शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

पोलिसांची ‘कार्यशाळा’ नागरिकांसाठी लाभदायी : शिरोळमध्ये तक्रार निवारण कार्यशाळेस नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:21 IST

पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा पुढाकार

संदीप बावचे ।जयसिंगपूर : पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे. यामुळे तक्रारदारांना योग्य तो न्याय मिळून त्यांचा वेळ व पैसा वाचत आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या कामाचा ताणही कमी होत आहे. ही कार्यशाळा सर्वांनाच लाभदायी ठरत आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या प्रेरणेतून जिल्ह्याता तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून अर्जांचे तत्काळ निर्गतीकरण हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या तक्रार निवारण दिनामुळे गावागावांतील वाद, समूळ नष्ट होणार आहेत. शिवाय नागरिकांमध्ये सामंजस्य निर्माण होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, हा उद्देश पोलीस प्रशासनाने समोर ठेवला आहे.शिरोळ व जयसिंगपूर पोलीस ठाण्यांतर्गत देखील प्रलंबित अर्जांचे प्रमाण लक्षणीय असल्याने जयसिंगपूर पोलीस उपविभागीय कार्यालयांतर्गत प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली.

शिरोळ पोलीस ठाण्यांतर्गत ११२ प्रलंबित अर्ज निर्गत करण्यात आले. जयसिंगपूर येथेही नुकतीच विशेष कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत सुमारे ९३ अर्जांचे निर्गतीकरण केले. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तक्रारदारांनी कार्यशाळेस प्रतिसाद दिला. एकूणच पोलीस प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असला तरी यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे.सातत्य महत्त्वाचेग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. सणासुदीचे दिवस असले तरी चोखपणे कर्तव्य बजावणी करावी लागते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. अनेक वर्षांपासून तीच कर्मचाºयांची संख्या पोलीस ठाण्याकडे आहे. अशा कारणांमुळे पोलीस ठाण्याकडे येणारे अर्ज त्याचे निर्गतीकरण होत नसल्याचेही बाब पुढे आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली तक्रार निवारण दिन

तक्रारदारांतून स्वागतगावपातळीवर तक्रारी मिटत नसल्यामुळे अनेकजण पोलीस ठाण्याचा आधार घेतात. किरकोळ कारणावरून होणारी भांडणे, घरातील वादविवाद, वैयक्तिक कारणावरून तक्रारी, यासह अनेक प्रकारचे तक्रार अर्ज पोलीस ठाण्याकडे येत असतात. अशा प्रकारच्या अर्जांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शिवाय ते अर्जांची वेळेत निर्गत होत नसल्यामुळे तक्रारदारांच्या हाती निराशाच येते. त्यामुळे ही विशेष कार्यशाळा निश्चितच लाभदायी ठरत आहे.

कार्यशाळा निश्चितच उपयोगी ठरत आहे.तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून शिरोळ, जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील तक्रार अर्जांची निर्गत झाली असून, नागरीकांचादेखील याला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करून निरसन केले जात आहे.- कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेpolice parade groundपोलिस कवायत मैदान