शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पोलिस बंदोबस्तात आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणी कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:41 IST

Dam Kolhapurnews- कोणताही गाजावाजा न करता आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २१ वर्षांनंतर पोलिस बंदोबस्तात धरणाच्या घळभरणीस सुरुवात झाली आहे. जुनला पाणीसाठ्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपोलिस बंदोबस्तात आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणी कामास सुरुवात जूनला पाणीसाठ्याचे नियोजन : विरोध नसला तर दोन महिन्यात काम पूर्ण

रवींद्र येसादे

उत्तूर : कोणताही गाजावाजा न करता आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २१ वर्षांनंतर पोलिस बंदोबस्तात धरणाच्या घळभरणीस सुरुवात झाली आहे. जुनला पाणीसाठ्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.३० कोटींचा प्रकल्प सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह तो ४५७ कोटींवर पोहोचला आहे. फक्त १० % टक्केच काम शिल्लक आहे.१.२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा असणाऱ्या प्रकल्पात आजरा तालुक्यातील २१२३ व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार २२७ कोटी ५४ लाख रुपयांत स्वेच्छा पुर्नवसन, गावठाण वसाहतींचे प्रश्न, नागरी सुविधा, जमिनींचे वाटप आदी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.कोल्हापूर पद्धतीचे बंधाराऱ्यांचे कामास प्रकल्पात पाणी साठा होणार असल्याने त्याचे ही काम गतीने सुरू झाले आहे.

०.५० मे. वॅट वीजनिर्मितीचे उदिष्ट असून त्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाचे डावे - उजवे तिरावरील काम पुर्णत्वाकडे आले आहे. पिचिंगचे १९ हजार स्वे. मीटर काम झाले अजून ४० हजार स्वे. मीटर काम बाकी आहे. घळभरणी साठी २ लाख ३६ घनमीटर मात काम होणार आहे.

जूनला कोणत्याही परिस्थितीत पाणी साठा होणार असल्याने पाटबंधारे विभागाने कामाची गती वाढवली आहे .एप्रिलअखेर हे काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जूनला पाणी साठा होणार आहे.- के.एस बारदेस्कर.प्रकल्पशाखा अभियंता

गरजेनुसार पोलिस बंदोबस्त प्रकल्पाच्या कामात प्रकल्पग्रस्तांची आडकाठी नको म्हणून गरजेनुसार घळभरणीचे काम पुर्ण होईपर्यंत पोलिस बंदोबस्त राहणार आहे. प्रकल्प स्थळ सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भ्रगे, पोलिस निरीक्षक युवराज जाधव यांचे सह २५ पोलिस तैनात केले. 

आधी पुर्नवसन मगच् घळभरणी असा कायदा असताना नियम मोडित काढून नेते मंडळी श्रेय घेण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले आहे. धरण ग्रस्तांवर खोटे खटले घालून आंदोलकांवर पोलिस कारवाई केली जाते. हे योग्य नाही. कायदा धाब्यावर बसवून काम सुरू आहे.शंकर पावले,धरणग्रस्त आर्दाळ 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर