शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

तांत्रिक कारणामुळे समीरची सुनावणी पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2015 01:17 IST

पानसरे हत्या प्रकरण : पोलिसांवरील आरोप फेटाळले

ेकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन प्रभात संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी झाली नाही. ती आता ३० डिसेंबरला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, समीरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व पत्राद्वारे पोलिसांवर न्यायालयात केलेले आरोप प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयाने निकाली काढत, हे आरोप बनावट असल्याचे स्पष्ट केले. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबरला आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. याप्रकरणी त्याला म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवारची तारीख कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला पत्राद्वारे दिली होती. त्यानुसार समीर हजर होणार होता; परंतु पोलीस बंदोबस्ताच्या कारणामुळे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्ही.सी.)द्वारे न्यायाधीशांबरोबर समीरचा संवाद साधण्याचा निर्णय झाला. यासाठी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी न्यायमूर्ती आर. डी. डांगे आले; पण १५ ते २० मिनिटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. डांगे यांनी, समीर गायकवाडची सुनावणी ही ३० डिसेंबरला होईल, असे समीरचे वकील अ‍ॅड. एस. व्ही. पटवर्धन, अ‍ॅड. एम. एम. सुवासे, अ‍ॅड. संदीप आपशिंगेकर व अ‍ॅड. आनंद देशपांडे, आदींसह सहायक सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांना सांगितले. त्यानंतर डांगे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षातून बाहेर पडले. यावेळी अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा, दिलीप पवार, उदय नारकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, समीर गायकवाडने २१ आॅक्टोबर २०१५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ‘तुला २५ लाख रुपये देतो, आम्ही सांगतो ती नावे घे’ असा आरोप करून पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. यानंतर २५ आॅक्टोबरला मंडल अधिकारी यांनी कळंबा कारागृहाचे तुरुंगाधिकारी यांना याबाबत तक्रार केल्याचे पत्र पाठविले. तुरुंगाधिकारी यांनी हे पत्र न्यायालयाला पाठविले. न्यायालयाने या पत्राची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी याचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीमधील समीरने केलेल्या तक्रारीसंदर्भात फुटेज पाहून न्यायालयाला अहवाल सादर केला. त्याचा अभ्यास करून न्यायमूर्तींनी ही तक्रार निकाली काढली. समीरने ही तक्रार त्या दिवशी केली असल्यामुळे ती बनावट असल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. समीर बोललाच नाही... समीर गायकवाडने व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व पत्राद्वारे पोलिसांवर आरोप केले होते. ते म्हणजे कळंबा कारागृहातून न्यायालयाकडे जात असताना ‘एका पोलिसाने माझ्या कानात, तुला २५ लाख रुपये देतो. तुला आम्ही चारजणांची नावे सांगतो, ती तू घे,’ असे सांगितल्याचा गौप्यस्फोट केला होता. याचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तपास अधिकाऱ्यांनी तपास केला असता त्यामध्ये ‘ज्या-ज्या दिवशी समीरला न्यायालयात बंदोबस्तात पोलिसांनी आणले, तेव्हा त्याच्याबरोबर कोणताही पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी बोलला नसल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या फुटेजवरून तपास अधिकारी यांना दिसून आले. यावरून समीर कोणाशीही बोलला नसल्याचे स्पष्ट होत आहे.