शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

‘पोलीस मित्र’ ही कोल्हापूरची ओळख

By admin | Updated: November 23, 2015 00:51 IST

मनोजकुमार शर्मा : शहरात पोलीस मित्रांची भव्य रॅली; समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार

कोल्हापूर : समाजातील एक जबाबदार घटक म्हणून पोलिसांना सक्रिय व होकारात्मक सहकार्य करणारी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना आहे. ती राज्यभर कोल्हापूरची विधायक ओळख ठरावी, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी व्यक्त केली. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या प्रेरणेतून ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरात रविवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीचा प्रारंभ अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्या हस्ते झाला. ही रॅली बिंदू चौकातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली चौक, महावीर गार्डन या ठिकाणी आली. तेथे सर्वांनी रॅलीचा समारोप करीत पोलीस मित्रांनी शहर वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डॉ. शर्मा म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यातच नव्हे तर गुन्हेगारी उघडकीस आणण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची अशी कामगिरी पोलीस मित्र पार पाडणार आहेत. त्यांना कर्तव्याबरोबरच काही प्रमाणात अधिकार देण्याबाबतही आपण प्रयत्न करू. तसेच भविष्यात पोलीस मित्र ही लोकचळवळ होईल व त्यामध्ये नजीकच्या काळात पाच हजार पोलीस मित्र सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शुभेच्छा देताना अभिनेते आनंद काळे म्हणाले, कोल्हापूरची परंपरा उज्ज्वल आहे. येथे मित्रच मित्र आहेत. कोणी पत्ता विचारला तर ठिकाण दाखविण्यासाठी स्वत:हून नागरिक तयार होतात. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळीसुद्धा मदतीला धावून येतात. या कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे काम पोलीस मित्रांकडून निश्चित होईल. युनिक आॅटोमोबाईलचे सुधर्म वाझे यांनी पोलीस मित्र हे वाहतूक विश्वाला शिस्त लावण्यासह पोलीस दलास एक जबाबदार समन्वयक म्हणून कार्यरत राहतील. सोशल मीडियाचा त्याला पूरक वापर होईल, असे मत व्यक्त केले. कोल्हापूर हॉटेल असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर यांनी पर्यटन व्यवसायाला पोलीस मित्र मोलाची मदत करतील, असा विश्वास व्यक्त केला. या रॅलीत शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, गृह उपअधीक्षक अनिल पाटील, निरीक्षक आर. आर. पाटील, धन्यकुमार गोडसे, अनिल देशमुख, अरविंद चौधरी, अमृत देशमुख, सुरेश मदने, पारस ओसवाल, अरुण चोपदार, सचिन शानबाग, सुरेश जरग, संत निरंकारी मंडळ, रोटरॅक्ट क्लब, विवेकानंद फाउंडेशन- वरणगे पाडळी, साई फौंडेशन- जाधववाडी, यिन समूह, हॉटेलमालक संघटना, राज्य सहकारी कर्मचारी संघटना, रविवार पेठ- स्वाभिमानी ग्रुप, अनिरुध्द उपासना फाउंडेशन, आदींसह ५०० पेक्षा जास्त पोलीस मित्र सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) लाखाचे बक्षीसअनेकवेळा अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी व्यक्ती घटनास्थळी तडफडून मृत होण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे होऊन जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. त्यामुळे त्या जखमीला जीवदान मिळेल.अशा व्यक्तींचा सत्कार करून त्यांना एक लाखापर्यंत बक्षीस देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांनी जखमींच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी केले.