शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनातील विषय : शंभर टक्के हागणदारीमुक्त जिल्ह्यात सार्वजनिक शौचालयांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

कोल्हापूर : ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये शंभर टक्के हागणदारी मुक्तीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून ‘हागणदारी’ हा ...

कोल्हापूर : ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये शंभर टक्के हागणदारी मुक्तीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून ‘हागणदारी’ हा शब्दच हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढली ही समाधानकारक बाब असली तरी सार्वजनिक शौचालयांची मात्र देखभालीअभावी दुर्दशा होत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची कुचंबणा होत आहे. त्यातून पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न डोके वर काढू लागला आहे.

जिल्ह्यात गाव, वाड्या-वस्त्या मिळून ११९७ इतकी संख्या भरते. जिल्हा परिषदेने २००७ पासून सातत्याने जोर लावून ‘हागणदारीमुक्त जिल्हा’ हाेण्याच्या दृष्टीने धोरणे राबविली. २०१४ मध्ये त्याला फळ आले आणि जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही जिल्ह्याने घेतले. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने एवढ्यावरच न थांबता वैयक्तिक शाैचालये बांधण्याचा धडाकाच सुरू केला. आजच्या घडीला वाढीव लोकसंख्येतील ३८८९ व सार्वजनिक शौचालयांचा वापर करणारी ३८८९ अशी एकूण ७ हजार ८४५ कुटुंबे वगळली तर जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ३३६ लाख कुटुंबांकडे वैयक्तिक शाैचालये आहेत. त्याचा वापरही चांगल्या प्रकारे होत आहे.

पण याचवेळी सार्वजनिक शौचालयांकडे मात्र संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अलीकडे शहराच्या ठिकाणी सुलभ शौचालये आल्याने बाहेरून येणाऱ्यांची काही प्रमाणात सोय होते, पण मोफत सेवा पुरवणारी सार्वजनिक शौचालये मात्र घाणीने माखली असल्याने असण्यापेक्षा नसलेलीच बरी, असे म्हणण्याची वेळ येते तरीही ग्रामीण भागात याच शाैचालयांचा वापर ३८०० कुटुंबांकडून होत आहे. स्वच्छतेअभावी आरोग्याचे प्रश्न डोके वर काढत आहेत.

चौकट०१

ग्रामविकास मंत्री, पालकमंत्र्यांचे तालुकेच मागे

जिल्ह्यात ३० हजार ९५ इतकी वाढीव कुटुंबे वाढली आहेत. त्यापैकी शौचालय नसलेल्यांची जिल्ह्यातील संख्या ७८४५ इतकी आहे. त्यात करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड या जिल्ह्यांतील बड्या नेत्यांचे आणि सधन तालुके आघाडीवर आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे तालुकेच शाैचालय नसलेल्या यादीत पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत.

चौकट ०२

वैयक्तिक शौचालय नसलेली कुटुंबसंख्या

करवीर ९३८, कागल ५५६, पन्हाळा ५५१, राधानगरी ५२८, भुदरगड ३८२, शाहूवाडी २७३, आजरा २४२, गगनबावडा १४५, हातकणंगले ११९, चंदगड ८५, गडहिंग्लज ५२, शिरोळ ०६

चौकट ०३

अजून बांधकाम शिल्लक असलेली शाैचालये : ७८४५

चौकट ०४

शौचालय असलेली कुटुंबे : ५ लाख २५ हजार ३३६

शौचालये नसलेली कुटुंबे : ७८४५

प्रतिक्रिया

जिल्हा हागणदारीमुक्त झाला असल्याने घनकचरा अभियान आता हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत घनकचरा व सांडपाण्यावर अधिक भर दिला असून त्यातही जिल्हा चांगले काम करत आहे.

प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग