शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

आत्मक्लेश यात्रेकरिता दहा हजार भाकरी जाणार

By admin | Updated: May 24, 2017 23:40 IST

आत्मक्लेश यात्रेकरिता दहा हजार भाकरी जाणार

सांगली : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत सांगली, कोल्हापूर येथील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकरीही हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी १० हजार भाकरी व खरडा जमविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, दि. २५ रोजी अंकलखोप (ता. पलूस) येथून पाच हजार आणि दि. २६ रोजी नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकरी पाच हजार भाकरी पाठविणार आहेत.पदयात्रेत सांगली जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले, भास्कर कदम, भरत चौगुले, वैभव चौगुले, संदीप राजोबा, सुदर्शन वाडकर, सचिन डांगे, विनायक जाधव, बाबा सांद्रे, पोपट मोरे, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली पाहिजे, साखरेचे दर वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता ५०० रुपये मिळाला पाहिजे, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी यांसह अन्य मागण्यांसाठी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. सोमवार, दि. २२ पासून पुणे येथून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. बुधवार, दि. २४ रोजी आत्मक्लेश पदयात्रेचा मुक्काम वाकसई (ता. मावळ, जि. पुणे) येथील संत तुकाराम महाराज पादुका वृक्ष येथे होता. गुरूवार, दि. २५ रोजी खोपोली (जि. रायगड) येथे मुक्काम आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत, तर दि. २६ रोजी नांद्रे येथील शेतकरी पाच हजार भाकरी व खरडा पाठविणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातून, अशा भाकरी आणि खरडा जमविण्याचे नियोजन आहे. पदयात्रेतील कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी दि. ३० तारखेपर्यंत मिरज तालुक्यातील दुधगाव, समडोळी, तुंग, कवठेएकंद, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, मालगाव, बेडग, आरग, म्हैसाळ, पलूस तालुक्यातील शेतकरी रोज भाकरी व खरडा पाठविणार आहेत, असेही महावीर पाटील यांनी सांगितले.पुणे, मुंबईतील सांगलीकर आंदोलनात मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले जे नागरिक पुणे, ठाणे, मुंबई आणि अन्य शहरांच्या परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त राहतात, तेथील हजारो नागरिक शिदोरीसह आंदोलनात बुधवारी सहभागी झाले. कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असल्यामुळे आत्मक्लेश पदयात्रा निश्चितच यशस्वी होणार असून आंदोलनापुढे सरकारला झुकावेच लागेल, असे महावीर पाटील यांनी सांगितले.