शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या, आता नंबर कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:25 IST

transfars, seniorofficers, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल मंत्र्यांचे शासनदरबारी वजन आहे की नाही? : बदल्या रद्द करा

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.पत्रकात म्हटले आहे की, महापूर आणि कोरोना संसर्गाच्या संकटत जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे साक्षात देवदूतच कोल्हापूरला मिळाले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख आणि शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तर या दीड वर्षात कोल्हापुरातील सर्व काळे धंदे नेस्तनाबूत करून काळे धंदेवाल्यांना मोक्का कायद्याचा हिसका दाखवून समाजाला घातक असणाऱ्या सर्व काळ्या धंद्यांचा बीमोड केला.

इतकेच नव्हे तर खुद्द पोलीस खात्यात असणाऱ्या काही घरभेदी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करून पोलीस खात्याची स्वच्छता केली. या सर्वांची दखल घेऊन राज्य पोलीस खात्याने प्रेरणा कट्टे यांच्या पथकास एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले.त्यांची बदली हा लोकशाहीविरोधातील अवैध काळे धंदेवाल्यांचा विजय मानावा लागेल. ही चर्चा चालू आहे तोवरच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक तडकाफडकी बदली झाली. त्यांनी कार्यभार स्वीकारून दीड वर्ष झाले नाही तोवर बदली.

राज्य प्रशासनाला कोल्हापूरमध्ये असे लोकाभिमुख, प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी का नको आहेत, हेच समजत नाही, असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, माणिक मंडलिक,महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, अजित सासने, कॉ. चंद्रकांत यादव, आदी यांनी पत्रकात म्हटले आहे.मंत्रिमहोदय गप्प कालोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य प्रशासनाने जिल्ह्यातील मंत्र्यांना काही माहिती दिली होती की नाही? जर तुम्हाला या बदल्यांची माहिती होती तर तुम्ही गप्प का राहिलात? असा सवाल कृती समितीने उपस्थित करीत तुमचे वजन वापरून बदल्या रद्द करून त्यांची मुदत आहे तोवर त्यांना कोल्हापुरात कार्यरत ठेवावे अशी मागणी केली.

टॅग्स :Transferबदलीkolhapurकोल्हापूर