शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आवाडे गटाच्या राजकारणाने समीकरणे बदलली : ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे आखाड्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:19 IST

आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

दत्ता बिडकर।हातकणंगले : हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये आवाडे गटाच्या बदलत्या राजकीय निर्णयाने काँग्रेसबरोबर शिवसेनेचेही मोठे नुकसान झाले आहे. २००४ पासून काँग्रेसच्या आवळे गटाला असहकार्य करणारा आवाडे गट शिवसेनेच्या सुजित मिणचेकर यांना नेहमीच सहकार्य करीत आल्यामुळे दोन वेळा या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला.यावेळी आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यामुळे शिवसेनेच्या सुजित मिणचेकर गटात चिंता वाढली असून, या मतदारसंघामध्ये अधिकच रंगत येणार आहे.

हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये दररोज वेगवेगळे संदर्भ समोर येत आहेत. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडून पक्षाला रामराम ठोकल्याने तालुक्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे. या १३ गावांबरोबरच जवाहर साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि आवाडे समूहाचे इतर लहान-मोठे उद्योग-व्यवसाय याच मतदारसंघात असल्याने आवाडे गटाचा हातकणंगलेत दबदबा आहे. आवाडे गटाच्या चोरीछुपे पाठिंब्यावरच या मतदारसंघाची समीकरणे प्रत्येकवेळी बदलली आहेत. या निवडणुकीमध्ये आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातूनउघडपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या एकगठ्ठा मताचा फटका काँग्रेस आणि शिवसेनेला बसणार आहे.काँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

२००४ च्या निवडणुकीमध्ये आवाडे गटाने जनसुराज्यच्या राजीव आवळे यांना छुपा पाठिंबा देऊन तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे यांचा पराभव केला. २००९ च्या निवडणुकीच्या राजकीय साठमारीमध्ये आवाडे गटाचे कार्यकर्ते जनसुराज्य आणि शिवसेनेकडे विभागले गेले आणि काँग्रेसचे राजू जयवंत आवळे फक्त २००० मतांनी पराभूत झाले.दोन आवळेंच्या भाऊबंदकीमध्ये शिवसेनेचे सुजित मिणचेकर निवडून आले. २०१४च्या निर्णायक निवडणुकीमध्ये पुन्हा आवाडे गटाने काँग्रेस पक्षाशी फारकत घेत आपले सर्व कार्यकर्ते चोरीछुपे शिवसेनेच्या पाठीशी उभे केले आणि जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.

आवाडे गटाच्या सहकार्यामुळे शिवसेनेचे सुजित मिणचेकर दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले.आवाडे गटाकडून हातकणंगले मतदारसंघामध्ये लढण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे (हुपरी), शामराव गायकवाड (रुकडी), तसेच गतवेळी राष्ट्रवादीकडून लढलेले दत्ता घाटगे (मिणचे) यांच्यासह ऐनवेळी वेगळेच नाव समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आवाडेगटाच्या लढण्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे मोठे नुकसान होणार असून, या मतदारसंघाचे चित्र बदलणार आहे, हे मात्र नक्की आहे.ताकद दाखवावी लागणारविधानसभेमध्ये आवाडे गटाने काँग्रेसशी फारकत घेऊन ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेकडे जाणारी मते यावेळी थांबली आहेत. आवाडे गटाच्या अस्तित्वासाठी यावेळी त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर