शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नदीकाठच्या गावांनाही हवी थेट पाईपलाईन

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण : प्रस्ताव शासनाला देण्याची केली मागणी

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठावरील गावांना काळम्मावाडी धरणाचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे देण्यात यावे, या मागणीसाठी आज चाळीस गावांच्यावतीने आज उपोषण करण्यात आले. यामध्ये सरपंच व ग्रामसेवकांनी भाग घेतला. पंचगंगा नदीकाठावरील ग्रामपंचायत कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. पंचगंगा प्रदूषणामुळे नदीकाठच्या ४० गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील ग्रामीण भागात काविळीची साथ पसरून ४० नागरिक मृत्युमुखी पडले होते. गतवर्षी ३० डिसेंबरच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन या चाळीस गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी भेट घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे निवेदन दिले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ठराव करून पंचगंगा नदीकाठावरील सर्व गावांना थेट लाईनने पाणी देण्याबाबत ठराव करण्यात आला होता. २६ जानेवारी २०१४ च्या ग्रामसभेत सर्व गावांनी तसा ठराव केला होता. परंतु याबाबतचा कोणताच प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला नाही. त्यामुळे आज हे उपोषण करण्यात आले. आज सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी उपोषणकर्त्याना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. संजय पवार यांनी याबाबतच्या मागणीचे निवेदन फॅक्सद्वारे पालकमंत्री पाटील यांना पाठविले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व तिळवणीचे सरसंच व कृती समितीचे निमंत्रक प्रमोद कदम, कबनूरचे सरपंच सुधीर पाटील, साजणीच्या सरपंच सानिया सुतार, हालोंडीचे सरपंच राजाराम कांबळे, अब्दुललाटच्या सरपंच कुसूम परीट, जि.प. सभापती सावकार मादनाईक, शुक्राना मकानदार आदींनी केले. (प्रतिनिधी)