शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:50 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा काही विचित्र अवस्थेत ही नळ योजना सापडली आहे.इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला सरकारने मंजुरी देऊन दीड वर्ष आणि निविदा मंजूर करीत काम सुरू करण्याचे आदेश देऊन तेरा महिने उलटले आहेत. मात्र, प्रत्यक्ष योजना राबविण्यासाठी काहीही प्रगतीझाली नाही. आता वारणा बचावकृती समितीच्या आंदोलनाला इचलकरंजीत प्रतिआंदोलन उभे राहिल्याने संघर्ष अटळ ठरत आहे.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इचलकरंजीत संस्थानकालीन पाणीपुरवठा होता. त्यावेळी आॅईल इंजिन व पंपाद्वारे पंचगंगेतील विनाप्रक्रिया केलेले पाणी शहरास पुरविले जात होते. विविध ठिकाणी असलेले हौद व मोठे तळे येथे सोडण्यात आलेले पाणी नागरिक घागरी भरून घेऊन घरी नेत आणि त्याचा वापर करीत.सन १९६० नंतर मात्र कापडाला मागणी वाढल्यामुळे साहजिकच यंत्रमाग उद्योगात वाढ झाली. त्यामुळे लोकसंख्येतही लक्षणीय वृद्धी झाली. साधारणत: एक लाख लोकसंख्येच्या वस्त्रनगरीसाठी तत्कालीन नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. त्यावेळी सुद्धा स्वतंत्र जलशुद्धिकरण केंद्र नसले तरी ब्लिचिंग पावडरचा डोस देऊन सार्वजनिक नळाद्वारे नागरिकांना पाणी पुरविले जात होते.पंचगंगा नदीवर दहा दशलक्ष लिटर क्षमतेची नळ योजना कार्यान्वित होऊन ५० वर्षे उलटली. तिची क्षमता कमी झाल्यामुळे जेमतेम आठ दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते आहे, तर पंचगंगा दूषित झाल्यामुळे सन २००० मध्ये कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. ४५ दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली या योजनेची दाबनलिका गळतीमुळे ग्रासली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून, या योजनेमार्फत दररोज ३० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळत आहे.शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दररोज ५४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असूनसुद्धा पंचगंगा व कृष्णाया दोन्ही योजनांतून केवळ ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी उपलब्ध होते. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाल्याने नेहमीच दोन दिवसांतून एकवेळ पाणी दिले जाते.कोल्हापूर, इचलकरंजीचा प्रदूषणात वाटाउन्हाळ्यामध्ये पंचगंगेच्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ होते. त्यामुळे पंचगंगेचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो.कृष्णेच्या पाण्यावरच शहरवासीयांनापाणी दिले जाते. त्यामुळे तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.उन्हाळ्यात पंचगंगा दूषित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. पंचगंगा अक्षरश: गटारगंगा होते.आता पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीतील पाणीसुद्धा दूषित होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता शहरवासीयांसाठी वारणा नदीतून पाणी आणणारी योजना शासनाकडून राबवली जाणार आहे.