शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांचा ११ मार्चला मोर्चा, मेळाव्यात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:42 IST

पर्ल्स गुंतवणूकदारांना पैसे परत घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी बहुतांशी ठेवीदारांकडे कागदपत्रेच नाहीत. यासाठी पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीची कार्यालये उघडून कागदपत्रे द्यावीत, यासाठी ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांचा ११ मार्चला मोर्चा, मेळाव्यात निर्णय कार्यालय उघडून कागदपत्रे देण्याची पोलिसांकडे मागणी

कोल्हापूर : पर्ल्स गुंतवणूकदारांना पैसे परत घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी बहुतांशी ठेवीदारांकडे कागदपत्रेच नाहीत. यासाठी पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीची कार्यालये उघडून कागदपत्रे द्यावीत, यासाठी ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.अखिल भारतीय पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेचे राज्य सचिव शंकर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली टाऊन हॉल बागेत गुंतवणुकीदारांचा मेळावा झाला. शंकर पुजारी म्हणाले, गेले अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सर्वाेच्च न्यायालयाने ‘पर्ल्स’ कंपनीची मालमत्ता जप्त करून, ठेवीदारांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. ठेवीदारांनी आॅनलाईन अर्ज करायचा आहे; यासाठी एप्रिल २०१९ पर्यंत ठेवीदारांना आॅनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत; पण बहुतांशी ठेवीदारांकडे ठेवीचे प्रमाणपत्र, पावत्याच नाहीत.

या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी ताब्यात घेतल्याने आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ‘पर्ल्स’ कंपनीचे आठ कार्यालयीन अधिकारी आहेत, त्यांच्याकडून गुंतवणूकदारांची कागदपत्रे देण्यासाठी प्रशासनाने मदत करावी; यासाठी ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर गुंतवणूकदारांचा मोर्चा काढण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

यावेळी बाजीराव पाटील (तासगाव), शिवाजी देसाई (आळते), एकनाथ कडोलकर (इचलकरंजी), सुभाषराव जगदाळे, यशवंत पाटील, रविकिरण हरणे, बसलिंग कोष्टी, व्ही. जी. गुरव, संजय पवार, शामराव पाटील, विजय कोपर्डीकर, आर. एस. सुतार, संजय अग्रवाल, आदी उपस्थित होते.मेळाव्यानंतर शिष्टमंडळाने शाहूपुरी पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देऊन कागदपत्रे देण्याबाबत सहकार्य करण्याची मागणी केली. कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ताब्यात देण्यासाठी आदेश करावेत, अशी ही त्यांनी मागणी केली.

‘पर्ल्स’च्या अधिकाऱ्यांना अभयसर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी भाजप सरकारने करण्याची गरज आहे; पण सरकारकडून ‘पर्ल्स’ अधिकारी व व्यवस्थापकांना संरक्षण देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पुजारी यांनी केला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर