शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वृक्षारोपणासाठी सव्वा कोटी खड्डे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:48 IST

दीपक जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही एक कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ...

दीपक जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही एक कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यासाठी वनविभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे एक कोटी १६ लाख ५८ हजार खड्डे खोदले आहेत. शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. गतवर्षी लावलेली झाडे ८० टक्के जगली असल्याचा दावा शासन करीत आहे.राष्ट्रीय वननीतीनुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण २० टक्के असल्याने यामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने तीन वर्षांपूर्वी एकूण ५० कोटी वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याकरिता अपुऱ्या पडणाºया मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविली जात आहे. या वृक्षलागवडीमध्ये २०१६ मध्ये राज्यात दोन कोटी, २०१७ मध्ये चार कोटी, तर २०१८ मध्ये १३ कोटींपेक्षा अधिकची वृक्षांची लागवड झाली आहे. यावर्षी राज्यभरात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यालाही उद्दिष्ट वाढवून दिले आहे. याशिवाय सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फतसुद्धा वृक्षलागवड होणार आहे; यासाठी हरित सेना नावाचे अ‍ॅप काढले आहे. त्यात रोज नागरिक आपली नोंदणी करीत आहेत.जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २४.७० इतके वनक्षेत्र आहे. वन विभागाकडे सर्वाधिक जमीन व यंत्रणा असल्याने वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वन विभागाला दिले आहे. त्याचबरोबर वृक्षलागवडीचे नियोजन करण्याची जबाबदारीसुद्धा वन विभागाकडे आहे. जास्तीत जास्त वृक्षलागवड होण्यासाठी वन विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.विभागनिहाय खड्ड्यांची संख्याजिल्ह्यात खड्डे खोदण्याचे काम १00 टक्के पूर्ण झाले असून, त्यामध्ये वन विभागाने ३८ लाख २४ हजार, ग्रामपंचायत ३२ लाख ८७ हजार, वस्त्रोद्योग विभागाने सहा लाख, कृषी विभाग तीन लाख ४३ हजार, शिक्षण एक लाख, उच्च व तंत्रशिक्षण ३४ हजार ६५०, नगर विकास विभाग एक लाख ८ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग एक लाख ६१ हजार ५००, पोलीस १६ हजार ६५०, न्याय विभाग १४ हजार, महसूल ६८ हजार, ग्रामविकास ५१ हजार, महापालिका १० हजार खड्डे काढले आहेत.झाडे जगल्याचे लेखा परीक्षण कधी?दरवर्षी खड्डे काढले जातात, त्यामध्ये वृक्षलागवडही होते; परंतु प्रत्यक्षात किती झाडे जगली व किती झाडांची वाढ झाली, याचे सामाजिक लेखापरीक्षण मात्र होताना दिसत नाही; त्यामुळे झाडे तरी लावली जातात, पैसेही खर्च होतात आणि ती झाडे तरी कुठे दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया सामान्य लोकांतून उमटते.