शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पंधरा साखर कारखान्यांवर ‘प्रदूषण’ची नजर

By admin | Updated: December 24, 2015 00:31 IST

स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा : दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यातील सहा कारखान्यांवर कारवाईच्या हालचाली

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांत प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी आॅनलाईन स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा (मॉनिटरिंग सिस्टीम) कार्यान्वित केली आहे. यामुळे कारखाना सुरू झाल्यानंतर प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल उपलब्ध होणार आहे. दरम्यान, वारंवार सूचना देऊनही ही यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या सहा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याच्या हालचाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने सुरू केल्या आहेत.पंचगंगा नदीकाठावर आठ साखर कारखाने आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ते पंचगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत असल्याचे स्पष्टही झाले आहे. काही कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी पंचगंगा नदीत सोडल्याचेही यापूर्वी पुढे आले आहे. परिणामी कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी अनेक वेळा केली. मात्र ठोस उपाययोजना न केल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणीत न्यायालयाने ‘महसूल’च्या पुणे विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीकडून उपाययोजनांचाच एक भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व २१ साखर कारखान्यांना प्रदूषणासंबंधीची आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्याची सूचना दिली. हंगाम सुरू करण्यापूर्वीच ही यंत्रणा बसवावी, असे लेखी कळविले. त्यानुसार पंधरा साखर कारखान्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या कारखान्याच्या प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल मुंबईतील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेबसाईटवर पाहता येत आहे. परिणामी प्रदूषणाला चाप बसण्यास मदत होत आहे.यंत्रणा काय आहे ?प्रदूषणाची तक्रार आल्यानंतर संबंधित कारखाना स्थळावर जाईपर्यंत पुरावा मिळत नसे. म्हणून आॅनलाईन मॉनिटरिंगद्वारे हवा, पाणी यांच्या प्रदूषणावर नजर ठेवली जात आहे. या यंत्रणेची किंमत बारा लाख आहे. टॉवर आणि सेन्सरद्वारे हवा आणि कॅमेऱ्याद्वारे कारखान्यातून किती दूषित पाणी बाहेर पडते, त्यावर काय प्रक्रिया केली यावर नजर ठेवली जाते. त्यामुळे प्रदूषणासंबंधीचा वस्तुनिष्ठ अहवाल मिळणार आहे.प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी पंधरा साखर कारखान्यांनी आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ही यंत्रणा सर्वच कारखान्यांनी बसवावी, अशी सूचना दिली आहे. यंत्रणा न बसविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येईल.- जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळतीन कारखान्यांचे दुर्लक्ष...गडहिंग्लज, तात्यासाहेब कोरे (वारणानगर), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) या कारखान्यांनी ही यंत्रणा बसविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. न बसविल्यास या कारखान्यांवर कारवाई होऊ शकते. उदयसिंग गायकवाड (शाहूवाडी), मंंडलिक (हमीदवाडा), भोगावती या कारखान्यांनी यंत्रणा बसविली आहे; पण कार्यान्वित केलेली नाही. कुंभी-कासारी, शाहू, गुरुदत्त, हेमरस, शरद, पंचगंगा, दत्त, आजरा, दालमिया, इको केन, डी. वाय. पाटील, सेनापती घोरपडे, महाडिक शुगर्स, जवाहर, राजाराम या कारखान्यांनी यंत्रणा बसवून कार्यान्वित केली आहे.