शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

पोलिसांची ‘कार्यशाळा’ नागरिकांसाठी लाभदायी : शिरोळमध्ये तक्रार निवारण कार्यशाळेस नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:21 IST

पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा पुढाकार

संदीप बावचे ।जयसिंगपूर : पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे. यामुळे तक्रारदारांना योग्य तो न्याय मिळून त्यांचा वेळ व पैसा वाचत आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या कामाचा ताणही कमी होत आहे. ही कार्यशाळा सर्वांनाच लाभदायी ठरत आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या प्रेरणेतून जिल्ह्याता तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून अर्जांचे तत्काळ निर्गतीकरण हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या तक्रार निवारण दिनामुळे गावागावांतील वाद, समूळ नष्ट होणार आहेत. शिवाय नागरिकांमध्ये सामंजस्य निर्माण होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, हा उद्देश पोलीस प्रशासनाने समोर ठेवला आहे.शिरोळ व जयसिंगपूर पोलीस ठाण्यांतर्गत देखील प्रलंबित अर्जांचे प्रमाण लक्षणीय असल्याने जयसिंगपूर पोलीस उपविभागीय कार्यालयांतर्गत प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली.

शिरोळ पोलीस ठाण्यांतर्गत ११२ प्रलंबित अर्ज निर्गत करण्यात आले. जयसिंगपूर येथेही नुकतीच विशेष कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत सुमारे ९३ अर्जांचे निर्गतीकरण केले. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तक्रारदारांनी कार्यशाळेस प्रतिसाद दिला. एकूणच पोलीस प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असला तरी यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे.सातत्य महत्त्वाचेग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. सणासुदीचे दिवस असले तरी चोखपणे कर्तव्य बजावणी करावी लागते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. अनेक वर्षांपासून तीच कर्मचाºयांची संख्या पोलीस ठाण्याकडे आहे. अशा कारणांमुळे पोलीस ठाण्याकडे येणारे अर्ज त्याचे निर्गतीकरण होत नसल्याचेही बाब पुढे आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली तक्रार निवारण दिन

तक्रारदारांतून स्वागतगावपातळीवर तक्रारी मिटत नसल्यामुळे अनेकजण पोलीस ठाण्याचा आधार घेतात. किरकोळ कारणावरून होणारी भांडणे, घरातील वादविवाद, वैयक्तिक कारणावरून तक्रारी, यासह अनेक प्रकारचे तक्रार अर्ज पोलीस ठाण्याकडे येत असतात. अशा प्रकारच्या अर्जांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शिवाय ते अर्जांची वेळेत निर्गत होत नसल्यामुळे तक्रारदारांच्या हाती निराशाच येते. त्यामुळे ही विशेष कार्यशाळा निश्चितच लाभदायी ठरत आहे.

कार्यशाळा निश्चितच उपयोगी ठरत आहे.तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून शिरोळ, जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील तक्रार अर्जांची निर्गत झाली असून, नागरीकांचादेखील याला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करून निरसन केले जात आहे.- कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेpolice parade groundपोलिस कवायत मैदान