शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढ; २७ मार्चला विधानभवनावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:12 IST

कोल्हापूर : शेतीपंपाची वीज दरवाढीविरोधात २७ मार्चला विधिमंडळावर राज्यातील लाखो शेतकरी धडक देणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे मोर्चानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर

कोल्हापूर : शेतीपंपाची वीज दरवाढीविरोधात २७ मार्चला विधिमंडळावर राज्यातील लाखो शेतकरी धडक देणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मोर्चानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर शेतकरी जुन्या दरानेही वीज बिले भरणे बंद करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

प्रा. पाटील म्हणाले, महावितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज दरात १ रुपये १६ पैशांवरून १ रुपये ९७ पैसे इतकी दरवाढ केली. याविरोधात कोल्हापूर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून मंत्रालयाला मानवी साखळी घालण्याचा इशारा दिला. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेसाठी वेळ देण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७ जानेवारीला चर्चा करण्याची वेळ दिली; पण त्यादिवशी चर्चा झालीच नाही. त्यानंतर दि. २७ फेबु्रवारीपर्यंत वेळ दिली पण तीही तारीख होऊन गेल्याने आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही १.१६ रुपये दराने बिले भरत आहोत. यंदा अभूतपूर्व उन्हाळा राहणार आहे, अशा परिस्थितीत वीज तोडली तर पिके वाळून जातील याची चिंता आहे.

सरकार आमची दखल घेणार नसेल तर २७ मार्चला विधिमंडळावर राज्यातील शेतकरी धडक देतील. वेळप्रसंगी दोन दिवस त्याठिकाणी ठिय्या मारण्याची आमची तयारी असून जुल्मी दरवाढ मागे घ्यावीच लागेल.मुख्यमंत्र्यांनी कृषी संजीवनी योजना सुरू केली पण ती पुरती फसवी आहे. ‘महावितरण’ने १४० ते २७४ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ केल्याने पोकळ थकबाकी वाढली आहे. त्यावर कृषी संजीवनी योजना लागू करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही योजना फसली असून सात लाख शेतकºयांनी ३६१ कोटींची वसुली झाली आहे म्हणजे एकूण थकबाकीच्या ३.३ टक्के वसुली झाली. यासाठी पोकळ बिले दुरुस्ती करूनच खºया थकबाकीवर ही योजनेचा अंमलबजावणी केली पाहिजे, असे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील, आर. जी. तांबे, जे. पी. लाड, अरुण लाड, विक्रांत पाटील, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.थकबाकी कमी, तरीही...राज्यात वीज गळतीचे प्रमाण सर्वांत कमी व वसुलीत आघाडीवर कोल्हापूर जिल्हा आहे. सांगलीही त्यापाठोपाठ आहे, तरीही शासन शेतकºयांवर अन्याय करणार असेल तर ते खपवून घेणार नसल्याचा इशारा प्रा. पाटील यांनी दिला.