शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनपा लोकसहभागातून झाडे लावणार

By admin | Updated: April 27, 2016 00:46 IST

‘आम्ही कोल्हापुरी, झाडे घरोघरी’चा नारा : वृक्ष मागणीकरिता नावनोंदणी करण्याचे आवाहन

कोल्हापूर : ‘आम्ही कोल्हापुरी, झाडे घरोघरी’असा नारा देत शहरात दि. १२ जूनला एकाच दिवशी आठ हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. महानगरपालिका प्रशासन लोकसहभागातून हा उपक्रम राबविणार असल्याने वृक्ष मागणीकरिता नावनोंदणी करणाऱ्यांनाच विविध जातीचे वृक्ष देण्यात येणार आहेत. एकदा वृक्ष लावल्यानंतर त्याचे संगोपन, जतन करण्याची जबाबदारी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या संबंधित व्यक्तींची असेल. कोल्हापूर शहराच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये शहरातील सूज्ञ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन मंगळवारी महापौर अश्विनी रामाणे, आयुक्त पी. शिवशंकर तसेच आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई गार्डनमधील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला आयुक्त शिवशंकर, आमदार सतेज पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक ता. पा. पाटील, सहायक संचालक सुहास साळोखे, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते प्राचार्य मधुकर बाचुळकर, प्रा. एस. आर. यादव, उदय गायकवाड, अनिल चौगुले, महापालिकेचे उद्यान अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना आ. सतेज पाटील यांनी सांगितले की, ‘कोल्हापूर संवाद’ कार्यक्रमातून शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कॉँग्रेसच्या अजेंड्यातसुद्धा आम्ही तसा शब्द शहरवासीयांना दिला होता म्हणून ‘आम्ही कोल्हापुरी-झाडे घरोघरी’ असा नारा देत हा उपक्रम राबविणार आहोत. महानगरपालिका सर्वांना मोफत झाडे देईल; परंतु त्यासाठी ५ मेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीला जास्तीत जास्त तीन वृक्ष दिले जातील.वृक्षारोपण तसेच संवर्धन करण्यासाठी मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या तीस लाख रुपयांच्या निधीतून आठ ते दहा हजार वृक्ष खरेदी केले जाणार आहेत. त्यासाठी निविदा काढून संबंधित नर्सरीचालकांकडून ती घेण्यात येतील, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. ज्यांना वृक्ष देण्यात आले, त्यांनी ती जगविले की नाही याचा आढावा पुढील वर्षी मनपा प्रशासनाकडून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ही लोकचळवळ असल्याने त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) जे नावनोंदणी करतील त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे करंज, कडुलिंब, बहावा, श्रीश, सिसव, मोह, शिवण, आवळा, सीता अशोक, बकुळ, जांभुळ, करंबळ, जारूल, काशीद, टेंभुर्णे, कवठ, आपटा, सातवीन या जातीचे वृक्ष देण्यात येणार आहेत. हे वृक्ष तीन वर्षे वयाची असतील, त्यामुळे संवर्धनासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार नाही.