शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना विश्वासात घेऊन मतदान बंधनकारक करणे शक्य : सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:55 IST

कोल्हापूर : मतदानाचा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा यासाठी जागृती, आवाहन करणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकांना विश्वासात ...

ठळक मुद्देलोकांना विश्वासात घेऊन मतदान बंधनकारक करणे शक्य : सहारिया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनजागृती कमी

कोल्हापूर : मतदानाचा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा यासाठी जागृती, आवाहन करणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकांना विश्वासात घेऊन मतदान करणे हे बंधनकारक करता येणे शक्य आहे. मात्र, मतदानाचा हक्क मूलभूत आहे. त्यामुळे ते बंधनकारक करण्याऐवजी प्रत्येक मतदाराने प्राधान्याने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात निमित्त ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया म्हणाले, कायदा केल्यास मतदान करणे प्रत्येकाला बंधनकारक करणे काहीच अवघड नाही. याबाबत पूर्वी देखील विचार झाला असून तो मागे पडला आहे.

लोकांचा विश्वास आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल, तर मतदान बंधनकारक करता येणे शक्य आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फरक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानाबाबत जनजागृती कमी असते. त्यामुळे या निवडणुका निर्भय, पारदर्शीपणे घेण्याचे मोठे आव्हान आणि जबाबदारी निवडणूक आयोगासमोर असते.

ही जबाबदारी आयोग कौशल्याने पार पाडतो. मतदारांना आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती होण्यासाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रांतील माहितीचे मोठे फलक मतदान केंद्राबाहेर, शहरातील चौकात लावण्यात येतात. त्यामध्ये उमेदवाराचे शिक्षण, त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण, त्याच्यावरील गुन्ह्यांची नोंद यांची माहिती दिली जाते. त्यामुळे मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याची संधी मिळेल. निवडणुकीच्या कालावधीत सोशल मिडियावरील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हानिहाय समिती स्थापन केली आहे. या मिडियावर चुकीच्या पोस्ट आणि गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

‘त्या’ प्रवृत्तीला आळा बसलासन २०१४मध्ये आयोगाकडे ४५० नोंदणीकृत पक्ष होते. खोलात जाऊन त्यांची माहिती घेतली असता, आयोगाच्या मूलभूत नियमांचेही त्यांनी पालन केल्याचे दिसले नाही. पक्षांनी किमान वार्षिक ताळेबंदाची माहिती तसेच आयकर विवरण आयोगाकडे नियमित सादर करणे आवश्यक असते.

वेळोवेळी सूचना देऊनही ही माहिती सादर न करणा सुमारे २२० पक्षांची नोंदणी आयोगाने रद्दबातल ठरविली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत केवळ उमेदवार उभे करून आणि माघार घेऊन नको त्या बाबी करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसल्याचे सहारिया यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर