शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कन्यागत सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 10, 2016 01:41 IST

विकासकामे पूर्णत्वाकडे : पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी खर्च; कामाची लोकप्रतिनिधींकडून पाहणी विकासकामे पूर्णत्वाकडे : पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी खर्च; कामाची लोकप्रतिनिधींकडून पाहणी

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १२ आॅगस्ट पासून सुरू होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली असून घाटांची उभारणी, घाटावरील विद्युतीकरण, रस्ते, पार्किंग, आदी सर्व पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ६५ कोटींपैकी ६२ कोटींचा निधी विविध विकासकामांवर खर्च झाला आहे.कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पत्रकारांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांबाबत पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आमदार उल्हास पाटील, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव संजय पुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजी जगदाळे, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, माजी सरपंच अभिजित जगदाळे यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, देवस्थान समितीचे विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.दर बारा वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळा येत्या १२ आॅगस्टपासून भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी यांनी सक्रिय योगदान दिले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्व विकासकामांचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार सर्व यंत्रणांना सक्रिय केले आहे. आमदार उल्हास पाटील म्हणाले, कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यामध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन त्या-त्या उपाययोजना गतिमान केल्या आहेत. या सोहळ्यानिमित्त करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक गतिमान करण्यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शासनाच्या निधीतून होणारी सर्व विकासकामे अतिशय दर्जेदार आणि आकर्षक करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी देवस्थान समितीचे सचिव संजय पुजारी म्हणाले, १२ आॅगस्ट २०१६ पासून सप्टेंबर २०१७ या कालावधीत कन्यागत महापर्वकाळ सोहळा साजरा होत असून, वर्षभर पर्वण्या सुरू राहणार असून भाविकांना या पर्वणीकालामध्ये पवित्र स्नानाचा आनंद घेता येईल. तहसीलदार सचिन गिरी यांनी, नृसिंहवाडी येथील घाटावर एकाच वेळी ५० हजार भाविकांना स्नान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या स्नानाची, राहण्याची, दर्शन मंडप, पार्किंगची, पिण्याचे पाणी, घाटांवर विद्युतीकरण, रस्ते, शौचालय अशा सर्व सुविधा प्राधान्यक्रमाने उभारण्यात येत असल्याचे सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सोहळ््यात अष्टतीर्थाला महत्त्वकन्यागत महापर्वकाळ हा दर १२ वर्षांनी संपन्न होतो. कन्या राशीमध्ये गुरू ग्रहाचे वास्तव्य १३ महिने असते. या काळामध्ये गंगा नदी कृष्णा नदीच्या भेटीला येते व पर्वकाल संपन्न होईपर्यंत कृष्णा नदीच्या सहवासात वास्तव्य करते, अशी महती आहे. कृष्णा आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमाकाठी वसलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे कृष्णा तीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशीतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरदतीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ, शक्तितीर्थ व प्रयागतीर्थ अशी अष्टतीर्थे आहेत. कन्यागत महापर्वकाळात अष्टतीर्थ स्नानास अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. कन्यागत सोहळ्याचे मुख्य स्थान हे अष्टतीर्थांपैकी एक असे शुक्लतीर्थ आहे, असे संजय पुजारी यांनी सांगितले.१२१ कोटींचा निधी मंजूरराज्य शासनातर्फे कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी १२१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या सोहळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी ६५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुमारे ६२ कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून नृसिंहवाडी येथील विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. ही कामे अतिशय दर्जेदार आणि आकर्षक करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे, असे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले.शुक्लतीर्थावर होणार ‘श्रीं’च्या मूर्तीचे स्नानकन्यागत महापर्वकाळाच्या सोहळ्यामध्ये श्रींच्या उत्सवमूर्र्तीचे १२ आॅगस्ट रोजी सूर्योदयाला शुक्लतीर्थ येथे स्नान झाल्यानंतर कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास प्रारंभ होतो. त्यामुळे १०४ मीटरच्या शुक्लतीर्थ घाटाची आकर्षक आणि दर्जेदार बांधणी केली असून, या ठिकाणी मोठा घाट तयार करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.