शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

सकारात्मकताच आरोग्याची गुरूकिल्ली : डॉ. वंदना गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST

चंदगड : कोरोना महामारीमुळे सर्वांची मानसिकताच बदलली, अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने आरोग्य बिघडले. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, ...

चंदगड : कोरोना महामारीमुळे सर्वांची मानसिकताच बदलली, अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने आरोग्य बिघडले. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, छंद जोपासा, सकारात्मकता हीच कोरोनाविरुध्दची यशस्वी लढाई आहे, असे मत डॉ. वंदना गुरव यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ऑनलाईन कोरोना प्रबोधनपर व्याख्यानमालेत ‘कोरोना काळातील आरोग्य संर्वधन’ या विषयावर त्या बोलत होत्या.

डॉ. गुरव म्हणाल्या, स्वच्छतेच्या सवयी आयुष्यभर आरोग्यपूर्ण ठरतात. कोरोना काळात भरपूर खायला हवे, अधिक काळासाठी उपाशी राहू नका, ताजे जेवण घ्या, मी आजाराला हरविण्यासाठी खायला पाहिजे ही इच्छाशक्ती बाळगूनच यशस्वी व्हाल. या रोगाला टक्कर देण्यासाठी सकस आहार, व्यायाम, विश्रांती व आवश्यक झोप यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक आरोग्य, ताणतणावापासून दूर राहा आणि धीट बना, असा सल्लाही यावेळी डॉ. गुरव यांनी दिला.

डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रस्तावना करून ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ या शिवाजी विद्यापीठांतर्गत राबविल्या जाणाऱ्या अभियानाचे स्वरूप सांगून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

अशोक जाधव म्हणाले, कोरोनाने आपल्या सर्वांना घरी बसवले. पण, तत्रंज्ञानामुळे आपण एकत्र आलो आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र. प्राचार्य पी. ए. पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. सी. एल. तेली आदी उपस्थित होते. डॉ. जे. जे. व्हटकर यांनी आभार मानले.