शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वळंजू यांचे ‘बाजार’चे पद धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:41 IST

कारवाई भोवणार : समिती जिल्हा उपनिबंधकांकडे शिफारस करणार; संचालकात गट

कोल्हापूर : बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू यांचे संचालकपद धोक्यात आले आहे. समितीच्या नुकसानीबद्दल त्यांच्यासह २२ जणांवर २२ लाख ८७ हजारांची जबाबदारी निश्चित केल्याने पणन कायदा ‘कलम १७’ नुसार त्यांच्या पदावर गंडांतर येऊ शकते. समितीने पद रद्द करण्याची शिफारस पणन संचालकांकडे करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांनी १८ माजी संचालक व चार सचिवांवर २२ लाख ८७ हजार ३६१ रुपयांच्या जबाबदारी निश्चिती केली आहे. या विरोधात माजी संचालकांनी पणन संचालकांकडे दाद मागितली होती, पण संचालकांनी ती फेटाळून लावली. त्यानंतर समितीने वसुलीच्या नोटिसा पाठविल्या, पण त्याला दाद न दिल्याने महसुली कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. माजी संचालकांच्या गावातील तलाठ्यांना पत्रे पाठवून त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. तोपर्यंत वारणा-कोडोली येथील पांडुरंग शामराव पाटील यांनी नंदकुमार वळंजू यांच्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी समितीला नोटीस काढली असून वळंूज यांचे पद रद्द करण्याबाबत वरिष्ठांकडे शिफारस करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार समितीच्या संचालक मंडळाची गुरुवारी (दि. २८) बैठक आहे, या सभेच्या अजेंठ्यावर नंदकुमार वळंजू यांचे संचालकपद रद्द करण्याबाबत विषय ठेवला आहे. या शिफारसीबाबत संचालक मंडळातच दोन गट पडल्याची चर्चा सुरू आहे. फेरचौकशी कधी?समितीच्या चौकशीत काही मुद्दे अपुरे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दि. २८ डिसेंबर २०१५ ला फेरचौकशीचे आदेश दिले होते; पण अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पगार व न्यायालयीन खर्च, प्लॉट हस्तांतरणातील तफावत आदी मुद्दे तपासले जाणार आहेत. तक्रारदार असूनही अडचणीतवळंूज यांच्या तक्रारीवरूनच माजी संचालकांच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई झाली. जरी पद रद्दची कारवाई झाली तरी त्यांच्याबद्दल पणन संचालक सहानुभूती दाखवू शकतात; पण २२ लाख जबाबदारी निश्चितीमध्ये पेट्रोल पंप जागा भाडेतत्त्वावर दिल्याने १८ लाख नुकसान झाल्याचा ठपका आहे. यामध्ये वळंजू यांनी कोणत्याच प्रकारचा विरोध केला नसल्याचे चौकशी अहवालात दिसते. त्यामुळे तक्रारदार असूनही ते अडचणीत येऊ शकतात.