शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

पोपटराव पवार : कृषी उत्सवात आव्हान; तर आत्महत्या बंद होतील

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

पॅकेज बंद करा; हमीभाव द्या

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देण्यात येणारी पॅकेजीस बंद करून त्यांच्या शेतीमालाला हमीभाव दिल्यास शेती किफायतशीर होईल व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपोआप बंद होतील, याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असे आवाहन आदर्श ग्राम योजना प्रकल्पाचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी केले. श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या ‘कृषी उत्सव’च्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. पवार म्हणाले, स्वामीजींनी उभारलेला हा लोकोत्सव देशाला आदर्शवत असून येथील संदेश घेऊन शेतकरी आपले जीवनमान निश्चितच उंचावतील. आजपर्यंत अनेक कृषी मेळावे पाहिले; पण हा आगळावेगळा मेळावा आहे. येथे प्रात्यक्षिक आहे, बिघडलेल्या गावाबरोबर मॉडेल गावाची उभारणीही त्यांनी केलेली आहे. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे जाण्यास सांगितले होते, त्यांच्या संकल्पनेत गावसभेला महत्त्व होते; पण आता ७० टक्के गावसभा या कागदावरच होतात. ग्रामपंचायत हे विकासाचे मंदिर असते; पण राजकारणाने मंदिराचे तुकडे होताना आपण पाहतो, अशी खंत व्यक्त केली. योजना चांगल्या आहेत; पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. या योजनेत हात मारणाऱ्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असेही ते म्हणाले. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या कार्याचे कौतुक करीत खासदार सुरेश अंगडी म्हणाले, आजचे तरुण शेती सोडून सरकारी नोकरीच्या मागे लागले आहेत. त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असून, अशा प्रकारचा कृषी उत्सव निश्चितच तरुणांमध्ये शेतीची गोडी निर्माण करील. सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनल्याचे सांगत ‘अग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे शेती उत्पन्नवाढीचे शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. रासायनिक खतांचा मारा करीत उत्पन्न वाढले; पण जमिनीचा पोत ढासळला आहे. यासाठी सेंद्रिय शेती गरजेची आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू किसन लवांडे, एस. बी. दंडीन, महेश शर्मा, माजी केंद्रीय राज्यमंत्री बसनगौडा पाटील, माजी आमदार सा. रे. पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नात राजश्री चौधरी, आदी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीही गर्दीचा उच्चांकमहोत्सवाला आज, दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर शेती, त्यातील आधुनिक तंत्रज्ञान व नवनवे प्रयोग यांची माहिती उपस्थित वक्त्यांनी दिली. देशभरातून विविध राज्यांमधील श्री काडसिद्धेश्वर महाराजांचे भक्त आले होते. त्याचबरोबर उत्सवस्थळी आलेल्या पाहुण्यांसाठी उत्कृष्ट बैठक व्यवस्था केली होती. प्रशस्त मंडप व अतिशय शिस्तबद्ध नियोजनाने लाखो लोकांची उपस्थिती असतानाही कोठेही विस्कळीतपणा दिसला नाही. लखपती शेती :सर्वांचे आकर्षण या संस्कृती उत्सवाने सर्वांना भुरळ पाडली आहे. दुसऱ्या दिवशी कमालीची गर्दी होती; पण यामध्ये सर्वांचे आकर्षण ठरले ते लखपती शेती. दिवसभर ही शेती पाहण्यासाठी लोटच्या लोट तिकडे जात होते. संस्कृती उत्सवात आजसकाळी आठ वाजता : वारकरी उत्सवांतर्गत व्यासपीठ, ग्रंथ, वीणा पूजनाने प्रारंभसकाळी नऊ वाजता : ज्ञानेश्वरीचे पारायणसकाळी साडेअकरा वाजता : परिसंवादाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते, विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष विश्वनाथ कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.देशी गाई, बैल यांचे प्रदर्शन व स्पर्धा तसेच शंभर जातींच्या देशी श्वानांचे प्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे.दुपारी तीन वाजता : स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी व माऊली अश्वरिंगण सोहळा होईल.सायंकाळी साडेसात वाजता : हरिकीर्तनपारंपरिक नृत्याविष्कार उत्सवात आजची सायंकाळ पारंपरिक नृत्याविष्काराने रंगली. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदींसह देशाच्या अन्य भागांतून आलेल्या १९ संघ सहभागी झाले होते.