शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

आवाडे गटाच्या राजकारणाने समीकरणे बदलली : ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे आखाड्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:19 IST

आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

दत्ता बिडकर।हातकणंगले : हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये आवाडे गटाच्या बदलत्या राजकीय निर्णयाने काँग्रेसबरोबर शिवसेनेचेही मोठे नुकसान झाले आहे. २००४ पासून काँग्रेसच्या आवळे गटाला असहकार्य करणारा आवाडे गट शिवसेनेच्या सुजित मिणचेकर यांना नेहमीच सहकार्य करीत आल्यामुळे दोन वेळा या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला.यावेळी आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यामुळे शिवसेनेच्या सुजित मिणचेकर गटात चिंता वाढली असून, या मतदारसंघामध्ये अधिकच रंगत येणार आहे.

हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये दररोज वेगवेगळे संदर्भ समोर येत आहेत. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडून पक्षाला रामराम ठोकल्याने तालुक्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे. या १३ गावांबरोबरच जवाहर साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि आवाडे समूहाचे इतर लहान-मोठे उद्योग-व्यवसाय याच मतदारसंघात असल्याने आवाडे गटाचा हातकणंगलेत दबदबा आहे. आवाडे गटाच्या चोरीछुपे पाठिंब्यावरच या मतदारसंघाची समीकरणे प्रत्येकवेळी बदलली आहेत. या निवडणुकीमध्ये आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातूनउघडपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या एकगठ्ठा मताचा फटका काँग्रेस आणि शिवसेनेला बसणार आहे.काँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

२००४ च्या निवडणुकीमध्ये आवाडे गटाने जनसुराज्यच्या राजीव आवळे यांना छुपा पाठिंबा देऊन तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे यांचा पराभव केला. २००९ च्या निवडणुकीच्या राजकीय साठमारीमध्ये आवाडे गटाचे कार्यकर्ते जनसुराज्य आणि शिवसेनेकडे विभागले गेले आणि काँग्रेसचे राजू जयवंत आवळे फक्त २००० मतांनी पराभूत झाले.दोन आवळेंच्या भाऊबंदकीमध्ये शिवसेनेचे सुजित मिणचेकर निवडून आले. २०१४च्या निर्णायक निवडणुकीमध्ये पुन्हा आवाडे गटाने काँग्रेस पक्षाशी फारकत घेत आपले सर्व कार्यकर्ते चोरीछुपे शिवसेनेच्या पाठीशी उभे केले आणि जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.

आवाडे गटाच्या सहकार्यामुळे शिवसेनेचे सुजित मिणचेकर दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले.आवाडे गटाकडून हातकणंगले मतदारसंघामध्ये लढण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे (हुपरी), शामराव गायकवाड (रुकडी), तसेच गतवेळी राष्ट्रवादीकडून लढलेले दत्ता घाटगे (मिणचे) यांच्यासह ऐनवेळी वेगळेच नाव समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आवाडेगटाच्या लढण्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे मोठे नुकसान होणार असून, या मतदारसंघाचे चित्र बदलणार आहे, हे मात्र नक्की आहे.ताकद दाखवावी लागणारविधानसभेमध्ये आवाडे गटाने काँग्रेसशी फारकत घेऊन ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेकडे जाणारी मते यावेळी थांबली आहेत. आवाडे गटाच्या अस्तित्वासाठी यावेळी त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर