शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

पीक नुकसान- भरपाईत वाढ

By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST

वनखात्याचा निर्णय : जंगलाशेजारील शेतकऱ्यांना दिलासा

वन्य जिवांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईत वन्यखात्याने वाढ केली असून शासनाने नुकसानभरपाईची रक्कम वाढवली आहे. यापूर्वी पिकाच्या नुकसानीस प्रतिगुंठा २० रुपये मदत करून शेतकऱ्यांची जणू चेष्टाच केली जात असे. त्यामुळे नुकसानीबाबत शासनाच्या नियामानुसार शेतकरी हतबल होत होते. अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांद्वारे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई वाढवावी, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि राधानगरी आदी तालुक्यात अशा वन्यप्राण्यांपासून शेतीचे अतोनात नुकसान होते, पण शेतकऱ्याच्या हाती तोकडी शासकीय मदत पडते. शासनाने आता रक्कम वाढवली असली तरी याबाबत शेतकऱ्यांकडून पूर्वीपेक्षा बरी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याशिवाय नुकसान करणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आता माकड, गिधाड, गवा रेडा या प्राण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास वनखाते आर्थिक मदत करणार आहे.नुकसान व त्याची भरपाई २ हजारपर्यंत नुकसान झाल्यास : पूर्ण परंतु किमान रु. ५००२ हजार ते १० हजारपर्यंत नुकसानीच्या ५० टक्के, कमाल सहा हजार रु.१० हजारापेक्षा अधिक उसाचे नुकसान : नुकसानीच्या ३० टक्के,कमाल १५ हजार रु. प्रति टन ४०० रु.हल्ल्यातील जखमींना मदत : व्यक्ती मृत्यू पावल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास : २ लाख रुपये.किरकोळ जखमी झाल्यास : रु. ५०,०००/-किरकोळ जखमी : औषधोपचाराचा खर्च मिळणार, खासगी रुग्णालयात उपचार झाल्यास ७,५०० रु. देणार.फळबागांच्या नुकसानीसाठी मदत : पूर्वी हत्तीपासून होणाऱ्या फळबागांच्या नुकसानीसाठी मदत मिळत होती. आता नव्याने रानगव्यांपासूनच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ती भरपाई प्रती झाड पुढीलप्रमाणे :नारळ : २००० रु., सुपारी : १,२०० रु., कलमी आंबा : १,६०० रु., केळी : ४८ रु., इतर फळझाडे : २०० रु.