शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यातील जनतेला आमसभेची प्रतीक्षा

By admin | Updated: January 13, 2015 22:53 IST

नूतन आमदारांकडून अपेक्षा : रस्ते, गावागावांतील पिण्याचा पाणीप्रश्न सोडवणुकीसाठी आमसभेची मागणी

संदीप बावचे - जयसिंगपूर - ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ याचाच प्रत्यय शिरोळ तालुक्यातील आम जनतेला येत आहे. वैयक्तिक प्रश्नांबरोबरच तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ते, गावागावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यासह विविध प्रश्न जनतेसमोर आवासून उभे आहेत. बऱ्याच वर्षात तालुक्यात आमसभा झालेली नाही. नूतन आमदार उल्हास पाटील यांच्याकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. यामुळे आ. पाटील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमसभा बोलाविणार का? असा प्रश्न नागरिकांतून होत आहे.दोन शहरे व ५३ गावांनी शिरोळ तालुका व्यापलेला आहे. पंचगंगा, कृष्णा, वारणा व दूधगंगा या चार नद्यांमुळे तालुका सुजलाम् सुफलाम झाला आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय प्रामुख्याने तालुक्यात केला जातो. दोन जिल्हे आणि कर्नाटक राज्याशी संपर्क येणाऱ्या या तालुक्याला प्रामुख्याने दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले असले तरी मजबूत रस्ते न झाल्याने पुन्हा हे रस्ते मरणयातना भोगत आहेत. शासनाने तालुक्यातील ३८ गावांमध्ये पेयजल योजना राबविली असली तरी बहुतांश योजना अजूनही पूर्णत्वास आलेल्या नाहीत. यामुळे गावोगावचा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ‘जैसे थै’च आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न तर पाचवीलाच पूजला आहे. पाणी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनत चालल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. क्षारपड जमिनीचा प्रश्नही ‘जैसे थै’च आहे. तालुक्यातील या प्रमुख प्रश्नांबरोबरच ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ याचाच प्रत्यय सर्व शासकूय कार्यालयांत अनुभवास मिळत आहे. एजंटगिरी फोफावल्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. आठ-आठ दिवस हेलपाटे मारूनही कामे होत नाहीत, एजंटामार्फत गेल्यास अर्थपूर्ण वाटाघाटीतून कामे होतात, अशा तक्रारी नागरिकांतून होत आहेत. यामुळे महसूल विभागाविषयी जनतेतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, पाटबंधारे विभाग, सहायक निबंधक कार्यालयातही अशीच परिस्थिती आहे. जनतेच्या या प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमसभा बोलाविली जाते. प्रस्तापितांना धक्का देत आणि ज्या अपेक्षेने आमदार म्हणून निवडून दिले आहे ते अभ्यासू व तालुक्यातील प्रश्नांची जाण असणारे आमदार उल्हास पाटील यांनी आमसभा घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बऱ्याच वर्षांपासून शिरोळमध्ये आमसभा झालेली नाही. यामुळे जनतेचे प्रश्न समजून येत नाहीत. शासकीय कामांबरोबर तालुक्यातील प्रमुख प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी आमसभेची खरी गरज बनली आहे.दरवर्षी आमसभा होणे गरजेचे आहे. जनतेचे नेमके कोणते प्रश्न आहेत. शिवाय ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्यांचे नेमके प्रश्न पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर आल्याशिवाय ते समजणार नाहीत. यामुळे आमसभा महत्त्वाची आहे. प्रश्न सुटतील न सुटतील, मात्र प्रश्न जाणून घेण्याची गरज आहे.- धनाजी चुडमुंगे, शिरोळसर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी आमसभा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. तालुक्यात बऱ्याच वर्षांपासून आमसभा झालेली नाही. शासकीय कामांचा निपटारा वेळेत होण्यासाठी आमदारांनी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.- विश्वास बालीघाटे, शिरढोण