शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

साहित्यामध्ये देश घडविण्याची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:23 IST

कुरुंदवाड : शिक्षणाइतकेच साहित्याला महत्त्व आहे. साहित्य सद्भावना देते. साहित्य माणूस जोडण्याचे, घडविण्याचे काम करतो; देश घडविण्याची शक्ती साहित्यामध्ये ...

कुरुंदवाड : शिक्षणाइतकेच साहित्याला महत्त्व आहे. साहित्य सद्भावना देते. साहित्य माणूस जोडण्याचे, घडविण्याचे काम करतो; देश घडविण्याची शक्ती साहित्यामध्ये आहे. त्यामुळे गावागावांतून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्याचा जागर होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित सातवे संवाद साहित्य संमेलनात संमेलनाध्यपदावरून डॉ. लवटे बोलत होते. स्वागताध्यक्ष सरपंच चंद्रकांत चव्हाण होते. प्रारंभी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल घाटगे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. डॉ. लवटे म्हणाले, जगातले शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी दररोज तयारी करीत असतात; मात्र आपल्या देशात शिक्षक तयारीत असतात. शिक्षण पैसे मिळविण्याचे साधन बनले आहे असे सांगून देशातील शिक्षण पद्धतीत बदल करण्याबाबत परखडपणे मत मांडले. दुसऱ्या सत्रात लॉकडाऊन या कृषी केंद्रित सकारात्मक संदेश देणाऱ्या कादंबरीचे लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रकाश साखरे यांनी मुलाखत घेतली. तिसऱ्या सत्रात कृष्णात कोरवी, भरतकुमार पाटील यांचे कथाकथन झाले, तर अखेरच्या सत्रात कवयित्री माणिक नागावे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन झाले. संमेलनापूर्वी संयोजकांनी उपस्थितांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

यावेळी उपसरपंच संभाजी कोळी, विलास चौगुले, बाळासो हेरवाडे, सुनंदा कुलकर्णी, लता काकडे, राजगोंडा पाटील, दिलीप कोळी, आदी उपस्थित होते. डॉ. कुमार पाटील यांनी स्वागत केले, तर साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी प्रास्ताविक केले. महावीर कांबळे यांनी आभार मानले.

फोटो - ०७०३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पदावरून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मार्गदर्शन केले.