शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिसांचे ‘आॅपरेशन मुस्कान’ अर्ध्या वाटेवर

By admin | Updated: January 22, 2016 01:20 IST

शोधकार्य थांबले : वर्षभरापासून दोन चिमुकल्या बहिणी आईच्या प्रतीक्षेत

सचिन लाड -- सांगली -वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या मुलांना जगण्याचा नवा मार्ग दाखवून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलविण्यासाठी सुरू झालेली पोलिसांची ‘मुस्कान’ मोहीम अर्ध्या रस्त्यावरच थांबली. शोधकार्यातील हलगर्जीपणामुळे मिरजेत भीक मागताना सापडलेल्या दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य अद्याप फुललेच नाही. खऱ्या पालकांचा शोध घेऊन खरे हास्य फुलविण्याचे काम अजूनही बाकी आहे. गतवर्षी मिरजेत दोन मुली भीक मागताना सापडल्या. या दोघीही सख्ख्या बहिणी होत्या. त्यांच्यासोबत आईही होती. पण पोलिसांनी पकडल्यानंतर ती गायब आली. आज-ना-उद्या येऊन ती मुलींचा ताबा घेईल, अशी अपेक्षा होती. पण तेव्हापासून ती फिरकलीच नाही. त्यामुळे या मुली वारस असूनही बेवारस झाल्या आहेत. आईचा पत्ता असूनही पोलिसांनी शोध घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न सुरु ठेवले नाहीत. ती आई नसेल तर मग खऱ्या पालकांपर्यंत या मुलींना पोहचविण्याचा प्रयत्न तरी व्हायला हवा होता. बेवारस, वाट चुकलेले व बालकामगार अशा मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीपासून विशेष मोहीम उघडली आहे. गेली महिनाभर ही मोहीम राबविली जाते. सांगली पोलिसांनी गतवर्षी या मोहिमेस ‘आॅपरेशन मुस्कान’ असे नाव दिले आहे. यंदाही ती राबविली जात असून, त्यास ‘आॅपरेशन स्माईल’ असे नाव दिले आहे. गतवर्षी मिरजेत रेल्वे स्टेशन परिसरात मिरज शहर पोलीस व अहमद चॅरिटेबल ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली होती. त्यावेळी पूजा (वय ३ वर्षे) ही चिमुरडी भीक मागताना सापडली होती. तिच्या काखेत आरती ही आठ महिन्याची मुलगी होती. त्यांच्यामागे शोभा सुरेश माले ऊर्फ शोभा दादा गोसावी ही महिला होती. तिच्याही काखेत एक लहान मूल होते. हे सर्वजण हातात डबा घेऊन भीक मागताना आढळून आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शोभाने पूजा व आरती या दोन्ही मुली माझ्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी रितसर त्यांचा ताबा घेऊन, पूजा आणि आरतीची बालसुधारगृहात रवानगी केली होती. शोभा माले ही मुलांसोबत मिरजेतील मार्केटमध्ये राहत होती. तिचे ग्यानवाडी (जि. बेळगाव) हे मूळ गाव आहे. बाल न्यायाधीकरण समितीच्या अध्यक्षाच्या आदेशाने दोघींना माधवनगर रस्त्यावरील घन:श्यामनगर येथील भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल केले होते. एक वर्ष उलटला तरीही त्यांची आई मुलींना नेण्यासाठी आली नाही. प्रतीक्षा आईची!पोलिसांनी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पदच आहे. पण याच मोहिमेत सापडलेल्या पूजा आणि आरती या बहिणींना अद्याप त्यांची आई मिळालेली नाही. औपचारिकता म्हणून मुलांना पकडण्याची मोहीम फत्ते केली. या मुलींना बालसुधारगृहात पाठवून पोलीस निवांत झाले. कदाचित पोलीस कारवाई करतील, या भीतीने शोभा माले आली नसेल किंवा त्या दोघींचे अन्य पालक असतील, त्याचा तपास अपूर्ण आहे. शोभा माले हिने तिच्या दोन मुलींना येत्या तीस दिवसांत ओळख पटवून घेऊन जावे. अन्यथा बालकल्याण समिती अध्यक्षांच्या आदेशाने या दोन्ही मुलींच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. - प्रभाकर माने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, सांगली