शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

नदीकाठच्या गावांना साथींचा धोका

By admin | Updated: November 17, 2014 00:23 IST

ंमैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगेत; अवकाळी पाऊस व एसटीपी प्लँट बंद असल्याचा परिणाम

कोल्हापूर : गत आठवड्यातील अवकाळी पाऊस व बंद असलेले कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र यामुळे गेली काही दिवस शहरातील मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत एकट्या जयंती नाल्यातून किमान २०० एमएलडीपेक्षा अधिक मैलामिश्रित पाणी पंचगंगेत मिसळले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिसार, गॅस्ट्रो व कावीळ आदी रोगांचा धोका वाढला आहे. नदीचे पाणी पिणाऱ्यांनी ते उकळून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.शहरात या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहरातील नाल्यांतून सांडपाणी नदीत मिसळले. यातच सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास महापालिकेला अपयश आले आहे. दररोज किमान ५० ते ६० दशलक्ष लिटर मैलामिश्रित पाणी जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळत आहे. केंद्र कधी सुरू होणार, हे नेमके महापालिकेलाही ठाऊक नाही. परिणामी, नदीच्या प्रदूषणाची मात्रा पुन्हा वाढली आहे.या दूषित पाण्यामुळे इचलकरंजीसह नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीस नदीकाठच्या गावांत साथींच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. मैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी नदी प्रवाहित ठेवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र, सध्या शेतीच्या कामासाठी पाण्याची गरज ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पिकांची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी कमी असल्याने पंचगंगेत राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याचे जून २०१५ पर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यातच सध्या नदीच्या पाण्याचा उपसा कमी असल्याने संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण बळावणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)कोल्हापुरात झालेला अवकाळी पाऊस व बंद असलेले सांडपाणी प्रक्रिया कें द्र यामुळे रविवारीही मोठ्या प्रमाणात जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. दक्षता घ्यामैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण वाढविले जात आहे. क्लोरिनच्या अतिरिक्त मात्रेमुळे थायरॉईडसारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते. पंचगंगेत मैलामिश्रित पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, थकवा, आदी आजार बळावण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यास वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले.एसटीपी प्लँटचा मार्ग खडतरमहापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते तसेच इचलकरंजी शहरातील २६ एमएलडी पाणी प्रक्रियेविनाच नदीत जाते. सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेला एप्रिल २०१३ची एमपीसीबीने ‘डेडलाईन’ दिली होती. आता न्यायालयाने नव्याने ३१ जानेवारी २०१४ची नवीन मुदत दिली आहे. शेतीच्या कामामुळे एसटीपी केंद्र सुरू होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे.