शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

विनाअनुदानित शिक्षकांना कायम करा

By admin | Updated: July 18, 2014 00:52 IST

उच्च न्यायालयाचा आदेश : सुमारे ४५०० शाळांतील ४५ हजार जणांना लाभ

कोपार्डे : विनाअनुदानित शाळांमध्ये गेली १० ते १५ वर्षे आरक्षण असणाऱ्या जागेवर जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करत होते, त्यांना संरक्षण देऊन कायम करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम. बी. शहा यांनी काल, बुधवारी दिला. कायम विनाअनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द काढून टाकल्यानंतर आरक्षित जागा न भरल्याबद्दल शासनाने मूल्यांकन केल्यानंतर यावर्षी ज्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या, त्यांचे सन २०१२/१३चे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सन २००० पासून महाराष्ट्र शासनाने कायम विनाअनुदानित तत्त्वावर मराठी शाळांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात ४,५०० शाळांना मंजुरीही दिली होती. मात्र, या शाळा चालविणे संस्थाचालकांना कठीण झाले. २००९ मध्ये शासनाने ‘कायम’ हा शब्द काढून २०११/१२ मध्ये या शाळांचे मूल्यांकन करून या पात्र शाळांना २० टक्के अनुदान जाहीर केले. त्यानंतर प्रत्येक वर्षी ४०, ६०, ८० व १०० टक्के अनुदान या शाळांना देण्यात येणार आहे. मात्र, मूल्यांकनादरम्यान शासनाने ज्या शाळांनी आरक्षण पूर्ण केलेले नाही, अशा शाळांचे अनुदान थांबविले होते. याला राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एम. बी. शहा यांनी याबाबत सकारात्मक निर्णय दिला. तसेच येथून पुढे आरक्षित जागेवर आरक्षणच भरती व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या निर्णयाने राज्यातील ४,५०० शाळांमधील ४५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.