शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Mahotsav - सोनाळीत प्रदूषणमुक्त गणेशोत्सव, रंगविरहित शाडूच्या गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:50 IST

अतिवृष्टी व महापुराच्या विळख्यात सापडलेल्या करवीर तालुक्यातील सोनाळी हे १७०० लोकसंख्येचे छोटेसे गाव . गेली ७१ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव येथे साजरा केला जातो . डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थेत विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील तरुण मंडळानी चालू ठेवली आहे .

ठळक मुद्देसोनाळीत प्रदूषणमुक्त गणेशोत्सव, रंगविरहित शाडूच्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची एकाहत्तर वर्षांची अखंडित परंपरा

निवास वरपे

म्हालसवडे/कोल्हापूर  : अतिवृष्टी व महापुराच्या विळख्यात सापडलेल्या करवीर तालुक्यातील सोनाळी हे १७०० लोकसंख्येचे छोटेसे गाव . गेली ७१ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव येथे साजरा केला जातो . डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थेत विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील तरुण मंडळानी चालू ठेवली आहे .धाकेश्वर हे या गावाचे ग्रामदैवत आहे . हिंदू धर्मातील सर्व सण वर्षभर पारंपरिक प्रथेप्रमाणे येथे साजरे केले जातात . या गावात अजूनही बलुतेदारी पद्धत सुरू आहे . कुंभार समाजाकडून लागणारे सर्व साहित्य म्हालसवडे येथील कुंभार बांधव या ग्रामस्थांना वर्षभर पुरवतात .येथील ग्रामदेवतांना गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या रंगीत मूर्ती चालत नाहीत अशी अख्यायिका आहे . या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी गणरायाच्या रंगीत अथवा प्लास्टरच्या मूर्ती बसवतच नाहीत.पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त असा येथील गणेशोत्सव संपूर्ण राज्यभर माहित झालेला आहे . येथील ग्रामस्थ अबालवृद्ध मंडळी गौरी गणपतीच्या सनावर विशेष लक्ष ठेवून असतात . जय शिवराय व धाकेश्वर तरुण मंडळांच्या माध्यमातून प्रवचन कीर्तन भजन व्याख्याने महाप्रसाद व प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात.

या मध्ये महिलां व मुलीही सक्रीय सहभागी असतात. येथे गणेश आगमनाच्या वेळी व विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही डॉल्बीमुक्त सण साजरा करण्यासाठी टाळ मृदुंग हलगी लेझीम व झांज पथकांचा वापर केला जातो.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर