शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

नदीकाठच्या गावांना साथींचा धोका

By admin | Updated: November 17, 2014 00:23 IST

ंमैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगेत; अवकाळी पाऊस व एसटीपी प्लँट बंद असल्याचा परिणाम

कोल्हापूर : गत आठवड्यातील अवकाळी पाऊस व बंद असलेले कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र यामुळे गेली काही दिवस शहरातील मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत एकट्या जयंती नाल्यातून किमान २०० एमएलडीपेक्षा अधिक मैलामिश्रित पाणी पंचगंगेत मिसळले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिसार, गॅस्ट्रो व कावीळ आदी रोगांचा धोका वाढला आहे. नदीचे पाणी पिणाऱ्यांनी ते उकळून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.शहरात या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहरातील नाल्यांतून सांडपाणी नदीत मिसळले. यातच सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास महापालिकेला अपयश आले आहे. दररोज किमान ५० ते ६० दशलक्ष लिटर मैलामिश्रित पाणी जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळत आहे. केंद्र कधी सुरू होणार, हे नेमके महापालिकेलाही ठाऊक नाही. परिणामी, नदीच्या प्रदूषणाची मात्रा पुन्हा वाढली आहे.या दूषित पाण्यामुळे इचलकरंजीसह नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीस नदीकाठच्या गावांत साथींच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. मैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी नदी प्रवाहित ठेवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र, सध्या शेतीच्या कामासाठी पाण्याची गरज ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पिकांची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी कमी असल्याने पंचगंगेत राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याचे जून २०१५ पर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यातच सध्या नदीच्या पाण्याचा उपसा कमी असल्याने संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण बळावणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)कोल्हापुरात झालेला अवकाळी पाऊस व बंद असलेले सांडपाणी प्रक्रिया कें द्र यामुळे रविवारीही मोठ्या प्रमाणात जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. दक्षता घ्यामैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण वाढविले जात आहे. क्लोरिनच्या अतिरिक्त मात्रेमुळे थायरॉईडसारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते. पंचगंगेत मैलामिश्रित पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, थकवा, आदी आजार बळावण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यास वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले.एसटीपी प्लँटचा मार्ग खडतरमहापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते तसेच इचलकरंजी शहरातील २६ एमएलडी पाणी प्रक्रियेविनाच नदीत जाते. सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेला एप्रिल २०१३ची एमपीसीबीने ‘डेडलाईन’ दिली होती. आता न्यायालयाने नव्याने ३१ जानेवारी २०१४ची नवीन मुदत दिली आहे. शेतीच्या कामामुळे एसटीपी केंद्र सुरू होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे.