शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘गडहिंग्लज’चा ऊस लवकर उचला

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

सदस्यांची मागणी : पंचायत समितीच्या सभेत साखर कारखानदारांना आवाहन

गडहिंग्लज : यंदा पावसाअभावी गडहिंग्लज तालुक्यातील सर्व तलावांमध्ये निम्मादेखील पाणीसाठा झालेला नाही. त्या तलावांच्या पाण्यावर अवलंबून असणारा ऊस वाळत आहे. त्यामुळे तो ऊस परिसरातील संबंधित कारखानदारांनी लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केली. सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. कमी पावसामुळे उद्भवलेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि तलावातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेऊन ऊसतोडणीचे नियोजन व्हावे. यासंदर्भात महसूल, पाटबंधारे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कारखानदारांची बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी अमर चव्हाण यांनी केली. त्यास बाळेश नाईक यांनी अनुमोदन दिले.शासनाच्या विविध योजनेतून तालुक्यात नाले व ओढ्यांवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांवर झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यातील गाळ काढून त्या बंधाऱ्यांची स्वच्छता करावी आणि त्यामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. त्यासंदर्भात कृषी व जलसंधारण विभागाने खास कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी केली.सामानगडावरील सात कमानी विहिरीची स्वच्छता करून ते पाणी आजूबाजूच्या टंचाईग्रस्त गावांना उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली. नरेवाडी व शिंदेवाडी येथील बदली झालेल्या ग्रामसेवकांची ४-५ महिने चार्जपट्टी का झालेली नाही? असा सवाल नाईक यांनी विचारला. बचत गटांसाठी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून ती इमारत लवकरात लवकर वापरात आणावी, अशी सूचना कोलेकरांनी केली. त्याचबरोबर सरोळी येथील अंगणवाडीचा प्रश्नदेखील तातडीने निकाली काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असतानाच सामानगडावरील विश्रामगृहांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे त्याच खात्याने त्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करून द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली, तर त्याच्या बांधकामाचीच चौकशी करावी, अशी मागणी नाईक यांनी केली.मुंगूरवाडी आणि हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रांना पूर्णवेळ डॉक्टर कधी मिळणार? अशी विचारणा नाईक यांनी केली. नूल ते नंदनवाड आणि नौकुड ते चिंचेवाडी या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.यावेळी विविध खात्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्र. गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. यावेळी सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)गटशिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कारगटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी तालुक्यात राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद घेऊन ‘नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’तर्फे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. उपसभापती तानाजी कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.