शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

‘प्रधानमंत्री विमा’चा उद्या प्रारंभ

By admin | Updated: May 8, 2015 00:14 IST

पालकमंत्र्यांच्या हस्ते विमापत्रे : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅँकांची ग्वाही; थेट प्रक्षेपण

कोल्हापूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी तीन दिवसांत जिल्ह्णात १ लाख १५ हजार खाती करणार, अशी ग्वाही जिल्ह्णातील ३३० राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी दिली. उद्या, शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होईल.केंद्र सरकारने सुरू केलेल्या या दोन विमा योजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, बॅँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्णातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्या, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्णांत ही योजना सुरू करण्यात येणार असून, कोल्हापूरचा त्यामध्ये समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी गुरुवारपासून राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या सर्व शाखांमधून अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्णातील राष्ट्रीयीकृत बॅँकांची संख्या ३३० आहे. बैठकीला उपस्थित प्रतिनिधींनी सर्व शाखांमधून गुुुरुवारपासून उद्या, शनिवारपर्यंत १ लाख १५ हजार खाती केली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर दिलीदरम्यान, या प्रधानमंत्री विमा व अटल पेन्शन योजनेचा कोल्हापूर जिल्ह्णातील प्रारंभाचा कार्यक्रम शनिवारी (दि. ९) सायंकाळी साडेपाच वाजता शाहूपुरीतील श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवनात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ करण्यात येईल. यावेळी योजनेची माहिती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे योजनेचा प्रारंभ, विमापत्रे आणि पेन्शनच्या पासबुक वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येईल. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्णातील दहा खातेदारांना विमापत्रे आणि पेन्शनच्या पासबुकांचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास बँक आॅफ इंडियाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाचे सरव्यवस्थापक जी. बी. काकडे, कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन् उपस्थित असतील. (प्रतिनिधी) केवळ ३४२ रुपयांमध्ये चार लाखांचा विमाप्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत दोन लाखांचा विमा नैसर्गिक मृत्यूसाठी आहे. १८ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी तो ३३० रुपयांत उतरविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा दोन लाखांचा विमा अपघातात दुखापतीसाठी व अपंगत्वासाठी लागू असणार आहे. हा विमा केवळ १२ रुपयांत वर्षभरासाठी असेल. १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या सर्व शाखांमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.