शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूरात ‘लोकमत’ च्या रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

By admin | Updated: July 3, 2017 16:26 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा जयंतीचे औचित्य

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : सामाजिक बांधीलकीचे व्रत जपलेल्या ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे सोमवारी आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधीलकीतून रक्तदानाद्वारे नवी नाती या निमित्ताने जोडताना दिसली. दिवसभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह, युवक, वृत्तपत्र विक्रेते, नागरिक व ‘लोकमत’मधील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

शाहुपुरी तिसरी गल्ली येथील राधाकृष्ण मंदीर हॉल येथे ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाला अर्पण ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.

शिबिराचे उद्घाटन अर्पण ब्लड बॅँकेचे डॉ. बी. जी. कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, युवा आॅर्गनायझेशनचे मंदार तपकिरे, राधाकृष्ण मंदिराचे हॉल व्यवस्थापक डी. आर. कोडोलीकर प्रमुख उपस्थित होते.

‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ मानले जाते; कारण आयुष्यात दान-धर्म करून जेवढे पुण्य लाभत नाही, तेवढे रक्ताद्वारे एखाद्याला जीवदान दिल्याने लाभते. रक्तदान ही एक चळवळ असून तिला बळ देण्यासाठी ‘लोकमत’ या शिबिराचे आयोजन करण्यात येते. सकाळी साडे दहाच्या सुमारास रक्तदानाला सुरुवात झाली.

दिवसभरात महाविद्यालयीत विद्यार्थी, तरुण, वृत्तपत्र विक्रेते, नागरिक, लोकमतचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने ‘लोकमत’ने सामाजिक जाणीवेची वीण अधिक घट्ट करुन अनेक धाग्यांना एकत्रित जोडण्याचे काम केले. सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित रक्तदात्यांनी गौरवोद्गार काढले.

या शिबिरास अर्पण ब्लड बॅँकेचे बाबासाहेब आघाव, पूनम आघाव, करिष्मा जमादार यांचे सहकार्य लाभले.