शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:06 IST

  कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांना म्हणजेच गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत ...

ठळक मुद्देपंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रजासत्ताक संस्थेचे आरोप पाण्याचे नमुने घेण्यासाठी आदेश द्या; विभागीय आयुक्तांना पत्र

 

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांना म्हणजेच गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत आहेत, तर आढावा बैठकीत बंद खोलीमध्ये नदी प्रदूषणमुक्त झाल्याचे भासविले जात असल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी पुणे विभागीय आयुक्त तथा पंचगंगा नदी प्रदूषण देखरेख समितीचे अध्यक्षांना पाठविले आहे.पंचगंगा नदीतील तेरवाड बंधाºयांत रसायनयुक्तदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत पावले. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी प्रजासत्ताक संस्थेचे देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन पाठवून आरोप केले आहेत. निवेदनात म्हटले की, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निव्वळ प्रदूषण उघड होऊ नये म्हणून पहाणी व नमुने तपासणी करत नाहीत तसेच पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत २१ जानेवारी रोजी तक्रार पाठवली होती, पण कोणतीही कारवाई केली नाही. नदी प्रदूषण वाढून मासे मृत होत आहेत. कागदोपत्री बैठका, आदेश, अहवाल इत्यादी तयार करून पंचगंगा नदीचे प्रदूषण संपले आहे, नदी प्रदूषणमुक्त झाली आहे, कोणतेही सांडपाणी मिसळत नाही, असे भासवले जाते. पण प्रत्यक्षात नदीबाबत ज्यावेळी उच्च न्यायालयाने समिती नेमली, त्यावेळे एवढीच प्रदूषणाची तीव्रता आजही आहे, हे तेरवाड बंधाºयातील घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. नदी प्रदूषण करणाºया घटकांना नेहमीच पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करत असल्याचा आरोपही देसाई यांनी पत्रातून केला आहे.त्यामुळे उच्च न्यायालयाने सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडून पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘एल ई एस सँपल’ घेऊन प्रदूषणाची तीव्रता तपासून ती कमी करण्याबाबत आदेश द्यावेत, असे पत्र विभागीय आयुक्तांना ‘प्रजासत्ताक’चे देसाई यांनी पाठवले आहे.-------------तानाजी

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका