शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

पेपर तपासणीच्या दर्जाकडे लक्ष द्या

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

‘अभाविप’ची मागणी : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना निवेदन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पुनर्मूल्यांकनासाठी (रिव्हॅल्युएशन) येणाऱ्या अर्जांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. पेपर तपासणीबाबत विद्यार्थ्यांना अविश्वास वाटत आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या दर्जाकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) शिष्टमंडळाने सोमवारी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात असे म्हटले आहे की, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम गतिमान होत आहे. मात्र, गतिमान परीक्षा यंत्रणा राबविताना पेपर तपासणीचा दर्जा नक्की घसरला असल्याचे जाणवत आहे. गेल्या वर्षी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे आलेल्या अर्जांची संख्या पाहता विद्यार्थ्यांचा पेपर तपासणीबाबतचा विद्यापीठावरील विश्वास कमी होत असल्याचे दिसत आहे. केवळ अभियांत्रिकी नव्हे, तर कला, वाणिज्य आणि विज्ञानासह बहुतांश अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत पेपर तपासणीच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. हा अविश्वास दूर करण्यासाठी पेपर तपासणीच्या दर्जाकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे. दरम्यान, पेपर तपासणीबाबतचा नियमाने मागोवा घेतला जाईल, असे आश्वासन परीक्षा नियंत्रक काकडे यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात सुमित जोंधळे, अमेय गोडे, भूषण जाधव, गुरू पाटील, रतन कांबळे, चैतन्य कोठेकर, श्रीनिवास सूर्यवंशी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)‘अभाविप’च्या विविध मागण्या अशा...प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी स्पष्ट व थेट आदेश द्यावेत.पेपर तपासणी योग्य पद्धतीने व संस्थेने न केल्यास कोणती कारवाई केली जाईल, याची माहिती द्यावी.प्राध्यापकांच्या पेपर तपासण्याच्या संख्येवर दिवसानुसार नियंत्रण असावे.प्राध्यापकांना पेपर तपासणीच्या संस्थेचा कोटा निश्चित करावा.कॅप सेंटरवर त्या परिसरातील अथवा जिल्ह्यातील पेपर तपासणीसाठी देण्यात येऊ नयेत.कॅप सेंटरवर प्रत्येक प्राध्यापकाने महाविद्यालयाच्या ओळखपत्राची फोटो कॉपी जमा करावी.