शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वळंजू यांचे ‘बाजार’चे पद धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:41 IST

कारवाई भोवणार : समिती जिल्हा उपनिबंधकांकडे शिफारस करणार; संचालकात गट

कोल्हापूर : बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू यांचे संचालकपद धोक्यात आले आहे. समितीच्या नुकसानीबद्दल त्यांच्यासह २२ जणांवर २२ लाख ८७ हजारांची जबाबदारी निश्चित केल्याने पणन कायदा ‘कलम १७’ नुसार त्यांच्या पदावर गंडांतर येऊ शकते. समितीने पद रद्द करण्याची शिफारस पणन संचालकांकडे करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांनी १८ माजी संचालक व चार सचिवांवर २२ लाख ८७ हजार ३६१ रुपयांच्या जबाबदारी निश्चिती केली आहे. या विरोधात माजी संचालकांनी पणन संचालकांकडे दाद मागितली होती, पण संचालकांनी ती फेटाळून लावली. त्यानंतर समितीने वसुलीच्या नोटिसा पाठविल्या, पण त्याला दाद न दिल्याने महसुली कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. माजी संचालकांच्या गावातील तलाठ्यांना पत्रे पाठवून त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. तोपर्यंत वारणा-कोडोली येथील पांडुरंग शामराव पाटील यांनी नंदकुमार वळंजू यांच्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी समितीला नोटीस काढली असून वळंूज यांचे पद रद्द करण्याबाबत वरिष्ठांकडे शिफारस करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार समितीच्या संचालक मंडळाची गुरुवारी (दि. २८) बैठक आहे, या सभेच्या अजेंठ्यावर नंदकुमार वळंजू यांचे संचालकपद रद्द करण्याबाबत विषय ठेवला आहे. या शिफारसीबाबत संचालक मंडळातच दोन गट पडल्याची चर्चा सुरू आहे. फेरचौकशी कधी?समितीच्या चौकशीत काही मुद्दे अपुरे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दि. २८ डिसेंबर २०१५ ला फेरचौकशीचे आदेश दिले होते; पण अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पगार व न्यायालयीन खर्च, प्लॉट हस्तांतरणातील तफावत आदी मुद्दे तपासले जाणार आहेत. तक्रारदार असूनही अडचणीतवळंूज यांच्या तक्रारीवरूनच माजी संचालकांच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई झाली. जरी पद रद्दची कारवाई झाली तरी त्यांच्याबद्दल पणन संचालक सहानुभूती दाखवू शकतात; पण २२ लाख जबाबदारी निश्चितीमध्ये पेट्रोल पंप जागा भाडेतत्त्वावर दिल्याने १८ लाख नुकसान झाल्याचा ठपका आहे. यामध्ये वळंजू यांनी कोणत्याच प्रकारचा विरोध केला नसल्याचे चौकशी अहवालात दिसते. त्यामुळे तक्रारदार असूनही ते अडचणीत येऊ शकतात.