शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कोल्हापूरात उद्यापासून अवजड वाहतूक बंद, पोलीस अधीक्षक आदेश काढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:47 IST

लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरातील दुकानात येणाऱ्या धान्यांच्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते; त्यामुळे अशा वाहनांना उद्या, मंगळवारपासून शहरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख त्याच दिवशी काढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कायम बंद ठेवण्यासाठी शेकडो नागरिकांनी लेखी निवेदने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात उद्यापासून अवजड वाहतूक बंदपोलीस अधीक्षक आदेश काढणार 

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरातील दुकानात येणाऱ्या धान्यांच्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते; त्यामुळे अशा वाहनांना उद्या, मंगळवारपासून शहरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख त्याच दिवशी काढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कायम बंद ठेवण्यासाठी शेकडो नागरिकांनी लेखी निवेदने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीबाबत सातत्याने अभ्यास केला जात आहे. शहरात येणारे धान्याचे ट्रक, टेम्पोमुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. अवजड वाहनांना जे नियम घालून दिले आहेत, ते पाळले जात नाहीत. धान्य व्यापाऱ्यांना शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्रमनगर येथील जागेवर धान्याची गोडावून उभी करून दिली आहेत. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोईसुविधा व सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे.

शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक काही दिवसांसाठी सुरू होती. ती आता कायमस्वरूपी बंद केली जाणार आहे. या निर्णयाबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या हरकती मागविल्या होत्या.त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शेकडो नागरिकांनी स्वत: शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात येऊन लेखी निवेदने दिली आहेत. त्यामध्ये अवजड वाहतूक कायम बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांनी धान्यांची अवजड वाहने शहरात न आणता विक्रमनगर येथील गोडवूनमध्ये धान्य उतरविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. जे व्यापारी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर