शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या, आता नंबर कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:25 IST

transfars, seniorofficers, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल मंत्र्यांचे शासनदरबारी वजन आहे की नाही? : बदल्या रद्द करा

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.पत्रकात म्हटले आहे की, महापूर आणि कोरोना संसर्गाच्या संकटत जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे साक्षात देवदूतच कोल्हापूरला मिळाले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख आणि शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तर या दीड वर्षात कोल्हापुरातील सर्व काळे धंदे नेस्तनाबूत करून काळे धंदेवाल्यांना मोक्का कायद्याचा हिसका दाखवून समाजाला घातक असणाऱ्या सर्व काळ्या धंद्यांचा बीमोड केला.

इतकेच नव्हे तर खुद्द पोलीस खात्यात असणाऱ्या काही घरभेदी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करून पोलीस खात्याची स्वच्छता केली. या सर्वांची दखल घेऊन राज्य पोलीस खात्याने प्रेरणा कट्टे यांच्या पथकास एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले.त्यांची बदली हा लोकशाहीविरोधातील अवैध काळे धंदेवाल्यांचा विजय मानावा लागेल. ही चर्चा चालू आहे तोवरच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक तडकाफडकी बदली झाली. त्यांनी कार्यभार स्वीकारून दीड वर्ष झाले नाही तोवर बदली.

राज्य प्रशासनाला कोल्हापूरमध्ये असे लोकाभिमुख, प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी का नको आहेत, हेच समजत नाही, असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, माणिक मंडलिक,महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, अजित सासने, कॉ. चंद्रकांत यादव, आदी यांनी पत्रकात म्हटले आहे.मंत्रिमहोदय गप्प कालोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य प्रशासनाने जिल्ह्यातील मंत्र्यांना काही माहिती दिली होती की नाही? जर तुम्हाला या बदल्यांची माहिती होती तर तुम्ही गप्प का राहिलात? असा सवाल कृती समितीने उपस्थित करीत तुमचे वजन वापरून बदल्या रद्द करून त्यांची मुदत आहे तोवर त्यांना कोल्हापुरात कार्यरत ठेवावे अशी मागणी केली.

टॅग्स :Transferबदलीkolhapurकोल्हापूर