शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठच्या गावांना साथींचा धोका

By admin | Updated: November 17, 2014 00:23 IST

ंमैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगेत; अवकाळी पाऊस व एसटीपी प्लँट बंद असल्याचा परिणाम

कोल्हापूर : गत आठवड्यातील अवकाळी पाऊस व बंद असलेले कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र यामुळे गेली काही दिवस शहरातील मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत एकट्या जयंती नाल्यातून किमान २०० एमएलडीपेक्षा अधिक मैलामिश्रित पाणी पंचगंगेत मिसळले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिसार, गॅस्ट्रो व कावीळ आदी रोगांचा धोका वाढला आहे. नदीचे पाणी पिणाऱ्यांनी ते उकळून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.शहरात या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहरातील नाल्यांतून सांडपाणी नदीत मिसळले. यातच सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास महापालिकेला अपयश आले आहे. दररोज किमान ५० ते ६० दशलक्ष लिटर मैलामिश्रित पाणी जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळत आहे. केंद्र कधी सुरू होणार, हे नेमके महापालिकेलाही ठाऊक नाही. परिणामी, नदीच्या प्रदूषणाची मात्रा पुन्हा वाढली आहे.या दूषित पाण्यामुळे इचलकरंजीसह नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीस नदीकाठच्या गावांत साथींच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. मैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी नदी प्रवाहित ठेवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र, सध्या शेतीच्या कामासाठी पाण्याची गरज ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पिकांची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी कमी असल्याने पंचगंगेत राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याचे जून २०१५ पर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यातच सध्या नदीच्या पाण्याचा उपसा कमी असल्याने संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण बळावणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)कोल्हापुरात झालेला अवकाळी पाऊस व बंद असलेले सांडपाणी प्रक्रिया कें द्र यामुळे रविवारीही मोठ्या प्रमाणात जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. दक्षता घ्यामैलामिश्रित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण वाढविले जात आहे. क्लोरिनच्या अतिरिक्त मात्रेमुळे थायरॉईडसारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते. पंचगंगेत मैलामिश्रित पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, थकवा, आदी आजार बळावण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यास वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले.एसटीपी प्लँटचा मार्ग खडतरमहापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते तसेच इचलकरंजी शहरातील २६ एमएलडी पाणी प्रक्रियेविनाच नदीत जाते. सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेला एप्रिल २०१३ची एमपीसीबीने ‘डेडलाईन’ दिली होती. आता न्यायालयाने नव्याने ३१ जानेवारी २०१४ची नवीन मुदत दिली आहे. शेतीच्या कामामुळे एसटीपी केंद्र सुरू होण्यास मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे.