शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

पोटनियम दुरुस्तीने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक लढविण्यासाठी सत्तारूढ गटाने केलेल्या पोटनियम दुरुस्तीने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक लढविण्यासाठी सत्तारूढ गटाने केलेल्या पोटनियम दुरुस्तीने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. सलग तीन वर्षे ४० हजार लिटर दूध पुरवठा व दहा टन पशुखाद्याच्या अटीने इच्छुकांची दांडी गुल झाली असून, सत्तारूढ गटाची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

सहकारी संस्थांमध्ये पोटनियमाला खूप महत्त्व आहे, पोटनियमानुसारच संस्थेचा कारभार करावा लागतो. ‘गोकुळ’सारख्या जिल्हास्तरीय संस्थेत त्याचे महत्त्व अनेक वेळा अधोरेखित झाले आहे. सत्तारूढ गट आपल्या सोयीचा पोटनियम करून विरोधकांना गाफील ठेवण्याची खेळी करतो. ‘गोकुळ’मध्येही असेच काही घडले आहे. सत्तारूढ गटाने दूध पुरवठा व पशुखाद्याची अट घालून अनेकांना घरी बसविले आहे. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत मागील तीन वर्षांत २०, २५, ३० हजार लिटर दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधीला उमेदवार म्हणून उभे राहता येत होते. त्यावेळी पशुखाद्याची अट नव्हती. सत्तारूढ गटाने बदललेल्या पोटनियमाची अनेकांना माहितीच नव्हती. उमेदवारी अर्जासोबत पोटनियमाची प्रतही निवडणूक यंत्रणेने दिली होती. अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत अर्ज दाखल केले आणि छाननीत ते अपात्र ठरले. सत्तारूढ गटाने पोटनियमात बदल करून विरोधकांसह इतर इच्छुकांनाही झटका दिला. निवडणुकीच्या वर्षापासून मागील तीन वर्षे सलग प्रतिवर्षी ४० हजार लिटर दूध पुरवठा व दहा टन पशुखाद्याची अट घातली. दूध पुरवठ्याची अट दुप्पट केल्याने अनेक जण रिंगणाबाहेर राहिले आहेत.

पिशवीतील संस्थांचा मतासाठीच वापर

‘गोकुळ’च्या विद्यमान संचालकांसह सत्तारूढ गटाच्या नेत्यांच्या पिशवीतील (कागदोपत्री) संस्थांची संख्या कमी नाही. पोटनियम दुरुस्तीमागे संघाचे दूध वाढीचे हित पाहिल्याचा दावा सत्तारूढ गट करीत आहे. मात्र, तोच निकष संस्था सभासद करताना व मतदानाचा हक्क देण्यासाठी का नाही? त्यामुळे पिशवीतील संस्था या मताच्या गोळाबेरजेसाठीच आहेत.

राखीव गटातील इच्छुकांत अस्वस्थता

महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती या जागांसाठी केवळ प्राथमिक दूध संस्थेचा सभासद असायला हवा, असा मागील निवडणुकीत नियम होता. मात्र, या निवडणुकीत या गटातील इच्छुकांना केवळ मतदार यादीत नाव नसले तरी चालेल, एवढीच सवलत दिली आहे, उर्वरित अटी सर्वसाधारण गटाप्रमाणेच ठेवल्याने अस्वस्थता आहे.