शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कृष्णविवराचे छायाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:31 IST

डॉ. व्ही. एन. शिंदे क्षणाक्षणाला सेल्फी काढायच्या आणि सोशल मीडियावर टाकायच्या जमान्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर कृष्णविवराच्या छायाचित्राला स्थान ...

डॉ. व्ही. एन. शिंदेक्षणाक्षणाला सेल्फी काढायच्या आणि सोशल मीडियावर टाकायच्या जमान्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर कृष्णविवराच्या छायाचित्राला स्थान मिळाले. काय आहे या छायाचित्राचे एवढे महत्त्व? हा प्रश्न मनात येणे सहज शक्य आहे. कृष्णविवरे आहेत, चांगले टेलिस्कोप आहेत, आधुनिक छायाचित्रे टिपणारे तंत्रज्ञान आहे, तरीही या छायाचित्राला एवढे महत्त्व मिळाले. कारण हे तितकेच दुर्मीळ छायाचित्र आहे. ते मिळविण्यासाठी जगभरातील कित्येक वर्षे शेकडो संशोधक प्रयत्न करत होते. शेवटी कृष्णविवराचे देखणे छायाचित्र २०१९ मध्ये मिळाले.कृष्णविवर हे ताऱ्याचे अंतिम रूप आहे. ती कोणत्याही ताºयाची अंतिम अवस्था असते. एका विशिष्ट ताºयाचे आयुष्य संपते तेव्हा कृष्णविवर तयार होते. सर्व तारे अणुंचे बनलेले आहेत. अणूच्या केंद्रस्थानी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. केंद्रकाभोवती विविध कक्षामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात. हे इलेक्ट्रॉन दोन अणूंमध्ये अंतर राखण्यास मदत करतात. या ताऱ्यांमध्ये आण्विक शृ्रंखला प्रक्रिया सुरू असते. त्यातून प्रचंड ऊर्जा तयार होते. तीच प्रकाशाच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचत असते.अखेर ताºयांतील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो. त्यानंतर त्यापासून तयार झालेल्या हेलियमचे ज्वलन सुरू होते. हेलियमही संपतो तेव्हा ताºयाचा इतर भाग केंद्रकाकडे खेचला जातो. तारा जितका मोठा असेल तितके त्याचे आयुष्य कमी असते. जेव्हा ताºयाचे आयुष्य संपते तेव्हा त्यात प्रचंड घडामोडी होतात. त्याचे सर्व वस्तुमान केंद्राकडे जाते. अणू केंद्रकाच्या बंधनातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि त्याचे आकारमान खूप कमी होते. मात्र, वस्तुमान तसेच राहते. परिणामी, त्याचे गुरुत्वाकर्षण प्रचंड वाढते. ते इतके जास्त असते की, त्यापासून प्रकाशही सुटू शकत नाही. जे त्याच्या कक्षेत जाते ते सर्व आत शोषले जाते. बाहेर काहीच येत नाही. म्हणूनच त्याला ‘कृष्णविवर’ असे म्हणतात. अमर्याद लहान आणि कमालीचे जड.या अवस्थेत भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाहीत. या बिंदूभोवती एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडून आत गेलेले काहीच परत येत नाही. त्यामुळे हे प्रकरण आहे काय? याचा पुरेसा अंदाज कोणालाच नाही. या मर्यादेचे उल्लंघन केल्यानंतर प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वस्तू केंद्रकाकडे जाते. सूर्यापेक्षा तिप्पट मोठ्या ताºयाचे कृष्णविवरात रूपांतर होते, असे भारतीय वंशाचे संशोधक चंद्रशेखर यांनी शोधले. प्रकाशदेखील जेव्हा बाहेर पडू शकत नाही तेव्हा हे कृष्णविवर आपण पाहू शकत नाही. मात्र, हॉकिंग यांना ‘अशा कृष्णविवरात गेल्यास परत येता येणार नाही. मात्र, आपण नव्याच विश्वात प्रवेश करू’, असे वाटत होते. कृष्णविवरातील माहिती अनेक गोष्टींचा उलगडा करेल, असे ते म्हणत. कृष्णविवरे ही आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असावीत, असे संशोधकांचे मत आहे. आकाशातील असंख्य तारे अशा कृष्णविवराभोवती फेºया मारत आहेत.क्षकिरणांच्या शोधानंतर अशा कृष्णविवरांचे अस्तित्व संशोधकांनी मान्य केले. एखादा तारा कृष्णविवराच्या जवळ गेल्यास तो आत जाताना अवकाशात असे क्षकिरण तयार करतात. अशा गूढ कृष्णविवराचे छायाचित्र असल्याने त्याची बातमी झाली नसती तरच नवल.(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)