शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

पोटनियम दुरुस्तीने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक लढविण्यासाठी सत्तारूढ गटाने केलेल्या पोटनियम दुरुस्तीने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक लढविण्यासाठी सत्तारूढ गटाने केलेल्या पोटनियम दुरुस्तीने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. सलग तीन वर्षे ४० हजार लिटर दूध पुरवठा व दहा टन पशुखाद्याच्या अटीने इच्छुकांची दांडी गुल झाली असून, सत्तारूढ गटाची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

सहकारी संस्थांमध्ये पोटनियमाला खूप महत्त्व आहे, पोटनियमानुसारच संस्थेचा कारभार करावा लागतो. ‘गोकुळ’सारख्या जिल्हास्तरीय संस्थेत त्याचे महत्त्व अनेक वेळा अधोरेखित झाले आहे. सत्तारूढ गट आपल्या सोयीचा पोटनियम करून विरोधकांना गाफील ठेवण्याची खेळी करतो. ‘गोकुळ’मध्येही असेच काही घडले आहे. सत्तारूढ गटाने दूध पुरवठा व पशुखाद्याची अट घालून अनेकांना घरी बसविले आहे. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत मागील तीन वर्षांत २०, २५, ३० हजार लिटर दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधीला उमेदवार म्हणून उभे राहता येत होते. त्यावेळी पशुखाद्याची अट नव्हती. सत्तारूढ गटाने बदललेल्या पोटनियमाची अनेकांना माहितीच नव्हती. उमेदवारी अर्जासोबत पोटनियमाची प्रतही निवडणूक यंत्रणेने दिली होती. अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत अर्ज दाखल केले आणि छाननीत ते अपात्र ठरले. सत्तारूढ गटाने पोटनियमात बदल करून विरोधकांसह इतर इच्छुकांनाही झटका दिला. निवडणुकीच्या वर्षापासून मागील तीन वर्षे सलग प्रतिवर्षी ४० हजार लिटर दूध पुरवठा व दहा टन पशुखाद्याची अट घातली. दूध पुरवठ्याची अट दुप्पट केल्याने अनेक जण रिंगणाबाहेर राहिले आहेत.

पिशवीतील संस्थांचा मतासाठीच वापर

‘गोकुळ’च्या विद्यमान संचालकांसह सत्तारूढ गटाच्या नेत्यांच्या पिशवीतील (कागदोपत्री) संस्थांची संख्या कमी नाही. पोटनियम दुरुस्तीमागे संघाचे दूध वाढीचे हित पाहिल्याचा दावा सत्तारूढ गट करीत आहे. मात्र, तोच निकष संस्था सभासद करताना व मतदानाचा हक्क देण्यासाठी का नाही? त्यामुळे पिशवीतील संस्था या मताच्या गोळाबेरजेसाठीच आहेत.

राखीव गटातील इच्छुकांत अस्वस्थता

महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती या जागांसाठी केवळ प्राथमिक दूध संस्थेचा सभासद असायला हवा, असा मागील निवडणुकीत नियम होता. मात्र, या निवडणुकीत या गटातील इच्छुकांना केवळ मतदार यादीत नाव नसले तरी चालेल, एवढीच सवलत दिली आहे, उर्वरित अटी सर्वसाधारण गटाप्रमाणेच ठेवल्याने अस्वस्थता आहे.