शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

लोकांना विश्वासात घेऊन मतदान बंधनकारक करणे शक्य : सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:55 IST

कोल्हापूर : मतदानाचा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा यासाठी जागृती, आवाहन करणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकांना विश्वासात ...

ठळक मुद्देलोकांना विश्वासात घेऊन मतदान बंधनकारक करणे शक्य : सहारिया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनजागृती कमी

कोल्हापूर : मतदानाचा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा यासाठी जागृती, आवाहन करणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकांना विश्वासात घेऊन मतदान करणे हे बंधनकारक करता येणे शक्य आहे. मात्र, मतदानाचा हक्क मूलभूत आहे. त्यामुळे ते बंधनकारक करण्याऐवजी प्रत्येक मतदाराने प्राधान्याने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात निमित्त ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया म्हणाले, कायदा केल्यास मतदान करणे प्रत्येकाला बंधनकारक करणे काहीच अवघड नाही. याबाबत पूर्वी देखील विचार झाला असून तो मागे पडला आहे.

लोकांचा विश्वास आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल, तर मतदान बंधनकारक करता येणे शक्य आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फरक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानाबाबत जनजागृती कमी असते. त्यामुळे या निवडणुका निर्भय, पारदर्शीपणे घेण्याचे मोठे आव्हान आणि जबाबदारी निवडणूक आयोगासमोर असते.

ही जबाबदारी आयोग कौशल्याने पार पाडतो. मतदारांना आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती होण्यासाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रांतील माहितीचे मोठे फलक मतदान केंद्राबाहेर, शहरातील चौकात लावण्यात येतात. त्यामध्ये उमेदवाराचे शिक्षण, त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण, त्याच्यावरील गुन्ह्यांची नोंद यांची माहिती दिली जाते. त्यामुळे मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याची संधी मिळेल. निवडणुकीच्या कालावधीत सोशल मिडियावरील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हानिहाय समिती स्थापन केली आहे. या मिडियावर चुकीच्या पोस्ट आणि गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

‘त्या’ प्रवृत्तीला आळा बसलासन २०१४मध्ये आयोगाकडे ४५० नोंदणीकृत पक्ष होते. खोलात जाऊन त्यांची माहिती घेतली असता, आयोगाच्या मूलभूत नियमांचेही त्यांनी पालन केल्याचे दिसले नाही. पक्षांनी किमान वार्षिक ताळेबंदाची माहिती तसेच आयकर विवरण आयोगाकडे नियमित सादर करणे आवश्यक असते.

वेळोवेळी सूचना देऊनही ही माहिती सादर न करणा सुमारे २२० पक्षांची नोंदणी आयोगाने रद्दबातल ठरविली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत केवळ उमेदवार उभे करून आणि माघार घेऊन नको त्या बाबी करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसल्याचे सहारिया यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर