शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पेठवडगाव परिसरात भाजपला अच्छे दिन येणार?

By admin | Updated: April 26, 2016 00:43 IST

पक्षप्रवेश कार्यक्रमाने नवचैतन्य : स्वबळावर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग

सुहास जाधव - पेठवडगावभाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व डॉ. चौगुले यांच्या पक्षप्रवेशास चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे इचलकरंजी शहर वगळता तालुक्यात जनाधार नसल्याची टीका होणाऱ्या भाजपने जनाधार दाखवून स्वबळावर आगामी पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे रणशिंग फुंकले. यामुळे वडगावसह तालुक्याची राजकीय समीकरणे नव्याने उदयास येणार आहेत.पेठवडगाव शहरात रविवारी आयोजित कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत वडगावसह जिल्ह्याच्या सहकारक्षेत्रात ठसा उमटविलेले डॉ. ए. एम. चौगुले, डॉ. अशोक चौगुले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश पार पडला. आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता भाजपकडे प्रवेशासाठी रांग लागल्याचे चित्र दिसत आहे.डॉ. ए. एम. चौगुले यांची १९५७ पासून कारकीर्द पाहता त्यांनी व त्यांच्या मुलांनी वडगाव ही कर्मभूमी मानली आहे. अर्बन बँक, हातकण्ांगले सूतगिरणी आदींची स्थापना केलेली आहे. त्या चालविल्या आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कधी आघाडी, स्वतंत्रपणे निवडणुका लढवून गटाचे अस्तित्व कायम ठेवले आहे.या कार्यक्रमातही इतरवेळी विरोधकांवर खास पध्दतीने टीकास्त्र सोडणाऱ्या डॉ. अशोक चौगुले यांनी आपल्या भाषणात कोणावरही टीका केली नाही. केवळ शहराच्या विकासाचे प्रश्न मांडले. ते पूर्ण करण्याची हमी घेण्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले. येत्या काळात पालिकेतील सत्ताधारी आघाडी विरोधात बाकीचे गटतट आहेत. मात्र भाजपने डॉ. चौगुले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्यामुळे पालिका निवडणुकीत वेगळे चित्र असण्याची शक्यता आहे.ज्या पद्धतीने भाजपने डॉ. चौगुले यांच्यावर विश्वास टाकून प्रवेश व जबाबदारी दिली. ती जबाबदारी तितक्याच नेटाने पार पाडून भाजप नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविणे गरजेचे आहे. तसेच पक्षाने त्यांना ज्या मुद्यावर प्रवेश दिला त्या वडगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. या मेळाव्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिलाच पक्षप्रवेश असल्याने भाजपचे शक्तीप्रदर्शन किंवा वातावरण निर्मिती एवढाच अर्थ सध्यातरी स्पष्ट होत आहे. यामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.