शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

पेरीडच्या महिलेची ‘पीएफ’साठी फरफट थांबणार, ‘लोकमत हेल्पलाईन’चा आधार : ‘महावितरण’कडून आठ दिवसांत पैसे देण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:03 IST

कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे त्यांच्या पत्नी श्रीमती शालन कुंभार यांना आठ दिवसांत देण्याची व्यवस्था

कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे त्यांच्या पत्नी श्रीमती शालन कुंभार यांना आठ दिवसांत देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे महावितरण कंपनीने सोमवारी स्पष्ट केले. ही रक्कम काही लाखांत आहे.

कुंभार यांचे २ मे २०१४ ला निधन झाले. तेव्हापासून या रकमेसाठी त्या पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार ‘लोकमत’ने महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे विचारणा केल्यावर यंत्रणा खडबडून जागी झाली व काही त्रुटींमुळे ही रक्कम त्यांना मिळाली नव्हती ती आम्ही आठ दिवसांत देऊ, असे आश्वासन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिले.

वासुदेव कुंभार हे महावितरणमध्ये तंत्रज्ञ होते. त्यांचा २०१४ मध्ये पिशवी येथे अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर श्रीमती कुंभार यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना आजतागायत भविष्य निर्वाह निधीची रक्कम व पेन्शनही मंजूर झालेली नाही. हे पैसे मिळावेत म्हणून कुंभार यांनी कोल्हापुरातील आर-१ विभागीय कार्यालयात वारंवार कर्मचारी व अधिकाºयांची भेट घेतली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. देतो, करतो अशी आश्वासने त्या गेली चार वर्षे ऐकत आहेत.

याबाबत श्रीमती कुंभार म्हणाल्या, आर-१ विभागात काम करणाºया श्रीमती बनगे, श्रीमती भोसले व माणगांवकर या आम्ही या विभागात अजून नवीन आहे, माहिती घेतो असे सांगत असत. त्याचा मला चार वर्षे खूप त्रास झाला आहे. माझ्या पतीने कंपनीसाठी प्राणत्याग केला आहे त्याचा कंपनीस विसर पडला आहे. तब्बल आठवेळा मला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.

तेवढ्यावेळा मी ती पूर्तता केली तरी अजूनही जर महावितरण कागदपत्रांत त्रुटी आहेत असे म्हणत असेल तर ही बाब निंदनीय आहे. माझी आता हेलपाटे मारण्याची आर्थिक स्थिती नाही. मला दवाखान्यात उपचार करण्यासाठीही पैसे नाहीत तरीही महावितरणला माझी दया येत नाही. हे सर्व जाणिवपूर्वक केले जात असल्याचा संशय आहे. म्हणूनच मी ‘लोकमत’कडे दाद मागितली आहे. काही कामचुकार कर्मचाºयांमुळे महावितरणची बदनामी होत असून, माझ्यासारख्या आणि किती कर्मचाºयांची प्रकरणे रखडली आहेत याचीही कंपनीने चौकशी करावी.आठ वेळा प्रस्ताव मागेकुंभार यांचा भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव कोल्हापूर विभागाने (आर-१) तपासूनच मग तो महावितरणच्या मुंबईतील बांद्रा कार्यालयाकडे पाठविला. परंतु, हा प्रस्ताव एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल आठवेळा त्रुटी काढून परत आला. ज्यांनी हा प्रस्ताव तपासला त्यांनी एकदाच या सर्व त्रुटी काढून तो परिपूर्ण प्रस्ताव का पाठविला नाही, अशी विचारणा आता होत आहे. त्यानिमित्ताने कंपनीच्या आंधळ्या कारभारावर प्रकाशझोत पडला आहे. ‘लोकमत’ने सोमवारी मुंबई कार्यालयात चौकशी केल्यावर मग कोल्हापूर कार्यालयातीलही यंत्रणा खडबडून जागी झाली व आम्ही तुमचे पैसे देणार आहोत, वृत्तपत्रांकडे कशाला गेला अशी उलट विचारणा कुटुंबीयांना करण्यात आली.