शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

तांत्रिक कारणामुळे समीरची सुनावणी पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2015 01:17 IST

पानसरे हत्या प्रकरण : पोलिसांवरील आरोप फेटाळले

ेकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन प्रभात संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी झाली नाही. ती आता ३० डिसेंबरला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, समीरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व पत्राद्वारे पोलिसांवर न्यायालयात केलेले आरोप प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयाने निकाली काढत, हे आरोप बनावट असल्याचे स्पष्ट केले. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबरला आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. याप्रकरणी त्याला म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारची तारीख कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला पत्राद्वारे दिली होती. त्यानुसार समीर हजर होणार होता; परंतु पोलीस बंदोबस्ताच्या कारणामुळे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्ही.सी.)द्वारे न्यायाधीशांबरोबर समीरचा संवाद साधण्याचा निर्णय झाला. यासाठी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी न्यायमूर्ती आर. डी. डांगे आले; पण १५ ते २० मिनिटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. डांगे यांनी, समीर गायकवाडची सुनावणी ही ३० डिसेंबरला होईल, असे समीरचे वकील अ‍ॅड. एस. व्ही. पटवर्धन, अ‍ॅड. एम. एम. सुवासे, अ‍ॅड. संदीप आपशिंगेकर व अ‍ॅड. आनंद देशपांडे, आदींसह सहायक सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांना सांगितले. त्यानंतर डांगे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षातून बाहेर पडले. यावेळी अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा, दिलीप पवार, उदय नारकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, समीर गायकवाडने २१ आॅक्टोबर २०१५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ‘तुला २५ लाख रुपये देतो, आम्ही सांगतो ती नावे घे’ असा आरोप करून पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. यानंतर २५ आॅक्टोबरला मंडल अधिकारी यांनी कळंबा कारागृहाचे तुरुंगाधिकारी यांना याबाबत तक्रार केल्याचे पत्र पाठविले. तुरुंगाधिकारी यांनी हे पत्र न्यायालयाला पाठविले. न्यायालयाने या पत्राची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी याचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीमधील समीरने केलेल्या तक्रारीसंदर्भात फुटेज पाहून न्यायालयाला अहवाल सादर केला. त्याचा अभ्यास करून न्यायमूर्तींनी ही तक्रार निकाली काढली. समीरने ही तक्रार त्या दिवशी केली असल्यामुळे ती बनावट असल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. समीर बोललाच नाही... समीर गायकवाडने व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व पत्राद्वारे पोलिसांवर आरोप केले होते. ते म्हणजे कळंबा कारागृहातून न्यायालयाकडे जात असताना ‘एका पोलिसाने माझ्या कानात, तुला २५ लाख रुपये देतो. तुला आम्ही चारजणांची नावे सांगतो, ती तू घे,’ असे सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता. याचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तपास अधिकाऱ्यांनी तपास केला असता त्यामध्ये ‘ज्या-ज्या दिवशी समीरला न्यायालयात बंदोबस्तात पोलिसांनी आणले, तेव्हा त्याच्याबरोबर कोणताही पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी बोलला नसल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या फुटेजवरून तपास अधिकारी यांना दिसून आले. यावरून समीर कोणाशीही बोलला नसल्याचे स्पष्ट होत आहे.