शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी तंत्रज्ञांकडून प्रदूषणाची पाहणी : पर्यावरण मंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:12 IST

कोल्हापूर : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दौऱ्यात चार परदेशी तंत्रज्ञही सहभागी असून, त्यांनी पंचगंगा प्रदूषणाच्या काही ठिकाणांची सोमवारी पाहणी केली. या तंत्रज्ञांच्या कंपनीचा सौदी अरेबिया येथे मोठा प्रकल्प असून महाराष्ट्रामध्ये ५00 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारण्यासाठी ते इच्छुक असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तंत्रज्ञांशी ...

कोल्हापूर : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दौऱ्यात चार परदेशी तंत्रज्ञही सहभागी असून, त्यांनी पंचगंगा प्रदूषणाच्या काही ठिकाणांची सोमवारी पाहणी केली. या तंत्रज्ञांच्या कंपनीचा सौदी अरेबिया येथे मोठा प्रकल्प असून महाराष्ट्रामध्ये ५00 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारण्यासाठी ते इच्छुक असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तंत्रज्ञांशी चर्चा केली. यापैकी एक तंत्रज्ञ इंग्लंड, एक अमेरिका आणि एक आॅस्ट्रेलियाचा आहे.

पर्यावरणमंत्री कदम यांनी सोमवारी पंचगंगा प्रदूषणाबाबत घेतलेल्या बैठकीमध्ये कडक भूमिका घेतली होती. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रसंगी इंग्लंडच्या कंपनीची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कंपनीचे चौघे तंत्रज्ञ कदम यांच्यासोबतच दौºयात होते. त्यांनी प्रदूषणाच्या काही ठिकाणांचीही पाहणी केली.

विश्रामगृहावर झालेल्या कदम यांच्या बैठकीनंतर जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या तंत्रज्ञांशी काही गावांतील सांडपाणी आणि होणारे प्रदूषण याबाबतीत चर्चा केली. या बैठकीनंतर सायंकाळी या पथकाने गांधीनगरमधील सांडपाणी जिथे नदीत मिसळते तेथील पाहणी केली. अशा पद्धतीने चार-चार गावांचे सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी असल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले. कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे, गटविकास अधिकारी सचिन घाटगे उपस्थित होते.शौमिका महाडिक यांनी त्यांनी सुरू केलेल्या ‘नमामि पंचगंगा’ या उपक्रमाची माहिती या तज्ञांना देऊन जिल्हा परिषदेला याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली.बैठकीनंतर सोमवारी सायंकाळी या पथकाने गांधीनगरमधील सांडपाणी जिथे नदीत मिसळते तेथील पाहणी केली.चार चार गावांचे सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी असल्याचे यावेळी या तंत्रज्ञांनी सांगितले. 

पंचगंगेचे प्रदूषण कमी करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत संबंधित विदेशी तंत्रज्ञांशी आम्ही चर्चा केली. विदेशामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांना मोठी जागा उपलब्ध असते; परंतु आपल्याकडे निधीपेक्षाही जागेची मोठी टंचाई असते. प्रत्येक गावची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार छोटे छोटे प्रकल्प करावे लागणार आहेत. यादृष्टीने या तंत्रज्ञांशी चर्चा करण्यात आली.- शौमिका महाडिक,अध्यक्षा, जिल्हा परिषद कोल्हापूरपंचगंगा प्रदूषणप्रश्नी आठ दिवसांत मंत्रालयात बैठककोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न यापूर्वीच सुटायला हवा होता. त्यामुळे येत्या आठ दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दिली.शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात उपाययोजनांबाबत बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री कदम म्हणाले, पंचगंगा प्रदूषणासंदर्भात येत्या आठ दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन ठोस उपाययोजना होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सध्या सांडपाणीयुक्त पाणी लोक पीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबतची सर्व माहिती घेतली जात आहे. महापालिकेकडे निधी असतानाही कामे का होत नाहीत? ठेकेदारांची की अधिकाºयांची चूक आहे का? याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सर्व माहिती दिली जाणार आहे.‘एमआयडीसी’तील कंपन्यांसह इचलकरंजीतील प्रोसेसयुनिटमधून प्रक्रियेविना प्रदूषित पाणी नदीत मिसळते अशा कंपन्यांवर कारवाईचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना दिले आहेत. ज्यांच्याकडे ‘एसटीपी’ नाही त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये इचलकरंजी, हातकणंगले परिसरातील लक्ष्मी इंडस्ट्रिज दोनदिवसांत बंद करण्याचे आदेश दिले असून यामध्ये कोणालाही सूट नसल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले. पंचगंगा नदी शुद्ध करण्यासाठी मी पुढाकार घेतला असून पुढील दोन महिने मी सातत्याने कोल्हापुरात येऊन उपाययोजनांबाबतचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात पहिल्यांदा महाराष्टतून ‘प्लास्टिक बंदी’ची सुरुवात

जागतिक पातळीवर प्लास्टिक बंदीचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना प्लास्टिकबंदीचे आवाहन केले; परंतु जग आणि देशपातळीवरील निर्णय होण्यापूर्वी तीन महिने अगोदर महाराष्टÑात हा निर्णय घेऊन एक पाऊल पुढेटाकले आहे, असे मंत्री कदमयांनी सांगितले. प्लास्टिकचे रिसायकल्ािंग कसे होईल यासाठी प्रयत्न असून ७० टक्के प्लास्टिक हे डांबरीकरणामध्ये वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.