शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांचा ११ मार्चला मोर्चा, मेळाव्यात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:42 IST

पर्ल्स गुंतवणूकदारांना पैसे परत घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी बहुतांशी ठेवीदारांकडे कागदपत्रेच नाहीत. यासाठी पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीची कार्यालये उघडून कागदपत्रे द्यावीत, यासाठी ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांचा ११ मार्चला मोर्चा, मेळाव्यात निर्णय कार्यालय उघडून कागदपत्रे देण्याची पोलिसांकडे मागणी

कोल्हापूर : पर्ल्स गुंतवणूकदारांना पैसे परत घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी बहुतांशी ठेवीदारांकडे कागदपत्रेच नाहीत. यासाठी पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीची कार्यालये उघडून कागदपत्रे द्यावीत, यासाठी ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.अखिल भारतीय पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेचे राज्य सचिव शंकर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली टाऊन हॉल बागेत गुंतवणुकीदारांचा मेळावा झाला. शंकर पुजारी म्हणाले, गेले अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सर्वाेच्च न्यायालयाने ‘पर्ल्स’ कंपनीची मालमत्ता जप्त करून, ठेवीदारांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. ठेवीदारांनी आॅनलाईन अर्ज करायचा आहे; यासाठी एप्रिल २०१९ पर्यंत ठेवीदारांना आॅनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत; पण बहुतांशी ठेवीदारांकडे ठेवीचे प्रमाणपत्र, पावत्याच नाहीत.

या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी ताब्यात घेतल्याने आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ‘पर्ल्स’ कंपनीचे आठ कार्यालयीन अधिकारी आहेत, त्यांच्याकडून गुंतवणूकदारांची कागदपत्रे देण्यासाठी प्रशासनाने मदत करावी; यासाठी ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर गुंतवणूकदारांचा मोर्चा काढण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

यावेळी बाजीराव पाटील (तासगाव), शिवाजी देसाई (आळते), एकनाथ कडोलकर (इचलकरंजी), सुभाषराव जगदाळे, यशवंत पाटील, रविकिरण हरणे, बसलिंग कोष्टी, व्ही. जी. गुरव, संजय पवार, शामराव पाटील, विजय कोपर्डीकर, आर. एस. सुतार, संजय अग्रवाल, आदी उपस्थित होते.मेळाव्यानंतर शिष्टमंडळाने शाहूपुरी पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देऊन कागदपत्रे देण्याबाबत सहकार्य करण्याची मागणी केली. कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ताब्यात देण्यासाठी आदेश करावेत, अशी ही त्यांनी मागणी केली.

‘पर्ल्स’च्या अधिकाऱ्यांना अभयसर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी भाजप सरकारने करण्याची गरज आहे; पण सरकारकडून ‘पर्ल्स’ अधिकारी व व्यवस्थापकांना संरक्षण देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पुजारी यांनी केला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर