शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

कवितेला समीक्षकांची नव्हे वाचकांची गरज : राजन गवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:51 IST

आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.

ठळक मुद्देकवितेला समीक्षकांची नव्हे वाचकांची गरज : राजन गवस दीपक बोरगावे लिखित ‘भवताल आणि भयताल’ कवितासंग्रह प्रकाशित

कोल्हापूर : आजच्या घडीला कवितेला समीक्षकांची नव्हे, तर चांगल्या रसिक वाचकांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. कविता ही कविता असते, तिचे वर्गीकरण होऊ शकत नाही; पण मास्तरांकडून त्याची फोड करून शिकवली जात असल्याने त्यातील सौंदर्य नष्ट होत असल्याने अशा मास्तरांचाच बंदोबस्त करायला हवा, असेही गवस यांनी सांगितले.कवी दीपक बोरगावेलिखित आणि सम्यक विद्रोही प्रबोधन संस्था प्रकाशित ‘भवताल आणि भयताल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये झाले. यावेळी गवस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कवी बोरगावे यांच्यासह मेघा पानसरे, धनाजी गुरव, सीमा मुसळे, विश्वास सायनाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.बोरगावे यांनी कवी म्हणवून घेणे कमीपणाचे वाटत असल्याचे मनोगतात सांगितले, याचा धागा पकडून गवस यांनी कवी म्हणवून असे म्हणणे म्हणजे कविता समजलीच नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली. भोवतालची सळसळ फक्त कवी शब्दबद्ध करू शकतो. नुसत्या वाचनाने कविता समजत नाही, तिच्याशी तुम्ही किती झोंबता, भांडता, भीडता यावर ती किती समजली हे कळत असते, असेही गवस यांनी सांगितले.कवी बोरगावे यांनी आयुष्यातील वैयक्तिक आघाताने कवितेकडे वळल्याचे सांगितले. याचवेळी उजव्या शक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी आल्याने कवितालेखन अधिक ताकदीने झाल्याचे सांगितले. मेघा पानसरे यांनी टोकाच्या अस्थिर कालखंडात माणूस म्हणून व्यक्त होणे ही अवघड होत असताना हा कवितासंग्रह व्यक्त होण्यासाठी मार्गदर्शन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सीमा मुसळे यांनी कवितासंग्रहाचा समग्र आढावा घेताना समाजाचे बदलते मानस यातून प्रतिबिंबीत होत असल्याचे सांगितले. धनाजी गुरव यांनी सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर असून, आजूबाजूचा भयताल भयताड झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. प्रशांत नागावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर