शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कवितेला समीक्षकांची नव्हे वाचकांची गरज : राजन गवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:51 IST

आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.

ठळक मुद्देकवितेला समीक्षकांची नव्हे वाचकांची गरज : राजन गवस दीपक बोरगावे लिखित ‘भवताल आणि भयताल’ कवितासंग्रह प्रकाशित

कोल्हापूर : आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.कवी दीपक बोरगावेलिखित आणि सम्यक विद्रोही प्रबोधन संस्था प्रकाशित ‘भवताल आणि भयताल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये झाले. यावेळी गवस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कवी बोरगावे यांच्यासह मेघा पानसरे, धनाजी गुरव, सीमा मुसळे, विश्वास सायनाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.बोरगावे यांनी कवी म्हणवून घेणे कमीपणाचे वाटत असल्याचे मनोगतात सांगितले, याचा धागा पकडून गवस यांनी कवी म्हणवून असे म्हणणे म्हणजे कविता समजलीच नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली. भोवतालची सळसळ फक्त कवी शब्दबद्ध करू शकतो. नुसत्या वाचनाने कविता समजत नाही, तिच्याशी तुम्ही किती झोंबता, भांडता, भीडता यावर ती किती समजली हे कळत असते, असेही गवस यांनी सांगितले.कवी बोरगावे यांनी आयुष्यातील वैयक्तिक आघाताने कवितेकडे वळल्याचे सांगितले. याचवेळी उजव्या शक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी आल्याने कवितालेखन अधिक ताकदीने झाल्याचे सांगितले. मेघा पानसरे यांनी टोकाच्या अस्थिर कालखंडात माणूस म्हणून व्यक्त होणे ही अवघड होत असताना हा कवितासंग्रह व्यक्त होण्यासाठी मार्गदर्शन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सीमा मुसळे यांनी कवितासंग्रहाचा समग्र आढावा घेताना समाजाचे बदलते मानस यातून प्रतिबिंबीत होत असल्याचे सांगितले. धनाजी गुरव यांनी सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर असून, आजूबाजूचा भयताल भयताड झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. प्रशांत नागावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर