शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

चंद्रकांत पाटील यांचा मुश्रीफ यांच्यावर पलटवार, पेरणी खोळंबलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:39 IST

राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होऊ शकलेला नाही. राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकातून केला. कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका खरीप कर्ज देत नसून त्याकडे मुश्रीफ दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

ठळक मुद्देकर्जाविना पेरणी खोळंबलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, चंद्रकांत पाटील यांचा मुश्रीफ यांच्यावर पलटवारकर्जमाफी न मिळालेल्यांच्या थकबाकीकडे सरकारचे दुर्लक्ष

कोल्हापूर : राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होऊ शकलेला नाही. राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकातून केला. कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका खरीप कर्ज देत नसून त्याकडे मुश्रीफ दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यात म्हटले आहे.राज्यातील जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांना ४५ हजार ७८५ कोटींचे कर्जवाटपाचे उदिष्ट आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना केवळ १२ हजार ३१५ कोटींचे वाटप झालेले आहे. जिल्हा बँका कमकुवत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांना ३२ हजार २६१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते, त्यांपैकी ४९०० कोटींचे वाटप या बँकांनी केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने त्यांची खरीप पेरणीची कामे थांबली आहेत.महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दोन लाखांपर्यंतच्या व त्यावरील रकमेच्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळेच त्यांना खरिपाचे कर्ज मिळू शकलेले नाही. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले.

कोल्हापूर जिल्हा बँकेने १५८ टक्के कर्जवाटप केले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अनेक शेतकरी कर्ज घेतात, जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून बँक ऑफ इंडियाच्या दारात आम्ही आंदोलन केले. त्यानंतर शेतकऱ्यांची वेदना राज्य सरकारला कळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यात गैर काय? मुळात अशा बाबींकडे राज्याचे अनुभवी मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी लक्ष देणे गरजेचे होते, असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर