शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नदीकाठच्या गावांनाही हवी थेट पाईपलाईन

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण : प्रस्ताव शासनाला देण्याची केली मागणी

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठावरील गावांना काळम्मावाडी धरणाचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे देण्यात यावे, या मागणीसाठी आज चाळीस गावांच्यावतीने आज उपोषण करण्यात आले. यामध्ये सरपंच व ग्रामसेवकांनी भाग घेतला. पंचगंगा नदीकाठावरील ग्रामपंचायत कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. पंचगंगा प्रदूषणामुळे नदीकाठच्या ४० गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील ग्रामीण भागात काविळीची साथ पसरून ४० नागरिक मृत्युमुखी पडले होते. गतवर्षी ३० डिसेंबरच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन या चाळीस गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी भेट घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे निवेदन दिले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ठराव करून पंचगंगा नदीकाठावरील सर्व गावांना थेट लाईनने पाणी देण्याबाबत ठराव करण्यात आला होता. २६ जानेवारी २०१४ च्या ग्रामसभेत सर्व गावांनी तसा ठराव केला होता. परंतु याबाबतचा कोणताच प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला नाही. त्यामुळे आज हे उपोषण करण्यात आले. आज सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी उपोषणकर्त्याना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. संजय पवार यांनी याबाबतच्या मागणीचे निवेदन फॅक्सद्वारे पालकमंत्री पाटील यांना पाठविले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व तिळवणीचे सरसंच व कृती समितीचे निमंत्रक प्रमोद कदम, कबनूरचे सरपंच सुधीर पाटील, साजणीच्या सरपंच सानिया सुतार, हालोंडीचे सरपंच राजाराम कांबळे, अब्दुललाटच्या सरपंच कुसूम परीट, जि.प. सभापती सावकार मादनाईक, शुक्राना मकानदार आदींनी केले. (प्रतिनिधी)