शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

‘लोकशाहीचा दर्जा राजकारण, माध्यमांवर अवलंबून’

By admin | Updated: January 23, 2015 23:36 IST

अंबाजोगाई : भारतीय लोकशाहीचा दर्जा हा राजकारण व प्रसारमाध्यमांच्या दर्जावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी केले.

अंबाजोगाई : भारतीय लोकशाहीचा दर्जा हा राजकारण व प्रसारमाध्यमांच्या दर्जावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी केले. येथील योगेश्वरी शिक्षण संस्था व विद्यापिठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने जागर लोकशाहीचा या उपक्रमांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून जयदेव डोळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे होते. तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप चव्हाण, प्राचार्य डॉ. बी. आर. चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा. डोळे म्हणाले की, भारतीय लोकशाहीसमोर मोठी आव्हाने आहेत. लोकशाही निवडणुकीतील गैरप्रकार प्रसारमाध्यमातील घसरण, जातीयवाद, धर्मवाद, अशी नवीन आव्हाने समोर उभी राहिली आहेत. या सर्व आव्हानांचा सामना सामुहिकपणे झाला पाहिजे. अध्यक्षीय समारोपात बोलतांना डॉ. खुरसाळे यांनी भारतीय लोकशाही मूल्यव्यवस्था टिकवायची असेल तर युवकांनी धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरला पाहिजे, असे मत व्यक्त केले.दीपप्रज्वलन व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जागर लोकशाहीचा या उपक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका प्रा. डॉ. शैलजा बरूरे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. बालाजी रुद्देवाड यांनी मानले. (वार्ताहर)