शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पंधरा साखर कारखान्यांवर ‘प्रदूषण’ची नजर

By admin | Updated: December 24, 2015 00:31 IST

स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा : दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यातील सहा कारखान्यांवर कारवाईच्या हालचाली

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांत प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी आॅनलाईन स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा (मॉनिटरिंग सिस्टीम) कार्यान्वित केली आहे. यामुळे कारखाना सुरू झाल्यानंतर प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल उपलब्ध होणार आहे. दरम्यान, वारंवार सूचना देऊनही ही यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या सहा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याच्या हालचाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने सुरू केल्या आहेत.पंचगंगा नदीकाठावर आठ साखर कारखाने आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ते पंचगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत असल्याचे स्पष्टही झाले आहे. काही कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी पंचगंगा नदीत सोडल्याचेही यापूर्वी पुढे आले आहे. परिणामी कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी अनेक वेळा केली. मात्र ठोस उपाययोजना न केल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणीत न्यायालयाने ‘महसूल’च्या पुणे विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीकडून उपाययोजनांचाच एक भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व २१ साखर कारखान्यांना प्रदूषणासंबंधीची आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्याची सूचना दिली. हंगाम सुरू करण्यापूर्वीच ही यंत्रणा बसवावी, असे लेखी कळविले. त्यानुसार पंधरा साखर कारखान्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या कारखान्याच्या प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल मुंबईतील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेबसाईटवर पाहता येत आहे. परिणामी प्रदूषणाला चाप बसण्यास मदत होत आहे.यंत्रणा काय आहे ?प्रदूषणाची तक्रार आल्यानंतर संबंधित कारखाना स्थळावर जाईपर्यंत पुरावा मिळत नसे. म्हणून आॅनलाईन मॉनिटरिंगद्वारे हवा, पाणी यांच्या प्रदूषणावर नजर ठेवली जात आहे. या यंत्रणेची किंमत बारा लाख आहे. टॉवर आणि सेन्सरद्वारे हवा आणि कॅमेऱ्याद्वारे कारखान्यातून किती दूषित पाणी बाहेर पडते, त्यावर काय प्रक्रिया केली यावर नजर ठेवली जाते. त्यामुळे प्रदूषणासंबंधीचा वस्तुनिष्ठ अहवाल मिळणार आहे.प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी पंधरा साखर कारखान्यांनी आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ही यंत्रणा सर्वच कारखान्यांनी बसवावी, अशी सूचना दिली आहे. यंत्रणा न बसविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येईल.- जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळतीन कारखान्यांचे दुर्लक्ष...गडहिंग्लज, तात्यासाहेब कोरे (वारणानगर), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) या कारखान्यांनी ही यंत्रणा बसविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. न बसविल्यास या कारखान्यांवर कारवाई होऊ शकते. उदयसिंग गायकवाड (शाहूवाडी), मंंडलिक (हमीदवाडा), भोगावती या कारखान्यांनी यंत्रणा बसविली आहे; पण कार्यान्वित केलेली नाही. कुंभी-कासारी, शाहू, गुरुदत्त, हेमरस, शरद, पंचगंगा, दत्त, आजरा, दालमिया, इको केन, डी. वाय. पाटील, सेनापती घोरपडे, महाडिक शुगर्स, जवाहर, राजाराम या कारखान्यांनी यंत्रणा बसवून कार्यान्वित केली आहे.