शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

नदीकाठच्या गावांनाही हवी थेट पाईपलाईन

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण : प्रस्ताव शासनाला देण्याची केली मागणी

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठावरील गावांना काळम्मावाडी धरणाचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे देण्यात यावे, या मागणीसाठी आज चाळीस गावांच्यावतीने आज उपोषण करण्यात आले. यामध्ये सरपंच व ग्रामसेवकांनी भाग घेतला. पंचगंगा नदीकाठावरील ग्रामपंचायत कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. पंचगंगा प्रदूषणामुळे नदीकाठच्या ४० गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील ग्रामीण भागात काविळीची साथ पसरून ४० नागरिक मृत्युमुखी पडले होते. गतवर्षी ३० डिसेंबरच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन या चाळीस गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी भेट घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे निवेदन दिले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ठराव करून पंचगंगा नदीकाठावरील सर्व गावांना थेट लाईनने पाणी देण्याबाबत ठराव करण्यात आला होता. २६ जानेवारी २०१४ च्या ग्रामसभेत सर्व गावांनी तसा ठराव केला होता. परंतु याबाबतचा कोणताच प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला नाही. त्यामुळे आज हे उपोषण करण्यात आले. आज सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी उपोषणकर्त्याना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. संजय पवार यांनी याबाबतच्या मागणीचे निवेदन फॅक्सद्वारे पालकमंत्री पाटील यांना पाठविले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व तिळवणीचे सरसंच व कृती समितीचे निमंत्रक प्रमोद कदम, कबनूरचे सरपंच सुधीर पाटील, साजणीच्या सरपंच सानिया सुतार, हालोंडीचे सरपंच राजाराम कांबळे, अब्दुललाटच्या सरपंच कुसूम परीट, जि.प. सभापती सावकार मादनाईक, शुक्राना मकानदार आदींनी केले. (प्रतिनिधी)