शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

आंदोलनानंतरच प्रदूषण मंडळ जागे होणार का ?

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

गांभीर्य प्रदूषण रोखेल : लोकप्रतिनिधींची ठोस उपाययोजना प्रदूषणावर नियंत्रण ठेवेल

घन:शाम कुंभार -यड्राव येथील रसायनयुक्त दूषित पाणीप्रश्नी विविध संघटनांनी केलेली आंदोलने, त्यानंतर प्रदूषण मंडळाची तात्पुरती कारवाई यामुळे उद्योजकांनी मागे तसे पुढे वाटचाल सुरू ठेवली. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने पाहिले असते तर प्रदूषण नियंत्रण मंडळास यावर उपाययोजना करता आल्या असत्या. राज्यातील पहिली ‘आयएसओ’ मानांकन असलेली ग्रामपंचायत नागरिकांच्या अनारोग्यास कारणीभूत ठरू नये, याकरिता त्याचे गांभीर्य घेतले पाहिजे. तालुक्याच्या विकासासाठी केंद्रबिंदू ठरणारे म्हणून गावचा नावलौकीक आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना केल्यास नदी प्रदूषणावर नियंत्रण राहणार आहे.सन २००३ पासून येथील रसायनयुक्त दूषित पाणीप्रश्नी नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. ज्यावेळी नागरिकांचा उद्रेक होईल, तेव्हा थोडे दिवस दूषित पाणी ओढ्यात सोडणे बंद होते. नागरिकांना विसर पडला की मागे तसे पुढे सुरू होते. या रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत.आॅक्टोबर २००५ मध्ये कापडावर प्रक्रिया करणाऱ्या सर्व उद्योजकांनी शिरोळचे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्रामध्ये रसायनयुक्त सांडपाणी ओढ्यात व परिसरात सोडणार नाही. जर तसे आढळून आले तर आमच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे लेखी स्वरूपात दिले आहे. तरीही रसायनयुक्त दूषित पाणी नाला, ओढा याद्वारे नदीत मिसळतच आहे.नोव्हेंबर २००५ मध्ये येथील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून इटीपी पूर्ण करेपर्यंत प्रक्रिया बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, थोड्या दिवसांनी संबंधित उद्योग सुरू होऊन दूषित पाणीप्रश्न उद्भवल्याने इचलकरंजी प्रांत कार्यालय येथे ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. यामुळे तत्कालीन प्रदूषण मंडळाचे सचिव डी. बी. बोराळकर यांनी उद्योगांनी प्रक्रिया केलेले पाणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उघड्यावर अथवा नाला-ओढ्यात सोडू नये, या नियम-अटीचे उल्लंघन केल्यास बँक हमी जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश काढला होता.यावर नियंत्रण ठेवणे, योग्य त्या उपाययोजना उद्योजकांना करण्यास भाग पाडणे, गावातील ग्रामस्थांसह तालुक्यातील गावांना यड्राव ग्रामपंचायतीमुळे अडचण निर्माण होऊ नये, याची जबाबदारी व कर्तव्य ग्रामपंचायतीचे असूनही याप्रश्नी गांभीर्याने का पाहिले जात नाही? राज्यातील पहिली आयएसओ मानांकन असलेली ग्रामपंचायत नागरिकांच्या अनारोग्यास कारणीभूत ठरू नये, ही सद्भावना ग्रामस्थांची आहे. ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळास याबाबतची कल्पना दिली असती तर उद्योजकांनी पाणी शुद्धिकरण प्रकल्प सुरू केले असते. परंतु, ग्रामपंचायतीने याचे गांभीर्य का घेतले नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (उत्तरार्ध)