शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण हेच संघर्षाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:50 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा यादोन्ही नद्या प्रदूषित झाल्यामुळेचपाणी मिळविण्यासाठी आता इचलकरंजीकरांना वारणा नदीकडे वळावे लागले आहे. दानोळी येथील वारणा नदीच्या पात्रातून नळ योजना राबविण्यासाठी वारणा बचाव कृती समितीने केलेला विरोध आणि सध्या तरी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी वारणा नदीशिवाय अन्य स्रोत नसणे अशा काही विचित्र अवस्थेत ही नळ योजना सापडली आहे.इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला सरकारने मंजुरी देऊन दीड वर्ष आणि निविदा मंजूर करीत काम सुरू करण्याचे आदेश देऊन तेरा महिने उलटले आहेत. मात्र, प्रत्यक्ष योजना राबविण्यासाठी काहीही प्रगतीझाली नाही. आता वारणा बचावकृती समितीच्या आंदोलनाला इचलकरंजीत प्रतिआंदोलन उभे राहिल्याने संघर्ष अटळ ठरत आहे.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इचलकरंजीत संस्थानकालीन पाणीपुरवठा होता. त्यावेळी आॅईल इंजिन व पंपाद्वारे पंचगंगेतील विनाप्रक्रिया केलेले पाणी शहरास पुरविले जात होते. विविध ठिकाणी असलेले हौद व मोठे तळे येथे सोडण्यात आलेले पाणी नागरिक घागरी भरून घेऊन घरी नेत आणि त्याचा वापर करीत.सन १९६० नंतर मात्र कापडाला मागणी वाढल्यामुळे साहजिकच यंत्रमाग उद्योगात वाढ झाली. त्यामुळे लोकसंख्येतही लक्षणीय वृद्धी झाली. साधारणत: एक लाख लोकसंख्येच्या वस्त्रनगरीसाठी तत्कालीन नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. त्यावेळी सुद्धा स्वतंत्र जलशुद्धिकरण केंद्र नसले तरी ब्लिचिंग पावडरचा डोस देऊन सार्वजनिक नळाद्वारे नागरिकांना पाणी पुरविले जात होते.पंचगंगा नदीवर दहा दशलक्ष लिटर क्षमतेची नळ योजना कार्यान्वित होऊन ५० वर्षे उलटली. तिची क्षमता कमी झाल्यामुळे जेमतेम आठ दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते आहे, तर पंचगंगा दूषित झाल्यामुळे सन २००० मध्ये कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. ४५ दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली या योजनेची दाबनलिका गळतीमुळे ग्रासली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून, या योजनेमार्फत दररोज ३० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळत आहे.शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दररोज ५४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असूनसुद्धा पंचगंगा व कृष्णाया दोन्ही योजनांतून केवळ ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी उपलब्ध होते. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाल्याने नेहमीच दोन दिवसांतून एकवेळ पाणी दिले जाते.कोल्हापूर, इचलकरंजीचा प्रदूषणात वाटाउन्हाळ्यामध्ये पंचगंगेच्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ होते. त्यामुळे पंचगंगेचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो.कृष्णेच्या पाण्यावरच शहरवासीयांनापाणी दिले जाते. त्यामुळे तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.उन्हाळ्यात पंचगंगा दूषित झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. पंचगंगा अक्षरश: गटारगंगा होते.आता पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीतील पाणीसुद्धा दूषित होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता शहरवासीयांसाठी वारणा नदीतून पाणी आणणारी योजना शासनाकडून राबवली जाणार आहे.