शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

सरकारची प्रतिमा जपताना पोलिसांची तारांबळ

By admin | Updated: June 8, 2017 01:09 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नी सुकाणू समितीची निदर्शने : आंदोलक ताब्यात; दडपशाही कराल तर त्याच भाषेत उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करू न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सरकारची प्रतिमा जपताना पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.अल्पभूधारकांना कर्जमाफीचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडत असून ‘सरसकट कर्जमाफी देता येत नसेल तर खुर्ची सोडा,’ असा इशारा यावेळी समितीच्यावतीने देण्यात आला. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेले सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीय सुकाणू समितीच्यावतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करीत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे नियोजन होते. शेकापच्या कार्यालयात हा पुतळा तयार करण्यात आला. तो घेऊन शिवाजी रोडवरून दोन आंदोलक मोटारसायकलवरून घेऊन आले; परंतु पोलिसांनी त्यांना गाडीवरून उतरूच दिले नाही. त्यांच्याकडून हा पुतळा पोलिसांनी हिसकावून घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. हा पुतळा घेऊन पुढे गर्दीतून वाट काढत धावणारे पोलीस व त्यांच्या मागे कार्यकर्ते असे चित्र तिथे दिसले. पोलिसांनी हा पुतळा केएमटी बसमधून लगेच पसार केला व सरकारच्या प्रतिमेची जपणूक केली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने शिवाजी चौक दणाणून गेला. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. राज्यातील शेतकरी एकसंध झाल्याने सरकार अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे आंदोलनात फूट पाडण्याचे पाप सुरू असल्याचा आरोप करीत माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, ‘अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन हे फसवे आहे. त्यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. सात दिवस झाले आंदोलन सुरू असताना सरकार बहिरे असल्यासारखे वागत आहे; पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. पोलिसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका नाही तर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.’ ‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारचा खरा चेहरा आता शेतकऱ्यांसमोर आला आहे. निवडणुकीत घोषणा करायच्या आणि पाच वर्षे सत्ता भोगायची, ही भाजपची जुनी पद्धत आहे. सरकारची दडपशाही खपवून घेणार नसून, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाही तर पेशवाईवर हल्लाबोल करावा लागेल. यावेळी किसान सभेचे प्रा. उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबासाहेब देवकर, अतुल दिघे, सुभाष निकम, भारत पाटील, एम. डी. निश्चिते, संभाजी जगदाळे, जनार्दन पाटील, जगन्नाथ कांदळकर, गिरीष फोंडे, आदी उपस्थित होते. चंद्रकांतदादांच्या घराला छावणीचे स्वरूपलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून पुढचा टप्पा म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा दिलेल्या इशाऱ्याचा पोलीस प्रशासनाने चांगलाच धसका घेतला. बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर, नाळे कॉलनी येथील घराला पोलिसांनी अक्षरश: वेढा घातला होता. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यभरातील शेतकरी संपावर आहेत. मोर्चे, टाळे ठोक आंदोलनानंतरही सरकार दखल घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील नाळे कॉलनीतील घराला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिला होता. सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे २५-३० पोलिसांची कुमक रवाना करण्यात आली होती. मंत्री पाटील यांच्या घराकडे येण्यासाठी तीन रस्ते आहेत. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर चार-पाच पोलीस उभे होते, तर घराच्या दारातही तितकेच पोलीस उभे होते. शिवाजी चौकातील आंदोलन झाल्यानंतर कदाचित आंदोलनकर्ते संभाजीनगरकडे रवाना होतील, असा पोलिसांचा अंदाज होता, त्यामुळे तेथूनच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले तरीही इतर कार्यकर्ते घराकडे येतील, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क होती. शिवसेनेने प्रामाणिकता सिद्ध करावीशिवसेना व भाजपमध्ये मतभेद असल्याचे दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात बाहेर पडले पाहिजे. अन्यथा, शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची भावना राज्यात निर्माण होईल. शिवसेनेला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी हीच वेळ असल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.