शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विनाअनुदानित शिक्षकांना कायम करा

By admin | Updated: July 18, 2014 00:52 IST

उच्च न्यायालयाचा आदेश : सुमारे ४५०० शाळांतील ४५ हजार जणांना लाभ

कोपार्डे : विनाअनुदानित शाळांमध्ये गेली १० ते १५ वर्षे आरक्षण असणाऱ्या जागेवर जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करत होते, त्यांना संरक्षण देऊन कायम करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम. बी. शहा यांनी काल, बुधवारी दिला. कायम विनाअनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द काढून टाकल्यानंतर आरक्षित जागा न भरल्याबद्दल शासनाने मूल्यांकन केल्यानंतर यावर्षी ज्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या, त्यांचे सन २०१२/१३चे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सन २००० पासून महाराष्ट्र शासनाने कायम विनाअनुदानित तत्त्वावर मराठी शाळांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात ४,५०० शाळांना मंजुरीही दिली होती. मात्र, या शाळा चालविणे संस्थाचालकांना कठीण झाले. २००९ मध्ये शासनाने ‘कायम’ हा शब्द काढून २०११/१२ मध्ये या शाळांचे मूल्यांकन करून या पात्र शाळांना २० टक्के अनुदान जाहीर केले. त्यानंतर प्रत्येक वर्षी ४०, ६०, ८० व १०० टक्के अनुदान या शाळांना देण्यात येणार आहे. मात्र, मूल्यांकनादरम्यान शासनाने ज्या शाळांनी आरक्षण पूर्ण केलेले नाही, अशा शाळांचे अनुदान थांबविले होते. याला राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एम. बी. शहा यांनी याबाबत सकारात्मक निर्णय दिला. तसेच येथून पुढे आरक्षित जागेवर आरक्षणच भरती व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या निर्णयाने राज्यातील ४,५०० शाळांमधील ४५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.