शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळीने भागतेय गरीब, गरजूंची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST

कोल्हापूर : वयाची सत्तरी पार केलेली भाजी विक्रेते, मोठमोठ्या बंगल्यांचे सिक्युरिटी गार्ड ज्यांनी कित्येक दिवस आपल्या घराचे, पोराबाळांचे ...

कोल्हापूर : वयाची सत्तरी पार केलेली भाजी विक्रेते, मोठमोठ्या बंगल्यांचे सिक्युरिटी गार्ड ज्यांनी कित्येक दिवस आपल्या घराचे, पोराबाळांचे तोंडही पाहिले नाही, रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर माता, त्यांचे नातेवाईक, परगावहून आलेले प्रवासी, लक्ष्मीपुरीत राबणारे हमाल, कामगार, बेवारस लोक, फिरस्ते, भिकारी, अशा सगळ्या घटकांतील नागरिकांच्या पोटाची भूक शिवभोजन थाळीतून भागवली जात आहे. मोफत दिल्या जाणाऱ्या अन्नामुळे त्यांना उपाशीपोटी झोपावे लागत नाही, हेच सरकारचे यश म्हणावे लागेल.

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने गरीब, गरजूंसाठी राज्य शासनाने महिन्याभरासाठी शिवभाेजन थाळी मोफत दिली आहे. आता जिल्ह्याला रोज ६ हजार थाळ्यांना मान्यता देण्यात आली आहे; पण रांगेत पाहिले, तर अगदी दुचाकी वाहनांवरून आलेले, कमावत्या कुटुंबातील, चांगले कपडे घातलेले लोकही दिसत आहेत. ही थाळी खरंच गरजूंपर्यंत पोहोचते का, की त्याचा इतर लोकच लाभ घेतात, हे पाहण्यासाठी शनिवारी दुपारी शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शिवभोजन केंद्रांवर ‘लोकमत’च्या वतीने रिॲलिटी चेक करण्यात आले. यावेळी अनेक लाेक चांगल्या कुटुंबातील, कमावते असले तरी काही ना काही अडचणींमुळे ते घरी जाऊ शकत नाहीत, रोज हॉटेलचे महागडे अन्न परवडत नाही, गरजेची बाब म्हणून शिवभोजन थाळीचा लाभ घेत असल्याचे दिसून आले.

पूर्वी थाळींची संख्या आणि वेळही कमी होती, जेवण लवकर संपायचे, उपाशी बसायची पाळी यायची. त्यामुळे गरीब सगळ्यांच्या आधी येथे येऊन थांबलेले दिसले. वितरणाला सुरुवात झाली की, केंद्राचे लोक शिवभोजन लिहिलेल्या फलकासमोर लाभार्थ्याचे छायाचित्र, त्याचा मोबाइल नंबर घेऊन जेवणाची पाकिटं देत होते.

--

वेळ : सकाळी १०.३० वा. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळील अण्णा शिवभोजन केंद्राबाहेर फिरस्ते, भिकारी यांच्यासह हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागलेल्या. येथे लक्ष्मीपुरीतील हमाल, भाजी विक्रेते, शिवाजी उद्यमनगरातील कामगार, दवाखान्यात उपचार घेत असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक अगदी तेथे काम करणाऱ्या आया, मावशी, अशा वेगवेगळ्या घटकांतील लोक जेवण घेऊन जात होते. अगदी सफारी, टी-शर्ट घालून गाडीवरून आलेले लोकही रांगेत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना लक्षात आले की, कुटुंबियांना कोरोना होईल, या धास्तीने ते कामाच्या िठिकाणीच राहत होते. काही लोक परगावचे होते. हॉटेलचे ६०-७० रुपयांचे जेवण परवडत नाही.

---

वेळ : सकाळी ११.३० वा.

परीख पुलाजवळील शिवभोजन केंद्रासमोरही भल्यामोठ्या रांगा, मुख्यत्वे परगावहून आलेल्या नागरिकांची गर्दी. राजारामपुरीतील कामगार ज्यांचा सध्या रोजगार बंद आहे. गार्ड, रेल्वेतून कोल्हापुरात येणारे फिरस्ते, महिला यांच्यासाठी हे शिवभोजन केंद्रच मोठे आधार होते. आम्हाला आता रोजगार नाही, मालक जबाबदारी घ्यायला तयार नाही, दुकाने बंद. या मोफत जेवणामुळे किमान एक वेळ तरी आम्ही पोटभर जेवू शकतो याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

--

वेळ : दुपारी २.३० वा. गंगावेश येथील सर्वाधिक गर्दी असलेल्या केंद्रावर जवळपास सर्व थाळ्यांचे वितरण झाले होते. केंद्रचालक धैर्यशील आयरेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की, अनेक नागरिकांकडे थाळीसाठी आकारण्यात आलेले ५ रुपयेसुद्धा नसायचे. त्यामुळे अनेकदा आम्ही मोफत जेवण दिले आहे. लोकांना कामधंदा, रोजगार नसताना जेवण तरी मिळते. त्यामुळे शासनाने मोफतचा निर्णय घेऊन खूप चांगले पाऊल उचलले आहे.

-

आमचा सिक्युरिटी गार्डचा व्यवसाय आहे, पाच- सहा कर्मचारी कित्येक दिवस घरी गेलेले नाहीत. एवढ्या लोकांसाठी रोज हॉटेलच्या जेवणाचा खर्च परवडत नाही. त्यांच्यासाठी मी ही थाळी नेत आहे.

-भारत भोसले

--

मुलगा, सून शिंगणापूरला राहतात, मी लक्ष्मीपुरीत रोज लोकांची भाजी विकत बसते. गावाकडं जाणं परवडत नाही. रोज हे शिवभोजन घेऊन जेवते.

-शांताबाई घोरपडे

--

शासनाने ही थाळी सुरू करून गरीब, गरजूंना खरंच दिलासा दिला आहे. त्याचा लाभ योग्य व्यक्तींना मिळतो याचे आम्हाला समाधान आहे. विशेषत: अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण, नातेवाईक यांची थाळीमुळे मोठी सोय होते.

-अमित सोलापूरे (केंद्रचालक)

--

मुलगी दवाखान्यात ॲडमिट आहे. गावाकडून डबाच आला नाही. या थाळीमुळे आमची गैरसोय झाली नाही. नाही तर उपाशीच राहावं लागलं असतं.

-मोहन पवार

-