शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

‘एमआयडीसी’तील ४० टक्के बांधकामाच्या निर्णयास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:28 IST

उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात आर्थिक मंदीची स्थिती असल्याने भूखंडांवर ४० टक्के बांधकामाची सक्ती औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी शासनाकडे केली होती. त्यावर

ठळक मुद्देऔद्योगिक विकास महामंडळाचे परिपत्रकजुनाच निर्णय लागू करण्याची उद्योजकांची मागणी

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) मध्यम व लघू उद्योजकांना त्यांच्या भूखंडावर बांधकाम करण्याबाबत १० ते २० टक्क्यांपर्यंतचा जुनाच निर्णय लागू करावा, अशी मागणी कोल्हापुरातील उद्योजकांनी शुक्रवारी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीतील भूखंडावर ४० टक्के बांधकाम करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. त्यावर उद्योजकांच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी संबंधित मागणी केली.

उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात आर्थिक मंदीची स्थिती असल्याने भूखंडांवर ४० टक्के बांधकामाची सक्ती औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी शासनाकडे केली होती. त्यावर २१ जून २०१९ पूर्वी ज्या भूखंडधारकांनी इमारत पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे, तसेच त्यांचे उत्पादन सुरू असल्यास ४० टक्के बांधकामाची सक्ती होणार नाही. ज्या भूखंडांवर उत्पादन सुरू नाही, अशा भूखंडांवर तातडीने ४० टक्के बांधकाम करावे लागणार आहे. अन्यथा ते भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी हे परिपत्रक बुधवारी (दि. २७) काढले आहे. या निर्णयामुळे २१ जूनआधीच्या उद्योजकांना दिलासा मिळणार असला, तरी नवीन बांधकाम करणाऱ्या उद्योजकांना फटका बसणार आहे. त्यामुळे ४० टक्के बांधकामाबाबतचा सध्याचा निर्णय सर्वांसाठी लागू करावा; अथवा पूर्वीचा १० ते २० टक्क्यांपर्यंतचा बांधकामाचा जुना निर्णय लागू करावा, अशी मागणी उद्योजकांमधून होत आहे.

दरम्यान, याबाबत ‘एमआयडीसी’चे म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांना दूरध्वनी केला असता, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. 

औद्योगिक विकास महामंडळाने सध्याचा घेतलेला नवा निर्णय नवीन बांधकाम करणाºया उद्योजकांसाठी अन्यायकारक ठरणारा आहे. त्यामुळे या भूखंडांवरील बांधकामाबाबत कायमची स्थगिती देऊन हा निर्णय सर्व उद्योजकांसाठी लागू करण्यात यावा.- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.........................................................................................................सध्या उद्योजक हे आर्थिक मंदीचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत उद्योजकांना पाठबळ देण्याऐवजी बांधकाम सक्तीबाबतचा निर्णय घेणे हे अन्यायकारक आहे. या नव्या निर्णयाऐवजी जुनाच निर्णय लागू करावा, अशी मागणी आम्ही उद्योजकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.- अतुल पाटील, अध्यक्ष, ‘स्मॅक’...............................................................................................................या नव्या निर्णयामुळे २१ जूनआधीच्या उद्योजकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, नवीन बांधकाम करणा-या उद्योजकांसाठी हा निर्णय मारक आहे. त्यांचा आणि आर्थिक मंदीच्या स्थितीचा विचार करून औद्योगिक विकास महामंडळाने या नव्या निर्णयाबाबत फेरविचार करावा.- अतुल आरवाडे, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी