शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पेशंट आॅक्सिजनवर.. अ‍ॅम्ब्युलन्स ढाब्यावर!

By admin | Updated: October 6, 2015 00:42 IST

भुर्इंजनजीक धक्कादायक प्रकार : अत्यवस्थ रुग्णाला रस्त्यावर सोडून ड्रायव्हरचा खाद्यपदार्थांवर ताव --लोकमत विशेष

राहुल तांबोळी-भुर्इंज --स्थळ-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील भुर्इंज उड्डाण पुलानजीकचे हॉटेल. वेळ-दुपारची. हॉटेलसमोर थांबलेल्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये एक रुग्ण तडफडत झोपलेला. त्याच्या नाका-तोंडात आॅक्सिजनच्या नळ्या. अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर; मात्र हॉटेलात निवांतपणे चहा-नाष्ट्यावर ताव मारत बसलेला. विशेष म्हणजे, अ‍ॅम्ब्युलन्सवर नाव चक्क ‘भारतीय जनता पार्टी’चे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह अनेक दिग्गजांची लिस्टही याच अ‍ॅम्ब्युलन्सवर रंगलेली. भाजपच्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्णावर आलेले हे ‘बुरे दिन’ पाहून येणारे-जाणारे मात्र चाट पडलेले.याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भुर्इंज येथील एका हॉटेलसमोर एक अ‍ॅम्ब्युलन्स (एमएच ०२ सीई ९९४४) येऊन उभी राहिली. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये एक रुग्ण होता. त्याच्या नाका-तोंडाला चक्क आॅक्सिजनच्या नळ्या लावल्या होत्या. रुग्ण गंभीर परिस्थितीत असतानाही अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक व इतर सहकारी रुग्णाला आहे त्या परिस्थितीत सोडून चक्क हॉटेलमध्ये शिरले. बराच वेळ हॉटेलसमोर थांबलेल्या या अ‍ॅम्ब्युलन्समधील त्या रुग्णाची तडफड पाहून येणारे-जाणारे भुवया उंचावत होते. दरम्यान, या रुग्णाचे छायाचित्र काढले जात असतानाच आतमध्ये निवांतपणे चहा-नाष्टा करत बसलेल्या संबंधित व्यक्ती अ‍ॅम्ब्युलन्सजवळ पळत आल्या आणि काही क्षणातच अ‍ॅम्ब्युलन्स मार्गस्थ झाली. एका राजकीय पक्षाच्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये घडलेला हा प्रकार अतिगंभीर असून, अत्यवस्थ रुग्णाला तडफडत सोडून स्वत:ची पोटं भरणारे ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे बीद्र कसे पाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अ‍ॅम्ब्युलन्सवर भाजप नेत्यांची नावे संबंधित अ‍ॅम्ब्युलन्सवर भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक ३१ मालाड (प.) मुंबई ६४ असा उल्लेख केला असून, अ‍ॅम्ब्युलन्सवर भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावेही आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. आशिष शेलार, राम नाईक, आ. गोपाल शेट्टी, योगेश सागर, आर. यू. सिंह, जे. पी. मिश्रा, सुरेश रावल, नरेंद्र राठौड, राजेंद्र सिंह, युनूस खान यांचा समावेश आहे.सेवेसाठी की चमकोगिरीसाठी?रस्त्यावरून अ‍ॅम्ब्युलन्स गेली तरीही अपरिचित व्यक्तीसुद्धा त्या अ‍ॅम्ब्युलन्समधील रुग्णासाठी प्रार्थना करतात, कारण सायरन वाजवत जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अत्यावस्थ रुग्ण आहे, हे त्यांना माहीत असते. मात्र, सर्वसामान्यांच्या भावनेला ठेच पोहोचविण्याचा हा प्रकार भुर्इंज येथे घडला. अत्यावस्थ रुग्णाला रस्त्यावर सोडून हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची ही मानसिकता कुठली? देशाचे पालकत्व स्वीकारलेल्या पक्षाच्या रुग्णवाहिकेकडूनच असा प्रकार घडावा? रुग्णवाहिकेचा कारभार सेवेसाठी की चमकोगिरीसाठी? असा प्रश्न यानिमित्तिाने उपस्थित होत आहे.