेथे खाडे रुजू होण्यापूर्वीच त्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली. त्यात बदलीची ऑर्डर काढायला उशीर झाला, तोपर्यंत नवीन जिल्हाधिकारी अमोल येडगे हे रुजू झाले.दुसरीकडे खनिकर्म विभागातील कोणत्याच कर्मचाऱ्याचा कार्यकाल संपलेला नव्हता. त्यामुळे त्या कार्यालयाने खाडे यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर गेले सहा सात महिने हे प्रकरण रेंगाळत पडले आहे. तरीही मागील आठ दिवसांमध्ये मंत्रालय स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर व खनिकर्म विभागावर खाडे यांना रुजू करून घेण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात आहे. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा आहे.

इकडे खाडे यांची चौकशी लागून, त्यांच्या नावाने दोन वेळा नोटिसा निघाल्याने, शिवाय गडहिंग्लज खनिकर्म कार्यालयातील वाईट अनुभव असल्याने अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी त्यांना खनिकर्ममध्ये रुजू करून घेण्यास नकार दिल्याचे समजते. 

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सेटिंग..खाडे हे कधीच आपल्या टेबलवर उपस्थित नसतात. आपल्या टेबलचे काम करण्यासाठी त्यांनी उमेदवाराची नियुक्ती केली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील एका चहाच्या दुकानात अर्थकारणाची चर्चा सुरू असते. अलीकडेच झालेल्या बदल्यांच्या बाबतीतदेखील तलाठ्यांसोबत सेटिंग्स लावल्या गेल्याचे कर्मचाऱ्यांनी फोन करून 'लोकमत'ला कळविले.

तहसीलदार नाराज..गडहिंग्लजमधील कार्यकाळात खाडे यांनी तत्कालीन तहसीलदारांच्या नावावर क्रशरधारकांकडून पैसे घेतल्याची तक्रार झाली आहे. एक दिवस कारवाई सुरू असताना काही क्रशर मालकांनी आपल्याकडे पैसे पाठविल्याचे तहसीलदारांना सांगितले. मात्र, तहसीलदारांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती. त्यांनी चौकशी केल्यानंतर हे पैसे खाडे यांच्याकडे दिल्याचे समजले. शिवाय त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी असल्याने त्यांचे टेबल बदलण्यात आले होते.

उलटा न्याय..एखादा कर्मचारी चांगला असेल आणि त्याला बदली हवी असेल तर अधिकारी पन्नास कारणे सांगतात आणि ज्याच्याबद्दल अपहाराची तक्रार झाली आहे, त्याला पुन्हा त्याच विभागात नियुक्ती देण्यामागे अपहाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही वरिष्ठ त्यात मदत करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी