शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या, आता नंबर कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:25 IST

transfars, seniorofficers, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल मंत्र्यांचे शासनदरबारी वजन आहे की नाही? : बदल्या रद्द करा

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.पत्रकात म्हटले आहे की, महापूर आणि कोरोना संसर्गाच्या संकटत जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे साक्षात देवदूतच कोल्हापूरला मिळाले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख आणि शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तर या दीड वर्षात कोल्हापुरातील सर्व काळे धंदे नेस्तनाबूत करून काळे धंदेवाल्यांना मोक्का कायद्याचा हिसका दाखवून समाजाला घातक असणाऱ्या सर्व काळ्या धंद्यांचा बीमोड केला.

इतकेच नव्हे तर खुद्द पोलीस खात्यात असणाऱ्या काही घरभेदी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करून पोलीस खात्याची स्वच्छता केली. या सर्वांची दखल घेऊन राज्य पोलीस खात्याने प्रेरणा कट्टे यांच्या पथकास एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले.त्यांची बदली हा लोकशाहीविरोधातील अवैध काळे धंदेवाल्यांचा विजय मानावा लागेल. ही चर्चा चालू आहे तोवरच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक तडकाफडकी बदली झाली. त्यांनी कार्यभार स्वीकारून दीड वर्ष झाले नाही तोवर बदली.

राज्य प्रशासनाला कोल्हापूरमध्ये असे लोकाभिमुख, प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी का नको आहेत, हेच समजत नाही, असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, माणिक मंडलिक,महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, अजित सासने, कॉ. चंद्रकांत यादव, आदी यांनी पत्रकात म्हटले आहे.मंत्रिमहोदय गप्प कालोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य प्रशासनाने जिल्ह्यातील मंत्र्यांना काही माहिती दिली होती की नाही? जर तुम्हाला या बदल्यांची माहिती होती तर तुम्ही गप्प का राहिलात? असा सवाल कृती समितीने उपस्थित करीत तुमचे वजन वापरून बदल्या रद्द करून त्यांची मुदत आहे तोवर त्यांना कोल्हापुरात कार्यरत ठेवावे अशी मागणी केली.

टॅग्स :Transferबदलीkolhapurकोल्हापूर