शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:50 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा काही विचित्र अवस्थेत ही नळ योजना सापडली आहे.इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला सरकारने मंजुरी देऊन दीड वर्ष आणि निविदा मंजूर करीत काम सुरू करण्याचे आदेश देऊन तेरा महिने उलटले आहेत. मात्र, प्रत्यक्ष योजना राबविण्यासाठी काहीही प्रगतीझाली नाही. आता वारणा बचावकृती समितीच्या आंदोलनाला इचलकरंजीत प्रतिआंदोलन उभे राहिल्याने संघर्ष अटळ ठरत आहे.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इचलकरंजीत संस्थानकालीन पाणीपुरवठा होता. त्यावेळी आॅईल इंजिन व पंपाद्वारे पंचगंगेतील विनाप्रक्रिया केलेले पाणी शहरास पुरविले जात होते. विविध ठिकाणी असलेले हौद व मोठे तळे येथे सोडण्यात आलेले पाणी नागरिक घागरी भरून घेऊन घरी नेत आणि त्याचा वापर करीत.सन १९६० नंतर मात्र कापडाला मागणी वाढल्यामुळे साहजिकच यंत्रमाग उद्योगात वाढ झाली. त्यामुळे लोकसंख्येतही लक्षणीय वृद्धी झाली. साधारणत: एक लाख लोकसंख्येच्या वस्त्रनगरीसाठी तत्कालीन नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. त्यावेळी सुद्धा स्वतंत्र जलशुद्धिकरण केंद्र नसले तरी ब्लिचिंग पावडरचा डोस देऊन सार्वजनिक नळाद्वारे नागरिकांना पाणी पुरविले जात होते.पंचगंगा नदीवर दहा दशलक्ष लिटर क्षमतेची नळ योजना कार्यान्वित होऊन ५० वर्षे उलटली. तिची क्षमता कमी झाल्यामुळे जेमतेम आठ दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते आहे, तर पंचगंगा दूषित झाल्यामुळे सन २००० मध्ये कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. ४५ दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली या योजनेची दाबनलिका गळतीमुळे ग्रासली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून, या योजनेमार्फत दररोज ३० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळत आहे.शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दररोज ५४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असूनसुद्धा पंचगंगा व कृष्णाया दोन्ही योजनांतून केवळ ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी उपलब्ध होते. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाल्याने नेहमीच दोन दिवसांतून एकवेळ पाणी दिले जाते.कोल्हापूर, इचलकरंजीचा प्रदूषणात वाटाउन्हाळ्यामध्ये पंचगंगेच्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ होते. त्यामुळे पंचगंगेचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो.कृष्णेच्या पाण्यावरच शहरवासीयांनापाणी दिले जाते. त्यामुळे तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.उन्हाळ्यात पंचगंगा दूषित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. पंचगंगा अक्षरश: गटारगंगा होते.आता पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीतील पाणीसुद्धा दूषित होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता शहरवासीयांसाठी वारणा नदीतून पाणी आणणारी योजना शासनाकडून राबवली जाणार आहे.