शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

लोकांकडूनच होणार आपत्ती व्यवस्थापन --प्रसाद संकपाळ, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:14 IST

देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या आपत्ती येत असतात, त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणपर्यंत दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम हाती घेतले जातात.

ठळक मुद्देसोशल मीडियाचा त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

प्रवीण देसाई।कोल्हापूर : देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या आपत्ती येत असतात, त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणपर्यंत दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम हाती घेतले जातात. कोल्हापूर जिल्हाही यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यावर्षी काही अभिनव गोष्टी आपत्ती व्यवस्थापनामध्ये राबविल्या जात आहेत. त्यामध्ये ‘समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन’ हा उपक्रम कार्यान्वित केला आहे. यामध्ये लोकांकडूनच लोकांचे आपत्ती व्यवस्थापन केले जाणार आहे, यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याशी साधलेला थेट संवाद.

प्रश्न : आपत्ती व्यवस्थापनातील नव्या संकल्पना काय आहेत?उत्तर : ‘समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन’ हा उपक्रम आपण यावर्षीच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात राबवित आहोत. यामध्ये लोकांनीच लोकांसाठी आपत्ती व्यवस्थापन करायचे आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आपदा मित्र कार्यक्रमाची आपल्याला खूप मोठी मदत होत आहे. या कार्यक्रमांतर्गत आपण जिल्ह्यातील पूरबाधित तालुक्यांमधून तरुण, होतकरू आणि धाडसी युवक आणि युवतींना आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षित केले आहे.

प्रश्न : पाऊस आणि पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय नियोजन आहे?उत्तर : जिल्ह्यात सन २००५ पासून अनेकवेळा पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे; त्यामुळे पूरपरिस्थितीत बाधित होऊ शकतील, अशी जिल्'ातील १२९ गावे, भूस्खलन किंवा दरडी कोसळून जमीन खचून बाधित होऊ शकतात, अशी साधारणपणे १७ गावे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व गावांचा आपत्ती व्यवस्थापनाचा पूर व्यवस्थापनाचा आराखडा आपण २०१९ साठी अद्यावत केलेला आहे.

प्रश्न : आपत्कालीन परिस्थितीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने होतो?उत्तर : आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण जगामध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही संकल्पना पुढे आली आहे. याचा वापर आपत्ती व्यवस्थापनासाठी करणे म्हणजेच नवीन तंत्रज्ञान अंगीकारणे असा त्याचा अर्थ होतो. कोल्हापूर जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो आहोत. सोशल मीडियाचा त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.अत्याधुनिक १५ मोटर बोटीआपत्ती व्यवस्थापनात बचाव कार्य करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे १५ अत्याधुनिक रेस्क्यु मोटर बोट, लोकांचे जीव वाचविण्यासाठी २०० लाईफ जॅकेट, २०० लाईफ रिंग, १०० फ्लोटिंग रोप (पाण्यावर तरंगणारे दोर), झाडे कट करणारे सॉ कटर मशीन, एकमेकांमध्ये संदेशवहन करण्यासाठी १२ वॉकीटॉकीच्या सेट्सचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात कोणतीही आपत्ती असो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमीच सज्ज असतो. नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी कार्यरत असतात. पावसाच्या पार्श्वभूमीवरही सर्व तयारी झाली आहे.- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर