शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

टपालपेट्या ठरल्या नाममात्र

By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST

पत्रांची पाटी कोरी : माहिती-तंत्रज्ञानामुळे जग जवळ

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  -लॉर्ड डलहौसीने पोस्टाची संकल्पना सुरू केली आणि इंग्रजांच्या राजवटीत पोस्टाचे व्यवहार सुरू झाले. पत्र, तार कालांतराने मनिआॅर्डर व स्पीड पोस्ट सुरू झाले. पत्राने बहुतेक वेळा खुशाली कळत असे. परंतु काळाच्या ओघात पोस्टाच्या काही सुविधा वगळल्या, तर पत्र पाठवण्याची प्रक्रिया फारच मंदावली आहे. इंटरनेटमुळे जगाला गती आली आहे आणि जग इतके जवळ आले आहे की, सातासमुद्रापलिकडची माहिती काही क्षणात उपलब्ध होते. त्यामुळे पत्र सांभाळणाऱ्या टपालपेट्या आता नाममात्र ठरल्या आहेत. रत्नागिरीत १९३८ला पहिले पोस्ट कार्यालय सुरू झाले. जिल्ह्यात ८० मुख्य डाकघर, तर ५८५ उपडाकघर शाखा आहेत. पत्रवहन करणाऱ्या २२०० टपालपेट्या असून, ८८६ पोस्टमन आहेत. भारतातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आता पोस्ट खातेही हायटेक झाले आहे. स्पीडपोस्ट, कॅश आॅन डिलिव्हरी, बल्क मेल, रजिस्टर्ड सेवा मनिआॅर्डरलाही आधुनिक रूपडे लाभले आहे. वेगवान स्पर्धेच्या युगात आता मनिआॅर्डर सेवाही ई - मनिआॅर्डर, वेस्ट युनियन मनिआॅर्डर, इन्स्टंट मनिआॅर्डरबरोबर मोबाईल मनिआॅर्डर सेवा सुरू केली आहे. साहजिकच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पोस्ट कालबाह्य ठरू लागल्याची ओरड होत असली तरी तंत्रज्ञानाचाच आविष्कार असलेल्या टपालसेवेने व्यावसायिकतेतही यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. संदेश पोहोचवण्यासाठी आंतरदेशीय किंवा पोस्टकार्डव्दारे खुशाली कळवण्यात येत असे. हजारो पत्रांचा बटवडा टपालपेट्यांमधून होत असे. मात्र, इंटरनेटमुळे पत्रापेक्षा जास्त एसएमएस, सोशल मीडिया उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात टपालपेट्यांचा वापर फारसा होत नाही. पत्रव्यवहार कमी झाले तरी दूरध्वनीबील वितरणसुविधा मात्र पोस्टाव्दारे होत आहे. शिवाय आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी टपालखात्याने ‘ई’ मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांशी करार केला आहे. त्या करारातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पोस्ट खात्याला थोडासा का होईना हातभार लागला आहे.एकूणच पत्रव्यवहार कमी झाला तरी टपालखाते आता ई मार्केटिंग व्यवसायाकडे वळले आहे. त्यामुळे गावोगावी नाक्यानाक्यावर असलेल्या तांबड्या रंगाच्या टपालपेट्यांचा वापर अल्प होत आहे. कंपन्यांकडून रजिस्टर्ड पत्र पाठविणे सुरू असले तरी रजिस्टर्ड पत्र पाठविण्यासाठी पोस्टात जावे लागते. त्यामुळे टपालपेट्यांचा वापर होत नाही. ई-मेल, सोशल मिडिया, मोबाइलच्या गराड्यात टपालपेट्या पत्राच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत.आॅनलाईन शॉपिंगशी पोस्टाची गट्टीस्नॅपडील, अ‍ॅमेझॉन, मॅफटॉल सारख्या दहा कंपन्यांशी टायप केल्यामुळे टपालखात्याला गतवर्षी ५०० कोटीचा महसूल प्राप्त झाला होता. आता आॅनलाईन खरेदीचा फंडा वाढला आहे. घरबसल्या लोक वस्तूंचे बुकींग करीत आहेत. या वस्तूंचे वितरण मात्र टपालखात्यातर्फे सुरू आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांलाही त्याच्या आवडीची वस्तू टपालखात्यामुळे घरपोच मिळू लागली आहे. टपाल खात्याचे रत्नागिरीमध्ये बुकींग सेंटर नसले तरी वितरण व्यवस्था मात्र अचूक करण्यात येत आहे. मोबाईल, कपडे, आर्टीफिशियल ज्वेलरी, भांडी तसेच अनेक विविध वस्तूंचे वितरण सुरू आहे. आॅनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्यामुळे यावर्षी टपाल खात्याला एक हजार कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. थोडक्यात आता पोस्टानेही ई-खरेदीला आपल्या पध्दतीने हातभार लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.