शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शिरोळ तालुक्यातील जनतेला आमसभेची प्रतीक्षा

By admin | Updated: January 13, 2015 22:53 IST

नूतन आमदारांकडून अपेक्षा : रस्ते, गावागावांतील पिण्याचा पाणीप्रश्न सोडवणुकीसाठी आमसभेची मागणी

संदीप बावचे - जयसिंगपूर - ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ याचाच प्रत्यय शिरोळ तालुक्यातील आम जनतेला येत आहे. वैयक्तिक प्रश्नांबरोबरच तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ते, गावागावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यासह विविध प्रश्न जनतेसमोर आवासून उभे आहेत. बऱ्याच वर्षात तालुक्यात आमसभा झालेली नाही. नूतन आमदार उल्हास पाटील यांच्याकडून जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. यामुळे आ. पाटील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमसभा बोलाविणार का? असा प्रश्न नागरिकांतून होत आहे.दोन शहरे व ५३ गावांनी शिरोळ तालुका व्यापलेला आहे. पंचगंगा, कृष्णा, वारणा व दूधगंगा या चार नद्यांमुळे तालुका सुजलाम् सुफलाम झाला आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय प्रामुख्याने तालुक्यात केला जातो. दोन जिल्हे आणि कर्नाटक राज्याशी संपर्क येणाऱ्या या तालुक्याला प्रामुख्याने दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले असले तरी मजबूत रस्ते न झाल्याने पुन्हा हे रस्ते मरणयातना भोगत आहेत. शासनाने तालुक्यातील ३८ गावांमध्ये पेयजल योजना राबविली असली तरी बहुतांश योजना अजूनही पूर्णत्वास आलेल्या नाहीत. यामुळे गावोगावचा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ‘जैसे थै’च आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न तर पाचवीलाच पूजला आहे. पाणी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनत चालल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. क्षारपड जमिनीचा प्रश्नही ‘जैसे थै’च आहे. तालुक्यातील या प्रमुख प्रश्नांबरोबरच ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ याचाच प्रत्यय सर्व शासकूय कार्यालयांत अनुभवास मिळत आहे. एजंटगिरी फोफावल्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. आठ-आठ दिवस हेलपाटे मारूनही कामे होत नाहीत, एजंटामार्फत गेल्यास अर्थपूर्ण वाटाघाटीतून कामे होतात, अशा तक्रारी नागरिकांतून होत आहेत. यामुळे महसूल विभागाविषयी जनतेतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, पाटबंधारे विभाग, सहायक निबंधक कार्यालयातही अशीच परिस्थिती आहे. जनतेच्या या प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमसभा बोलाविली जाते. प्रस्तापितांना धक्का देत आणि ज्या अपेक्षेने आमदार म्हणून निवडून दिले आहे ते अभ्यासू व तालुक्यातील प्रश्नांची जाण असणारे आमदार उल्हास पाटील यांनी आमसभा घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बऱ्याच वर्षांपासून शिरोळमध्ये आमसभा झालेली नाही. यामुळे जनतेचे प्रश्न समजून येत नाहीत. शासकीय कामांबरोबर तालुक्यातील प्रमुख प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी आमसभेची खरी गरज बनली आहे.दरवर्षी आमसभा होणे गरजेचे आहे. जनतेचे नेमके कोणते प्रश्न आहेत. शिवाय ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्यांचे नेमके प्रश्न पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर आल्याशिवाय ते समजणार नाहीत. यामुळे आमसभा महत्त्वाची आहे. प्रश्न सुटतील न सुटतील, मात्र प्रश्न जाणून घेण्याची गरज आहे.- धनाजी चुडमुंगे, शिरोळसर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी आमसभा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. तालुक्यात बऱ्याच वर्षांपासून आमसभा झालेली नाही. शासकीय कामांचा निपटारा वेळेत होण्यासाठी आमदारांनी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.- विश्वास बालीघाटे, शिरढोण