शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

वृक्षारोपणासाठी सव्वा कोटी खड्डे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:48 IST

दीपक जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही एक कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ...

दीपक जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही एक कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यासाठी वनविभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे एक कोटी १६ लाख ५८ हजार खड्डे खोदले आहेत. शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. गतवर्षी लावलेली झाडे ८० टक्के जगली असल्याचा दावा शासन करीत आहे.राष्ट्रीय वननीतीनुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण २० टक्के असल्याने यामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने तीन वर्षांपूर्वी एकूण ५० कोटी वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याकरिता अपुऱ्या पडणाºया मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविली जात आहे. या वृक्षलागवडीमध्ये २०१६ मध्ये राज्यात दोन कोटी, २०१७ मध्ये चार कोटी, तर २०१८ मध्ये १३ कोटींपेक्षा अधिकची वृक्षांची लागवड झाली आहे. यावर्षी राज्यभरात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यालाही उद्दिष्ट वाढवून दिले आहे. याशिवाय सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फतसुद्धा वृक्षलागवड होणार आहे; यासाठी हरित सेना नावाचे अ‍ॅप काढले आहे. त्यात रोज नागरिक आपली नोंदणी करीत आहेत.जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २४.७० इतके वनक्षेत्र आहे. वन विभागाकडे सर्वाधिक जमीन व यंत्रणा असल्याने वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वन विभागाला दिले आहे. त्याचबरोबर वृक्षलागवडीचे नियोजन करण्याची जबाबदारीसुद्धा वन विभागाकडे आहे. जास्तीत जास्त वृक्षलागवड होण्यासाठी वन विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.विभागनिहाय खड्ड्यांची संख्याजिल्ह्यात खड्डे खोदण्याचे काम १00 टक्के पूर्ण झाले असून, त्यामध्ये वन विभागाने ३८ लाख २४ हजार, ग्रामपंचायत ३२ लाख ८७ हजार, वस्त्रोद्योग विभागाने सहा लाख, कृषी विभाग तीन लाख ४३ हजार, शिक्षण एक लाख, उच्च व तंत्रशिक्षण ३४ हजार ६५०, नगर विकास विभाग एक लाख ८ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग एक लाख ६१ हजार ५००, पोलीस १६ हजार ६५०, न्याय विभाग १४ हजार, महसूल ६८ हजार, ग्रामविकास ५१ हजार, महापालिका १० हजार खड्डे काढले आहेत.झाडे जगल्याचे लेखा परीक्षण कधी?दरवर्षी खड्डे काढले जातात, त्यामध्ये वृक्षलागवडही होते; परंतु प्रत्यक्षात किती झाडे जगली व किती झाडांची वाढ झाली, याचे सामाजिक लेखापरीक्षण मात्र होताना दिसत नाही; त्यामुळे झाडे तरी लावली जातात, पैसेही खर्च होतात आणि ती झाडे तरी कुठे दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया सामान्य लोकांतून उमटते.